फॉलोअर

शनिवार, २० जून, २०२०

बाजींद भाग ३०

बाजींद

भाग ३०

वस्ताद काकांचा शब्द निशाण धरलेल्या शिलेदाराला ऐकू जाताच त्याने ठासणीची बंदूक खाली करत खाली आवाज दिला….” ए खोल रं दिंडी दरवाजा….परवली चा शबुद बरोबर हाय…”

रायगड च्या चित दरवाज्याचा दिंडी दरवाजा उघडला गेला आणि एक मावळा बाहेर येत म्हणाला…”रामराम शिलेदार…..काय बेत गडावर येण्याचा…?

त्याच्याकडे हसत वस्ताद काका बोलले…बहिर्जी नाईकांची खास माणसे आहेत ही…परवली चा शब्द उंबर फुल हाय…”उंबर फुल…बर बर मग तुमास्नी कोण आडीवणार…..या या आत या…असे म्हणत तो मावळा आत गेला पाठोपाठ वस्ताद काका व सखाराम सह त्याचे साथीदार आत गेले….!

आत प्रवेशाताच मावळयाने दिंडी दरवाजा आतून बंद करुन घेतला.

आत निमुळती होत गेलेल्या दिवडीत धिप्पाड भालाईत उभे होते.

तोफांची तोंडे चिखलाने लिपुन बंद केली होती.

बाजूला पाच पन्नास पहारेकरी हशम तलवारी कमरेला अडकवून कामात गुंग होते…!

शिवशाही ची शिस्त पाहण्यासारखी होती.

कोणीही बेशिस्त नव्हते..!

समोरच एका धिप्पाड धारकऱ्याने वस्ताद काका ला ओळखले व लगबगीने धावत तो जवळ आला आणि मुजरा करत बोलला….मुजरा वस्ताद काका…!

लई दिसान गडावर येन केलासा ..!

बरं वाटलं तुमचं दर्शन घेऊन…!वस्ताद काका हसत बोलले..आरं नाईकांची खास माणस हायती सोबत…जरा खासगीत वर्दी देऊन महाराजांची भेट घालायची हाय…..

व्हय व्हय घाला घाला…नाईकांच्या माणसासनी कोण आडीवनार…आस म्हणत तो धारकरी बाजूला झाला आणि काका तरातरा चालू लागले…सोबत सखाराम व त्याचे साथीदार पण चालू लागले…!

भर पावसात रायगड चढणे म्हणजे साक्षात स्वर्गाच्या पायऱ्या चढत देवाच्या दर्शनाला जाणे होय…!

राजधानी ला साजेसा किल्ला म्हणजे रायगड..!

सह्याद्रीचा मूर्तिमंत अविष्कार…!

धो धो पावसाने रायगडचे अभ्यंगस्नान पाहणे म्हणजे पर्वणीच..!

वळणा वळणा वर छोटे छोटे धबधबे निर्माण झाले होते.

अश्या मावळी पावसात पण ठायी ठायी काथ्याच्या गोंणपाटाची गोची करुन हातात भाला घेऊन राजधानीचे रक्षण करणारे शिवशाहीचे धिप्पाड भालाईत हिंदवी स्वराज्याच्या शिस्तीचे प्रदर्शन करत होते..!अशा पावसात रायगड चा चढ चढून धाप तर लागत होती मात्र पावसाच्या पाण्यात येणारा घाम सुद्धा वाहून जात होता..!अश्या पडत्या पावसात सखाराम मात्र मनोमन आनंदी होता.

ज्या शिवरायांची कीर्ती सारा हिंदुस्थान गातोय त्या माझ्या राजाच दर्शन व्हणार ही सखाराम साठी साधी गोष्ट नव्हती.

सात पिढ्या जरी प्रयत्न केला असता तर स्वराज्याच्या राजधानीत प्रवेश सुद्धा मिळवता आला नसता.

त्यो कोण कुठल्या जन्मीचा सोबती म्हणून खंडोजी भेटला वाटेत म्हणून हे दिवस बघायला मिळत होते.

खरोखर सखाराम व त्याचे साथीदार खंडोजी ला मनोमन धन्यवाद देत होते…!

पण,त्याच्या आयुष्यात पुढे काय झालं हे मातूर ईचारायच राहिलंच… सखाराम ने अंदाज बांधला की बहुतेक सावीत्री आणि खंडोजी च लगीन झालं असलं आणि बहिर्जी नाईकांनी यशवंतमाची जिंकून खंडोजीलाच सरदार केला असलं तिथला…म्हणून तर रायगडच्या दऱ्या डोंगरात सारे शिर्के आणि खंडोजी फिरत बसल्यात…चला कायबी म्हणा..लक्ष्मी नारायणाची जोडी हाय खंडोजी आणि सावीत्रीची…!

लय खस्ता खाल्या बिचार्यांनी…पण,त्या “बाजींद” च्या वहीच काय झालं असलं पुढं….दिल असलं म्हणा ते बी खंडोजी नं परत बाजींद ला…तसा गप बसणारा नव्ह खंडोजी…”

विचारांची चक्रे फिरत होती आणि वस्ताद काका रायगडावरील सरकारी दफ़्तरात पोहोचले…!

अनेक जणांचे अनेक विषय ऐकत मोठमोठे हवालदार मश्गुल होते,तर टाक दवत समोर ठेऊन लिखाणाची कामे करणारी मुनिमजी पण व्यस्त होते…!काका हेर खात्याच्या कक्षाकडे वळाले आणि अनेक हेर तिथे स्वराज्यातून आलेल्या माहितीची प्रतवारी करत बसले होते…!

वस्ताद काकांना पाहूंन समोर बसलेले पंत काका उठले व म्हणाले…वस्ताद यावे….काहीच वर्दी नसताना प्रत्यक्ष तुम्ही रायगडी येण्याची तसदी घेतली…नक्कीच कारण महत्वाचे असावे….!

पंतांच्या याबोलण्यावर काका म्हणाले….होय पंत… ही चार मंडळी गस्तीच्या हेरांना दिसली…चौकशी केली तर “उंबरफुल” हा परवली चा शब्द सांगितला…

उंबर फुल…..?

बापरे…..म्हणजे प्रत्यक्ष बहिर्जींच्या एकदम जवळची माणसे आहेत तर…..बोला काय करावे यांच्यासाठी…..

मग,वस्ताद काकांनी सखाराम च्या धनगरवाडी चे दुखणे,टकमक टोकाची व्यथा आणि नरभक्षक वाघांचा बंदोबस्त ही कहाणी सविस्तर सांगितली…व या लोकांना महाराजांना सुद्धा भेटायचे आहे….!

काकांनी टाक दवतेत बुडवून सारा मजकूर समोरच्या भूर्ज पत्रावर लिहला आणि सविस्तर मायना बनवला आणि खास बहिर्जी नाईकांचा शिक्का मारुन खाली परवली चा शब्द मोडी लिपीत लिहला आणि बोलले….उद्या सकाळी महाराजांचा दरबार आहे… उत्तरेत पाठवलेल्या हेरांची माहिती आली आहे….त्याच्या जोडीलाच हा कागद महाराजांना दाखवतो….

आज रात्री सरकारी विश्रांती गृहात मुक्काम करुद्या या लोकांना….आपण चर्चा करु थोडी की टकमक टोकावरुन कडेलोट बंद करावी…!

कारण बऱ्याच तक्रारी आल्या ज्यांना शिक्षा झाली त्यांच्या नातलगांच्या की आम्हाला अंतिम विधी ला किमान देह तरी मिळूदे…अजून महाराजांच्या कानी ही बातमी नाही…पण मागच्या महिन्यात केलेल्या कडेलोटा बद्धल स्वता बहिर्जी नाईक सुद्धा अस्वस्थ होते असे दिसून आले….!

मोठा श्वास घेत वस्ताद काका बोलले…ठीक आहे,कडेलोट शिक्षा कायमचीच बंद करायचा अर्ज करा…मुख्य हेर प्रमुख नात्याने पहिले अनुमोदन ची सही मी करतो…बाकी अंतिम निर्णय महाराज देतील सकाळी…!सखाराम व त्याच्या साथीदारांना सरकारी दुकानातून नवीन मावळी कपडे,अंथरुणाचे पांघरुणाचे साहित्य देऊन त्यांच्या भोजनाची व विश्रांतीची सोय सरकारी अतिथी गृहात करुन वस्ताद काका पुन्हा सरकारी कचेरीत आले व पंत काकांच्या समवेत महत्वाच्या चर्चेत मश्गुल झाले….!

सकाळ झाली…..सूर्यनारायण नभोमंडळात दाखल झाला मात्र रायगड च्या डोक्याला वेढे देऊन बसलेले काळे कभिन्न पावसाळी ढग आणि धुक्याने सूर्यकिरणे रायगड ला स्पर्श करु शकत नव्हती..!

समोर हाताच्या अंतरावरील दिसणे मुश्किल इतके दाट धुके…!

पण,चांगले उजडले होते…!

अश्या दाट धुक्यात पण हातात मशाली घेतलेली मावळे मंडळी गस्त घालून रायगड ला पहारा देत होती…!

दरम्यान,एक हशम सरकारी अतिथीगृहात आला व सखाराम ला तयार रहा म्हणून सांगितले.सरकारी दुकानातून दिलेले नवे कपडे घालून दरबारात जायचे आहे अशी वर्दी देऊन हशम निघून गेला..!

सखाराम व त्याचे साथीदार खूप खूप आनंदी होते..!

सखाराम व साथीदार तयार झाले व सरकारी अतिथीगृहातून बाहेर पडले व समोर उभ्या असलेल्या मावळयाला बोलले….शिलेदार…हित जगदीश्वर महादेवाचं देऊळ कुठं हाय जी…?

अमास्नी दर्शन मिळल का ओ ?

यावर तो हशम बोलला..सरळ समोर जावा…कोणी अडवलं तर परवली चा शबुद सांगा आणि दर्शन घ्यायला जायचं हाय अस सांगा…जावा सरळ होळीचा माळ लागलं…बाजारपेठ ओलांडली की समोरच जगदीश्वर मन्दिर…जावा…”

त्याचे उत्तर ऐकून ते चालू लागले….सखाराम च्या मनात आनंदाच्या किती लकेरी उठल्या असतील याची कल्पना करुन पहा…!एक साधा मेंढपाळ हिंदुस्थानातील बलाढ्य राजसत्तेच्या राजधानीत खुद्द महादेवाचे दर्शन घ्यायला निघाला होता…

कोणत्या महादेवाचे दर्शन घ्यावे…ज्या महादेवाच्या आशीर्वादाने शिवरायांनी साधारण माणसे हाताशी धरुन दिल्ली हादरुन सोडली…भगव्या झेंड्याचा धाक असेतु हिमाचल बसवून रायगडी स्वाभिमानाचे सिंहासन निर्माण केले त्याचे दर्शन घ्यावे….की ज्याच्या अस्तित्वाने हिंदुस्थानातील बाराही जोतिर्लिंगे आजही टिकून राहिल्या त्या दस्तूरखुद्द राजश्री शिवाजीराजे भोसले नावाच्या महादेवाचे दर्शन घ्यावे….केवळ मनाची घालमेल….!

आजवर ज्याच्यामुळे मंदिराचे कळस,अंगणातील तुळस,गळ्यातल्या माळा, कपाळावरील टिळे आणि उरात जग जिंकायची ईर्षा टिकून राहिले ते शिवाजी राजे साक्षात तमाम हिंदुस्थानाचेच जगदीश्वर महादेव होते यात मात्र शँका नव्हती..!

डोळ्यात आलेले पाणी पुसत सखाराम होळीच्या माळावर आला.

अनेक कुणबी आपापल्या मंडई लावण्यात व्यस्त होते.

बाजारात शिस्तबद्ध गर्दी दिसू लागली.

धुक्यामुळे माणसे विरळ होती पण अस्तित्व जाणवत होते..!

पेठ ओलांडली आणि पेठेच्या डाव्या हाताकडून एक वाऱ्याचा मोठा झोत सखाराम च्या मुखावर आला तसा सखाराम व त्याचे साथीदार दचकले….पाठोपाठ त्यांच्या कानात कोणीतरी गुण गुंण गुणगुणल्याची जाणीव त्यांना वाटली तसे चौघेही घाबरलेल्या नजरेने त्या डोंगराच्या विस्तीर्ण टोकाकडे बघत उभे राहीले….तितक्यात समोरुन घोड्यावरून येत असलेल्या एका धारकऱ्याने चौघांना थांबवले व विचारले…ए कोण रं तुम्ही….?त्याच्या बोलण्याने भानावर आलेल्या सखाराम ने ” उंबर फुल..परवली शब्द सांगितला व जगदीश्वर दर्शन कारण सांगितले….”

हे ऐकताच धारकरी बोलला….बर बर नाईकांच्या खासगीतले लोक वाटतं… जावा जावा…”

थोडा वेळ थांबत पाठमोऱ्या झालेल्या घोडेस्वाराला थांबवत सखाराम बोलला…..शिलेदार….या बाजूचा रस्ता कुठशी जातो ओ….?

घोड्याचा लगाम खेचत गोल गिरकी घेऊन तो धारकरी त्या रस्त्याकडे पाहत बोलला….आर बाबांनो तिकडं नका बघू….तिकडं गेलेली माणस माघारी येत नाहीत…..टकमक टोक हाय तिकडं…टकमक टोक……

त्या शिलेदाराचे ते शब्द कानावर पडताच सखाराम व त्याच्या सवंगड्याच्या अंगावर भीतीने सर्दिशी काटा आला…!

बाजींद भाग क्र.२९

वस्ताद काकांचा शब्द निशाण धरलेल्या शिलेदाराला ऐकू जाताच त्याने ठासणीची बंदूक खाली करत खाली आवाज दिला...." ए खोल रं दिंडी दरवाजा....परवली चा शबुद बरोबर हाय..."

रायगड च्या चित दरवाज्याचा दिंडी दरवाजा उघडला गेला आणि एक मावळा बाहेर येत म्हणाला..."रामराम शिलेदार.....काय बेत गडावर येण्याचा...?

त्याच्याकडे हसत वस्ताद काका बोलले...बहिर्जी नाईकांची खास माणसे आहेत ही...परवली चा शब्द उंबर फुल हाय..."

उंबर फुल...बर बर मग तुमास्नी कोण आडीवणार.....या या आत या...असे म्हणत तो मावळा आत गेला पाठोपाठ वस्ताद काका व सखाराम सह त्याचे साथीदार आत गेले....!

आत प्रवेशाताच मावळयाने दिंडी दरवाजा आतून बंद करुन घेतला.

आत निमुळती होत गेलेल्या दिवडीत धिप्पाड भालाईत उभे होते.
तोफांची तोंडे चिखलाने लिपुन बंद केली होती.
बाजूला पाच पन्नास पहारेकरी हशम तलवारी कमरेला अडकवून कामात गुंग होते...!
शिवशाही ची शिस्त पाहण्यासारखी होती.
कोणीही बेशिस्त नव्हते..!
समोरच एका धिप्पाड धारकऱ्याने वस्ताद काका ला ओळखले व लगबगीने धावत तो जवळ आला आणि मुजरा करत बोलला....मुजरा वस्ताद काका...!
लई दिसान गडावर येन केलासा ..!
बरं वाटलं तुमचं दर्शन घेऊन...!

वस्ताद काका हसत बोलले..आरं नाईकांची खास माणस हायती सोबत...जरा खासगीत वर्दी देऊन महाराजांची भेट घालायची हाय.....

व्हय व्हय घाला घाला...नाईकांच्या माणसासनी कोण आडीवनार...आस म्हणत तो धारकरी बाजूला झाला आणि काका तरातरा चालू लागले...सोबत सखाराम व त्याचे साथीदार पण चालू लागले...!

भर पावसात रायगड चढणे म्हणजे साक्षात स्वर्गाच्या पायऱ्या चढत देवाच्या दर्शनाला जाणे होय...!
राजधानी ला साजेसा किल्ला म्हणजे रायगड..!
सह्याद्रीचा मूर्तिमंत अविष्कार...!
धो धो पावसाने रायगडचे अभ्यंगस्नान पाहणे म्हणजे पर्वणीच..!
वळणा वळणा वर छोटे छोटे धबधबे निर्माण झाले होते.
अश्या मावळी पावसात पण ठायी ठायी काथ्याच्या गोंणपाटाची गोची करुन हातात भाला घेऊन राजधानीचे रक्षण करणारे शिवशाहीचे धिप्पाड भालाईत हिंदवी स्वराज्याच्या शिस्तीचे प्रदर्शन करत होते..!

अशा पावसात रायगड चा चढ चढून धाप तर लागत होती मात्र पावसाच्या पाण्यात येणारा घाम सुद्धा वाहून जात होता..!

अश्या पडत्या पावसात सखाराम मात्र मनोमन आनंदी होता.
ज्या शिवरायांची कीर्ती सारा हिंदुस्थान गातोय त्या माझ्या राजाच दर्शन व्हणार ही सखाराम साठी साधी गोष्ट नव्हती.
सात पिढ्या जरी प्रयत्न केला असता तर स्वराज्याच्या राजधानीत प्रवेश सुद्धा मिळवता आला नसता.
त्यो कोण कुठल्या जन्मीचा सोबती म्हणून खंडोजी भेटला वाटेत म्हणून हे दिवस बघायला मिळत होते.
खरोखर सखाराम व त्याचे साथीदार खंडोजी ला मनोमन धन्यवाद देत होते...!
पण,त्याच्या आयुष्यात पुढे काय झालं हे मातूर ईचारायच राहिलंच... सखाराम ने अंदाज बांधला की बहुतेक सावीत्री आणि खंडोजी च लगीन झालं असलं आणि बहिर्जी नाईकांनी यशवंतमाची जिंकून खंडोजीलाच सरदार केला असलं तिथला...म्हणून तर रायगडच्या दऱ्या डोंगरात सारे शिर्के आणि खंडोजी फिरत बसल्यात...चला कायबी म्हणा..लक्ष्मी नारायणाची जोडी हाय खंडोजी आणि सावीत्रीची...!

लय खस्ता खाल्या बिचार्यांनी...पण,त्या "बाजींद" च्या वहीच काय झालं असलं पुढं....दिल असलं म्हणा ते बी खंडोजी नं परत बाजींद ला...तसा गप बसणारा नव्ह खंडोजी..."

विचारांची चक्रे फिरत होती आणि वस्ताद काका रायगडावरील सरकारी दफ़्तरात पोहोचले...!

अनेक जणांचे अनेक विषय ऐकत मोठमोठे हवालदार मश्गुल होते,तर टाक दवत समोर ठेऊन लिखाणाची कामे करणारी मुनिमजी पण व्यस्त होते...!

काका हेर खात्याच्या कक्षाकडे वळाले आणि अनेक हेर तिथे स्वराज्यातून आलेल्या माहितीची प्रतवारी करत बसले होते...!

वस्ताद काकांना पाहूंन समोर बसलेले पंत काका उठले व म्हणाले...वस्ताद यावे....काहीच वर्दी नसताना प्रत्यक्ष तुम्ही रायगडी येण्याची तसदी घेतली...नक्कीच कारण महत्वाचे असावे....!

पंतांच्या याबोलण्यावर काका म्हणाले....होय पंत... ही चार मंडळी गस्तीच्या हेरांना दिसली...चौकशी केली तर "उंबरफुल" हा परवली चा शब्द सांगितला...

उंबर फुल.....?
बापरे.....म्हणजे प्रत्यक्ष बहिर्जींच्या एकदम जवळची माणसे आहेत तर.....बोला काय करावे यांच्यासाठी.....

मग,वस्ताद काकांनी सखाराम च्या धनगरवाडी चे दुखणे,टकमक टोकाची व्यथा आणि नरभक्षक वाघांचा बंदोबस्त ही कहाणी सविस्तर सांगितली...व या लोकांना महाराजांना सुद्धा भेटायचे आहे....!

काकांनी टाक दवतेत बुडवून सारा मजकूर समोरच्या भूर्ज पत्रावर लिहला आणि सविस्तर मायना बनवला आणि खास बहिर्जी नाईकांचा शिक्का मारुन खाली परवली चा शब्द मोडी लिपीत लिहला आणि बोलले....

उद्या सकाळी महाराजांचा दरबार आहे... उत्तरेत पाठवलेल्या हेरांची माहिती आली आहे....त्याच्या जोडीलाच हा कागद महाराजांना दाखवतो....

आज रात्री सरकारी विश्रांती गृहात मुक्काम करुद्या या लोकांना....आपण चर्चा करु थोडी की टकमक टोकावरुन कडेलोट बंद करावी...!
कारण बऱ्याच तक्रारी आल्या ज्यांना शिक्षा झाली त्यांच्या नातलगांच्या की आम्हाला अंतिम विधी ला किमान देह तरी मिळूदे...अजून महाराजांच्या कानी ही बातमी नाही...पण मागच्या महिन्यात केलेल्या कडेलोटा बद्धल स्वता बहिर्जी नाईक सुद्धा अस्वस्थ होते असे दिसून आले....!

मोठा श्वास घेत वस्ताद काका बोलले...ठीक आहे,कडेलोट शिक्षा कायमचीच बंद करायचा अर्ज करा...मुख्य हेर प्रमुख नात्याने पहिले अनुमोदन ची सही मी करतो...बाकी अंतिम निर्णय महाराज देतील सकाळी...!

सखाराम व त्याच्या साथीदारांना सरकारी दुकानातून नवीन मावळी कपडे,अंथरुणाचे पांघरुणाचे साहित्य देऊन त्यांच्या भोजनाची व विश्रांतीची सोय सरकारी अतिथी गृहात करुन वस्ताद काका पुन्हा सरकारी कचेरीत आले व पंत काकांच्या समवेत महत्वाच्या चर्चेत मश्गुल झाले....!

सकाळ झाली.....सूर्यनारायण नभोमंडळात दाखल झाला मात्र रायगड च्या डोक्याला वेढे देऊन बसलेले काळे कभिन्न पावसाळी ढग आणि धुक्याने सूर्यकिरणे रायगड ला स्पर्श करु शकत नव्हती..!

समोर हाताच्या अंतरावरील दिसणे मुश्किल इतके दाट धुके...!
पण,चांगले उजडले होते...!
अश्या दाट धुक्यात पण हातात मशाली घेतलेली मावळे मंडळी गस्त घालून रायगड ला पहारा देत होती...!

दरम्यान,एक हशम सरकारी अतिथीगृहात आला व सखाराम ला तयार रहा म्हणून सांगितले.
सरकारी दुकानातून दिलेले नवे कपडे घालून दरबारात जायचे आहे अशी वर्दी देऊन हशम निघून गेला..!

सखाराम व त्याचे साथीदार खूप खूप आनंदी होते..!

सखाराम व साथीदार तयार झाले व सरकारी अतिथीगृहातून बाहेर पडले व समोर उभ्या असलेल्या मावळयाला बोलले....शिलेदार...हित जगदीश्वर महादेवाचं देऊळ कुठं हाय जी...?
अमास्नी दर्शन मिळल का ओ ?

यावर तो हशम बोलला..सरळ समोर जावा...कोणी अडवलं तर परवली चा शबुद सांगा आणि दर्शन घ्यायला जायचं हाय अस सांगा...जावा सरळ होळीचा माळ लागलं...बाजारपेठ ओलांडली की समोरच जगदीश्वर मन्दिर...जावा..."

त्याचे उत्तर ऐकून ते चालू लागले....सखाराम च्या मनात आनंदाच्या किती लकेरी उठल्या असतील याची कल्पना करुन पहा...!
एक साधा मेंढपाळ हिंदुस्थानातील बलाढ्य राजसत्तेच्या राजधानीत खुद्द महादेवाचे दर्शन घ्यायला निघाला होता...

कोणत्या महादेवाचे दर्शन घ्यावे...ज्या महादेवाच्या आशीर्वादाने शिवरायांनी साधारण माणसे हाताशी धरुन दिल्ली हादरुन सोडली...भगव्या झेंड्याचा धाक असेतु हिमाचल बसवून रायगडी स्वाभिमानाचे सिंहासन निर्माण केले त्याचे दर्शन घ्यावे....की ज्याच्या अस्तित्वाने हिंदुस्थानातील बाराही जोतिर्लिंगे आजही टिकून राहिल्या त्या दस्तूरखुद्द राजश्री शिवाजीराजे भोसले नावाच्या महादेवाचे दर्शन घ्यावे....केवळ मनाची घालमेल....!

आजवर ज्याच्यामुळे मंदिराचे कळस,अंगणातील तुळस,गळ्यातल्या माळा, कपाळावरील टिळे आणि उरात जग जिंकायची ईर्षा टिकून राहिले ते शिवाजी राजे साक्षात तमाम हिंदुस्थानाचेच जगदीश्वर महादेव होते यात मात्र शँका नव्हती..!

डोळ्यात आलेले पाणी पुसत सखाराम होळीच्या माळावर आला.
अनेक कुणबी आपापल्या मंडई लावण्यात व्यस्त होते.
बाजारात शिस्तबद्ध गर्दी दिसू लागली.
धुक्यामुळे माणसे विरळ होती पण अस्तित्व जाणवत होते..!
पेठ ओलांडली आणि पेठेच्या डाव्या हाताकडून एक वाऱ्याचा मोठा झोत सखाराम च्या मुखावर आला तसा सखाराम व त्याचे साथीदार दचकले....पाठोपाठ त्यांच्या कानात कोणीतरी गुण गुंण गुणगुणल्याची जाणीव त्यांना वाटली तसे चौघेही घाबरलेल्या नजरेने त्या डोंगराच्या विस्तीर्ण टोकाकडे बघत उभे राहीले....तितक्यात समोरुन घोड्यावरून येत असलेल्या एका धारकऱ्याने चौघांना थांबवले व विचारले...ए कोण रं तुम्ही....?

त्याच्या बोलण्याने भानावर आलेल्या सखाराम ने " उंबर फुल..परवली शब्द सांगितला व जगदीश्वर दर्शन कारण सांगितले...."

हे ऐकताच धारकरी बोलला....बर बर नाईकांच्या खासगीतले लोक वाटतं... जावा जावा..."

थोडा वेळ थांबत पाठमोऱ्या झालेल्या घोडेस्वाराला थांबवत सखाराम बोलला.....शिलेदार....या बाजूचा रस्ता कुठशी जातो ओ....?

घोड्याचा लगाम खेचत गोल गिरकी घेऊन तो धारकरी त्या रस्त्याकडे पाहत बोलला....आर बाबांनो तिकडं नका बघू....तिकडं गेलेली माणस माघारी येत नाहीत.....टकमक टोक हाय तिकडं...टकमक टोक......

त्या शिलेदाराचे ते शब्द कानावर पडताच सखाराम व त्याच्या सवंगड्याच्या अंगावर भीतीने सर्दिशी काटा आला...!

•●क्रमश●•

बाजींद भाग क्र.२८

खंडोजी नजरे आड झाला आणि ढगातून सहस्रो जलधारा पृथ्वीवर कोसळू लागल्या..!
पावसाचे पडणारे थेंब सखाराम,सर्जा,नारायण व मल्हारी ला भिजवू लागले...!
पण,आता शरीर भिजले तरी त्याचे काहीच चौघांना वाटत नव्हते,खंडोजी च्या मुखातून रायगड च्या जंगलात घडलेल्या एका अद्भुत अध्यायाचे श्रवण करुन ते चौघेही आकंठ त्यांच्या भूतकाळात भिजून गेले होते...!

अंगावर चांगलाच गारठा वाढू लागला आणि ते चौघेही त्या डोंगराच्या चढणीला लागले होते.
कोणी कोणाबरोबर बोलत नव्हते...निशब्द शांतता.
वरुन कोसळनाऱ्या सरी आणि चढणीने लागलेला दम व त्यामुळे होणारा श्वास उचश्वासाचा आवाज एवढेच ऐकू येत होते...!

सखाराम विचार करत होता की काय अदभूत कथानक घडले खंडोजी च्या आयुष्यात....!
ज्या प्रेमामुळे त्याने कर्तव्यात कसूर केली त्याच प्रेमाच्या आड किती भयानक संकटे येतात.....ज्या बाजींद च्या गूढ ज्ञानाचे आम्हीही दिवाने झालो होतो ते ज्ञान तर बहिर्जी नाईकांच्या पुढे काहीच नाही...आणि असे बहिर्जी नाईक ज्या शिवाजी महाराजांसाठी जीवन सुद्धा ओवाळून टाकत आहेत...ते शिवाजी महाराज कसले असतील....सखाराम विचार करता करता रडू लागला होता....पावसाच्या पाण्यात त्याचे अश्रू वाहून जात होते....मनात मात्र शिवरायांना डोळे भरुन पहायची आस निर्माण झाली होती..!

एव्हाना डोंगराचा चढ संपून पठार लागले आणि समोर पावसात धूसर दिसणारे मंदिराचे शिखर दिसू लागले ...मल्हारी बोलला....आरं ते समोर दिसते ते मंदिर बगा आलं....आता ह्यात कोण भेटणार देवालाच ठाऊक बाबांनो.....आज रात्री हितं थांबू आणि उद्या मातूर मागं फिरायचं आता....लय दिस झालं ही दरीखोरी पालथी घालतोय बाबांनो....बास ,मला काय आपण शिवाजी राजांच्या पर्यंत पोचू असं वाटत नाय.....!
त्याचा शब्द मध्येच खोडत सखाराम बोलला....नाय मल्हारी,आता तर महाराजांचं दर्शन घेऊनच जायचं....बस्स काहीही होवो,आपलं काम भलेही न होवो...महाराजांच्या पायावर डोकं टेकवू आन मगच धनगरवाडी गाठू....चला....!

ते सर्व त्या भव्य दगडी मंदिराच्या नंदी समोर उभे राहून आत बघू लागले..!
पावसाने बाहेर पाणीपाणी झाले होते मात्र मंदिराच्या गाभाऱ्यात एक मशाल तेवत होती.....!
चौघेही आत गेले....डोके झटकून पाणी हाताने पुसू लागले इतक्यात डोईला मावळी मुंडासे बांधलेला एक वृद्ध माणूस हातात मशाल घेऊन त्या चौघांजवळ आला....त्यांना पाहून त्याने त्यांना विचारले....कोण हाय रं बाबांनो तुमी...इतक्या रात्रीच कसं काय ह्या डोंगरावर...?
वाटसरू हायसा का रस्ता चुकून वर आलायसा....?

त्याच्या प्रश्नाणने सखाराम समोर होत बोलला....म्हातारबा रामराम....आम्ही टकमक धनगरवाडी चे धनगर...गावचे गावकारभारी हावोत....असे म्हणत सगळी हकीकत त्यांनी त्या म्हाताऱ्याला सांगितली व महाराजांना भेटून मदतीची मागणी करायला आम्ही निघालोय असे बोलतो न बोलतो इतक्यात...त्या म्हाताऱ्याच्या मागून 3-4 धिप्पाड मावळे सपासप तलवारी उपसून सामने आले व चौघांच्या नरड्यावर तलवारी रोखल्या...तो वृद्ध माणूस जरा मोठ्या आवाजात बोलला....ए खर सांगा नायतर तुमच्या मुंड्या धडावेगळ्या झाल्या म्हणून समजायच्या.....ह्यो डोंगर सहजा सहजी कोणाला गवसत नाय....इथं यायला कितीतरी गुपीत वाटा पार कराव्या लागत्यात....फक्त आमच्या हेरांनाच या वाटा ठाऊक असतात...बोला तुम्ही कोण नाहीतर सम्पला तुम्ही...!

आधीच डोंगर चढून दमलेल्या त्या चौघांना त्या आकस्मित हल्ल्याने पाचावर धारण बसली...त्या खंडोजीच्या नादाला लागून मरणाच्या दाढेत आलो असे त्यांना वाटू लागले...भीतीने चौघेही काही बोलत नव्हते.....

त्यांच्या गप्प बसण्याने ते मावळे अजून चिडले व चौघांना बेदम हाणू लागले...लाथा बुक्क्याचे प्रहार तोंडावर बसताच चौघेही जिवाच्या आकांताने ओरडू लागले ...इतक्यात नारायण ला अचानक खंडोजी चे शब्द आठवले...मंदिरात कोणी भेटले की परवली चा शबुद सांगा..."उंबराच फुल"

एका क्षणात नारायण ओरडू लागला.....उंबराच फुल....उंबराच फुल.....उंबराच फुल....!

तो शब्द कानी पडताच ते धारकरी जाग्यावर थांबले आणि नारायण कडे पाहत विचारु लागले...कोण कोण तुम्ही......?
पुढच्या क्षणी त्या चौघांनी हात जोडून त्या चौघांची माफी मागितली व तो वृद्ध माणूस बोलू लागला....

तुम्हाला अगोदर परवली शब्द सांगायला काय झाले होते ?
बिनकामी जीवानीशी गेला असता...चला आत या....असे म्हणून त्याने चौघांना आत घेतले..!
मंदिराच्या आत असणारी दांनपेटी त्या चौघांपैकी दोन मावळ्यांनी उचलली आणि एक मशालवाला आत उतरला....त्या पेटीच्या आत मधून दगडी पायर्या आत जाणाऱ्या होत्या...!

त्या चौघांनी सखाराम व त्याच्या साथीदारांना आत उतरवले आणि पेटीची दार लावून एका मागोमाग एक चालू लागले......बराच वेळ चालले आणि आत एका विस्तीर्ण कक्षात पोहचले...!

त्या कक्षात सर्वत्र समई तेवत होत्या,भिंतीवर ढाल तलवारी अडकवल्या होत्या...!
समोर लांबसडक बांबूच्या ठासणीच्या बंदुकीत दारू ठासत एक शिलेदार मग्न होता...
बाजूला एका मंचकावर ठेवलेल्या एका नकाशा भोवती मावळ्यांची बैठक सुरु होती...

सखाराम व त्याचे साथीदार भांभवल्या नजरेने सारे पाहत होते...एका कक्षातून दुसऱ्या कक्षात काही मावळे जडी बुटी कुटून औषध बनवत होते..तर काहींच्या समोर नकली दाढी मिशी..फकीर सन्याश्याची वस्त्रे पडली होती....!

ज्याने सखाराम व त्याच्या साथीदारांना त्या गुहेत गुप्तवाटेने आणले तो वृद्ध माणूस हसत हसत सखाराम ला बोलला....गड्यानो,ही आमची हेरांनी गुप्त जागा.
इथे आम्ही स्वराज्यातील सर्व हेराकडून आलेल्या निरोपाचे पृथकरण करतो व योग्य कारवाई करतो..!
इथून केवळ रायगड नव्हे तर साऱ्या स्वराज्यातील हेरांना काय हवे नको ते पोचवले जाते..!

येड्यानो,परवली शब्द सांगितल्या शिवाय आपले काम होत नाही,हे माहिती असून सुद्धा तुम्ही वेळ केला सांगायला...हकनाक जीव गेला असता कि...तो वृद्ध पुन्हा हसू लागला व ते सर्व चालत पुन्हा एका तिसऱ्या कक्षात वळाले....!

सखाराम ने मनात विचार केला की आपण हेरच आहोत असा बहुतेक सर्वांचा समज झालेला दिसतोय....पण,जर हेर नाही हे कळाले तर पुन्हा मारतील या विचाराने तो गप्प झाला....

त्या कक्षात काही फितूर हरामखोर दगाबाज लोकांना पकडून त्यांना उघडे करुन पट्ट्याच्ने मारले जात होते...आर्ट किंकाळ्या व रक्ताचे डाग याने तो कक्ष हादरुन गेला होता....

भयभीत नजरेने सखाराम ते पाहत त्या वृद्ध माणसाच्या मागे चालत परत दुसऱ्या कक्षात जाऊ लागले.....

त्या कक्षात समोर दोन भालाईत पहारा देत उभा होते...त्यांना पाहून त्या वृद्धांने त्यांना सवाल केला....

वस्ताद काकांना भेटायचे आहे.....नाईकांच्या खासगीतील परवली च्या शबुद घेतल्यात या चौघजनाणी... नाईकांची खास माणसे असावीत...यांचे काही काम आहे महाराजांच्या कडे...वस्ताद काकांना वर्दी द्या.....उंबराच फुल उगवलं आहे....!

त्या पहारेकऱ्यांनी मान हलवली आणि दरवाजा उघडून आत गेले.....आणि काही क्षणात बाहेर आले व सांगितले की त्या चौघांना फक्त आत पाठवा बाकीजन निघून जावा वर मंदिरात...!

जी....असे म्हणत तो वृद्ध मागे फिरला व सखाराम व त्याचे साथीदार त्या कक्षात गेले व बाहेरुन कक्ष बंद केला गेला....!

समईच्या मंद प्रकाशात समोर आई तुळजाभवानीची मूर्ती दिसली...बाजूलाच तलवारी,भाले,बरचें,कट्यारी पूजल्या होत्या....!

वस्ताद काका हात मागे बांधून पाठमोरे उभे होते...त्या चौघांची चाहूल लागताच ते मागे वळाले.....अतिशय धीरगंभीर मुद्रा कल्लेदार मिशा,वार्धक्याने पंढरी पडलेली दाढी पण डोळ्यात विलक्षण तेज...अंगापिंडांने मजबूत असणारी काकांची शरीरयष्टी पाहिली आणि खंडोजीने काकांचे जे वर्णन सांगितले होते त्याची अनुभूती आली...!

रामराम गड्यानो....जय भवानी ...असे बोलत काकांनी त्या चौघांना नमस्कार घातला.
त्या चौघांनी पण रामराम घातला.
समोरच्या लाकडी मंचकावर बसायची खून करत काका बोलले....बसून घ्या.....उंबराच फुल कवा कवा तर उगवत आमच्या ठाण्यात...!

सखाराम व ते चौघेही हसू लागले....!

वस्ताद काका बोलले.....बोला मंडळी,काय काम आणले आहे तुम्ही ?
तुम्ही जो परवली चा शब्द घेताय त्या अर्थी तुम्ही बहिर्जी नाईकांच्या एकदम विश्वासातील लोक आहात....शब्द कसा व कोणी दिला हे विचारायचा सुद्धा आमचा हक्क नसतो जेव्हा हा शब्द घेऊन कोणी येतो...!
ज्या अर्थी हा शब्द तुम्ही बोलला,त्याअर्थी कोणतेही कारण न सांगता तुमचे काम केलेच पाहिजे...!

काकांच्या त्या बोलण्याने सखाराम व त्याच्या साथीदारांना कळून चुकले की खंडोजी जे बोलत होता त्यातील शब्द आणि शब्द खरा आहे....एक दीर्घ श्वास घेऊन सखाराम ने सारी कहाणी सांगितली...!

टकमक टोक-कडेलोट-नरभक्षक वाघ-वस्तीवर हल्ले...सर्व काही सांगून फक्त एकदा महाराजांची भेट घडवा अशी विनंती केली...!

काकांनी शांतपणे सर्वकाही ऐकून घेतले आणि मोठा उचश्वास टाकत बोलले....चला,तुमची समस्यां लय मोठी आहे,पण लई पुण्याचे काम आहे हे...तुमची वाडी वस्ती सुखी झाली पाहिजे...उद्या दिवस उगवायला आपण रायगड च्या चित दरवाजातुन गडावर जाऊ..
.!

आता काहीतरी खाऊन झोपी जा...सकाळी भल्या पहाटे निघू...!

सखाराम व त्याच्या मित्रांना आनंद गगनात मावत नव्हता...चार दिवस मरमर चालून इथवर आल्याचे चीज होईल असे वाटत होते आता...खंडोजी ला भेटून त्याच्या पण पायावर डोकं टेकवायच आपण...गावात बोलवून मिरवणूक काढायची त्याची असा विचार करत ते चौघेही झोपी गेले....!

पहाट झाली...हेरांचे ते मुख्य ठाणे मात्र रात्रदिवस जागेच असते.
कोणाला तरी पकडून आणून मारत असत तर कोणी हेर जखमी होऊन उपचाराला येत होता..कोणी भावी योजनांचे,युद्धाचे नियोजन करत होता तर कोणी कपडे काढून व्यायाम करत होता..!

वस्ताद काका व ते चौघे लवकर तयार झाले व त्या कक्षातून निमुळत्या होत गेलेल्या चोरवाटेने बाहेर पडू लागले..!

एका विस्तीर्ण गुहेत ती चोरवाट येऊन संपली..समोरच एक तपस्वी कुबडी घेऊन समाधिस्त झाला आहे असे दिसत होते...त्याच्याकडे पाहत वस्ताद काका बोलले.....जय रोहिडेश्वर....!

काकांच्या त्या आरोळीने समाधीचे ढोंग करुन बसलेला तो हेर जागा झाला व बोलला....जय जय रघुवीर समर्थ...."

आणि दुसऱ्या क्षणी ते दोघेही हसू लागले...!

ती गुहा बाहेरुन खुली होती.
सकाळची कोवळी किरणे गुहेच्या आत येत होती.
उगवणाऱ्या सुर्यनारायणाकडे पाहत वस्ताद काका बोलले...चला फक्त अर्ध्या फर्लांगावर चित दरवाजाच्या हमरस्त्याला आपण लागू....!

ते अवघड कडेकपारी ओलांडून चालत चित दरवाजाजवळ आले.
पाऊस रिमझिम कोसळत होता त्यामुळे वाटेवरचे गस्तीचे पथक दिसले नाही...पण चित दरवाजाजवळ कोणीही दिसत नव्हते..!

काका समोर आले व त्यांनी मोठ्या आवाजात सूचना केली....कोण आहे का ???
दरवाजा खोला...?

हे शब्द कानी पडताच एक धिप्पाड मावळा दरवाज्यावरुन हातात असलेली ठासणीची बंदूक त्या पाच जणांवर रोखत बोलला.....

"खबरदार....पुढे यायचं नाय बिलकुल...बंदूक गच्च भरल्या दारुनं... फुडं ईशीला तर एका डागात ढगात पोचशीला....तुमास्नी एकदाच ईचारतो...परवली चा शबुद सांगा.....जर चुकलासा तर मेलासा... इचार करुन सांगा.....सरळ चित दरवाज्यात येतायसा....बगू सांगा शबुद.....

असे म्हणताच वस्ताद काका हसले व म्हणाले......पौर्णिमेचा चंद्र....."

•●क्रमश●

बाजींद भाग क्र.२७

सखाराम आणि त्याचे सवंगडी स्तब्ध उभे होते.
गेले दोन चार दिस या खंडोजी आणि सावित्रीच्या तोंडून जे काही ऐकत आलोय त्याचे उद्यापन म्हणजे बहिर्जी नाईक होते कि असे वाटू लागले होते.
डोके सुन्न झाले होते चौघांची...!
ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर पेलली पण कुठेही नाव प्रसिद्ध केले नाही.
काय विलक्षण माणूस असेल हा बहिर्जी...!

खंडोजी बोलू लागला..
लय अजब रसायन आहे बहिर्जी नाईक म्हणजे..!
10-10 दिस अन्नपाणी शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो...!
धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!
तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा...!
शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो...!
माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही,जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा..!
मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड...!
खर सांगतो गड्यानो...हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..!

आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक...!
गड्यानो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास...!

पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक....!

महाराजांचा अभिषेक सुरु होता,महाराज मुक्त हस्ताने गरीब फकिराना ओंजळ भरभरून द्रव्य दान करत होते आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता...!
जक्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता आणि डोळे भरून महाराजांना पाहत होता.....महाराजांनी जेव्हा त्या फकिरला पाहिले तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला...!
ओठावर मिशा नव्हत्या तेव्हा पासून या बहिर्जी आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले....आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे,राज्य आनंदात आहे,आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली तो बहिर्जी फकीर होऊन याचकांच्या रांगेत उभा आहे...!
काय बोलावे या प्रकाराला....कसली वेडी माणस असतील ती...!
एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे तुम्ही आम्ही त्या बहिर्जी नाईकांच्या काळजाला कधी समजू शकू का ?
स्वतःच्या बायकोला सुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हते की ज्याच्या सोबत मी सात जन्माचे बंधन बांधले आहे....तो खुद्द स्वराज्याच्या गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक आहे....इतकी कमालीची गुप्तता...!
आणि एवढा विलक्षण त्याग करुन राजे त्यांना देत तर काय होते ओ ...?
काहीच नाही....उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न...माघारी येईल का नाही शाश्वती नव्हती...!
हि वेडी खुळी माणसे अशी का जगली असतील ??
बस्स...एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नव्हते....!

पण,ज्याच्या खांद्याला खांदा लाऊन हे सारे ज्याने भोगले होते त्या खंडोजीला मात्र समजून पण उमजत नव्हते....!

यशवंतमाची अजूनही मराठ्यांशी वैर घेऊन दिमाखात मिरवत होती आणि त्याच माचीच्या राजकुमारी बरोबर विवाहाच्या बोहल्यावर खंडोजी चढत होता...!

सारी यशवंतमाची आनंदात होती.
सर्वजण लग्न मंडपात जमा झाले होते.
राजकुमारी सावीत्री मनस्वी आनंदी होती.
खंडोजी चे स्वप्न पूर्ण होत होते...!
अंतरपाट धरुन पंडितजी मन्त्र म्हणू लागले.
देवा ब्राम्हणांच्या साक्षीने खंडोजी व सावीत्री कायमचे एक होणार होते.....!
सारा आनंदी आनंद होता....!

पण,इकडे बाजींद ने समोर उभ्या असलेल्या बहिर्जी नाईकांना पाहून मात्र स्वतःचे भान हरपले होते..!
ज्याच्या केवळ गोष्टी ऐकून रक्त उसळत असायचे,असा महान गुप्तहेर चक्क माझ्या समोर उभा आहे,ही कल्पनाच त्याला आनंदित करत होती..!

बाजींद व त्याची सेना तलवार दोन्ही हातात आडवी धरुन गुडघ्यावर बसली व मान खाली घेत बहिर्जी नाईकांना शरण गेली...!

नाईक पाय उतार झाले...तोंडाला बांधलेले काळे अवलान त्यांनी सोडले व धीरगंभीर पाऊले टाकत बाजींद जवळ आले व दोन्ही खान्दे धरुन उठवत म्हणाले.....!

बाजींद.....तुमच्या शौर्याच्या कथा मी जाणून आहे.
कोनापुढे तुम्ही झुकने हे तुम्हास शोभा देत नाही...उठा.!

बाजींद उत्तरला....नाईक...तुम्ही कोण आणी काय आहात हे केवळ आम्ही जाणू शकतो इतर कोणीही नाही.
केवळ आपली भेट घडावी या साठी आपल्या खंडोजी ला आम्ही चंद्रगड ला बोलवून घेतले व आमच्या पूर्वजांची व प्राण्यांचे अद्भुत आवाज ओळखण्याचे विज्ञान लिहलेली वही तुमच्या कार्यासाठी दिली...."

बहिर्जी हसले...ते मोठ्या विलक्षण पोट तिडकीने बोलू लागले......

गूढ ज्ञान....आणि स्वराज्य...!
माफ करा बाजींद......शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याला आजवर ना कोणत्या गूढ ज्ञानाची गरज भासली होती ना इथून पुढे भासेल....अहो 350 महाराष्ट्र गुलामगिरीत धडपड करत होता.
जुलमी अगंतुकानी महाराष्ट्राची मसनवाट करुन टाकली असताना आमच्या शिवाजी राजांनी साधारण माणसाना घेऊन असामान्य इतिहास निर्माण केला.
गुलामगिरी मातीत घालून स्वाभिमानाचे ,भगव्या झेंड्याचे राज्य आणले ते केवळ मृतवत अंतकरणात स्वाभिमान जागृत करुन....लाथ घालाल तिथे पाणी काढाल ही भावना आमच्यात जागवून आमची मने मोठमोठी महायुद्धे जिंकायला तयार केली ती केवळ महाराजांनी....आणि अशी कणखर मने साक्षात कळीकाळाच्या सुद्धा हाका ऐकू शकतात तिथे ही जनावरांची भाषा जाणणे हे तर फार किरकोळ गोष्ट आहे गड्यानो....तुम्हाला जर शिकायचेच असतील ते देव,देश आणि धर्मासाठी हसत हसत मारु आणि मरु शकणारे शिवाजी शिकायला हवेत...!

बहिर्जी बेभान होऊन बोलत होते आणि बाजींद सर्वांगाचे कान करुन ते सर्व ऐकत होता.
आत्ता पर्यंत "बाजींद" हेच जगातील सर्वात श्रेष्ठ ज्ञान समजत असलेल्या बाजींद ला बहिर्जी नाईकांच्या तोंडून ब्रम्हज्ञान ऐकायला मिळत होते..!

पण,चंद्रगड ची गुप्तता आसेतु हिमाचल अबाधित राखणे हे बाजींद चे कर्तव्य होते.
नाईकांच्या हाकेला कधीही धावून येऊ असे आश्वासन देऊन बाजींद ने बहिर्जी नाईकांची रजा घेतली व टाकटोक तिथून चंद्रगड च्या रस्त्याला निघाले....!

नाईक मागे फिरले....आता त्यांची चवताळलेली नजर वळाली ते यशवंतमाचीकडे.....!

दरम्यान राजे येसजीरावांच्या व सावित्रीने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भीमा जाधव व त्याचे सहकारी यशवंतमाची च्या जंगलात फिरताना मराठ्यांच्या हाती लागले...!
वस्ताद काकांनी ते कोण कुठले याची खडा न खडा माहिती काढली..एका शत्रूचा शत्रू जर आपल्याला मिळाला तर तो मित्र होतो....!
काकानी जर भीमाने आम्हाला यशवंतमाची कडे जाणारी गुप्तवाटेने नेले तर यशवंतमाची ची जहागिरी त्याला देऊ असे कबूल केले..!
सुडाच्या संतापात चवताळलेल्या भीमाने हा कौल त्वरित स्वीकारला....!

आणि भीमाने यशवंतमाची कडे जाणारी गुप्तवाट मराठ्यांच्या फौजेला दाखवून दिली....!

इकडे यशवंतमाची त साऊ आणि खंडोजी चे विधिवत लग्न पार पडले होते...!

एका उंच डोंगराच्या पायथ्याला खंडोजी व ते चौघे थांबले...!
दम खात खंडोजी बोलला....
बरं मंडळी...रामराम घ्या आमचा...!
वर डोंगरावर एक मंदिर हाय...तिथं जो कोणी आसल त्याला "उंबराच फुल" ह्यो सांकेतिक परवलीचा शबुद सांगा...त्यो तुम्हास्नी म्होरं वस्ताद काकाकडं घेऊन जाईल...त्यांना सांगा तुमची अडचण,ते महाराजांच्या कानी त्वरित घालतील तुमची व्यथा...पर एका गोष्टीच भान पाळा.... चुकून बी मी तुम्हाला हितवर आणलय सांगू नगासा...!
जातो म्या,
परत भेट होईल असं वाटत नाय...लय कामं पडली हायती स्वराज्याची...माझी आण तुमची साथ आता हितवर च...!

सखाराम आश्चर्याने बोलला....अहो खंडोजीराव..आस का बोलताय ?
खंडोबाच्या आशीर्वादान जणू तुम्हास्नी आम्हा गरिबांच्या मदतीला धाडलय....तुमची कथा ऐकून रगात उसळतया गड्या....लय लय भोगलया तुम्ही खंडोजीराव.......पुढं काय झालं हे तर सांगा आण मग जावा...."

खंडोजी हासत बोलला....नाही सखाराम....सुर्य मावळला की मला जावे लागते रे.....आणि आजची ही माझी शेवटची रात्र...तुम्ही बिगीन वर जावा....तुमचा गाव कायमचा सुखी व्हणार....

डोळ्यात आलेले अश्रू पुसत खंडोजी तरातरा चालत जंगलात जाऊ लागला....त्याच्या त्या अधीर शब्दात एक प्रकारची उदासीनता जाणवली....सखाराम ला का कोणास ठाऊक असे वाटू लागले की जणू माझ्या कोणीतरी जवळचे मला सोडून जात आहे..

बाजींद भाग क्र.२६

वाऱ्याच्या वेगाने जंगलातील हिंस्त्र प्राणी व किडा कीटक मुंग्यापासून ते बलाढ्य हत्ती पर्यंत सर्वच्या सर्व प्राणी बाजींद च्या हुकमाचे "बाजींद" होते..!
ज्यावर बाजींद ची तलवार रोखली जाईल त्याचा प्राण त्याच्या शरीरातून बाहेर काढणे हेच एकमेव काम त्यांचे होते.

वस्ताद काका व सूर्यराव बेरड यशवंतमाची वर हल्ल्याच्या वाटाघाटीत मश्गुल असताना दूरवर जंगली श्वापदांचा आवाज कानावर येऊ लागला,प्रत्येक क्षणी तो आवाज वाढतच होता.
त्या आवाजाने बेरड व काकांची तुकडी भयकंपित होऊन वर खाली आजू बाजू पाहू लागली.!
काही वीरांनी जुमानून उसण्या अवसानाने तलवारी उपसल्या... क्षण..दुसरा क्षण...मोठमोठी झाडे उपटून समोर दिसेल त्याच्यावर आदळत हत्तीचे कळप ,या झाडावरुन त्या झाडावर मुक्त झेपा घेत व त्याबरोबर आकाशपातळ दनानून सोडणाऱ्या डरकाळ्या फोडत वाघ सिंह दिसू लागले..सर्वच्या सर्व प्राणी बेफाम दौडत होते आणि मागोमाग बाजींद चे अश्वदल चौखूर दौडत येत होते..!

ते चित्र पाहताच भल्याभल्या सुरमा वीरांची छाती कचदिल होत होती..!

त्या वाघ सिंहाचा एका झेपत शेकडो वीर मरु लागले होते...हत्ती सोंडेत धरुन एका एका वीराला नारळ आपटून फोडतो तसे आपटत होते....!
केवळ मरणासन्न आर्त किंकाळ्या..आणि यातून जे वाचत होते ते बाजींद च्या तीरकमठयाचे शिकार बनत होते....!

अशा वेळी जो तो एकच शब्द बोलत होता...पळा..!
सारेच पळत सुटले होते...पण वेळ आणि काळ याचे गुणोत्तर इतके अचूक होते की पळणारा काही क्षणात भक्ष बनत होता.!

साराच गोंधळ..!
वस्ताद काका व सूर्यराव ला समजेना की काय प्रकार होत आहे...ते सुद्धा समजून घेण्याच्या अवस्थेत नव्हते...कुठेतरी गुप्त जागा शोधत ते सुद्धा धाऊ लागले....!
एक प्रचंड हत्ती सूर्यराव च्या मागे लागला.
त्याने त्याच्या घोड्याचा मागचा पाय उचलून घोड्याला हवेत भिरकावले.
सूर्यराव घोड्यावरून बाहेर फेकला गेला...!
सूर्यराव ने तलवार उपसली आणि त्या चवताळलेल्या हत्तीच्या सोंडेवर जोरदार हल्ला केला...!
सपदिशी झालेल्या वाराने हत्तीची सोंड तुटून पडली...!
शांतपणे वाहणारे नदीचे पाणी वादळी पावसाच्या पाण्याने लालभडक होऊन वहावे अगदी तसेच हत्तीच्या सोंडेतून रक्त पडू लागले...!
हत्ती ची ची ची ची करत मागे फिरला व गिरकी घेऊन खाली कोसळला... जागीच गतप्राण झाला होता..!
हत्ती मारला याचा उरात अभिमान घेऊन सूर्यराव ती रक्ताळ लेली समशेर घेऊन छाती फुगवून हसू लागला....

इतक्यात

बाजींद च्या तिर कमठयातुन सूर्यराव च्या मस्तकाचा वेध घेतलेला बाण सु सु सु करत आला व क्षणात सूर्यराव चे मुंडके धडावेगळे करत खाली कोसळला...!

इतक्या वेगाने आलेल्या बाणामुळे सूर्यरावला त्याचे शिर कधी तुटले हेच समजले नाही..!

शरीराशिवाय ते तलवार घेतलेले शरीर तसेच उभे होते.
ते दृश्य पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली.

आता सर्व संपल्यात जमा होते.
बाजींद ने सूर्यराव चा खात्मा करायची केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली होती.
त्याच्या मुखावर समाधान होते की बाजींद च्या गूढ ज्ञानाचा साक्षीदार आता संपला आहे...!

वस्ताद काकांनी सूर्यराव चे शिरावेगळे धड पहिले आणि त्यांचे क्षत्रिय रक्त उचंबळून आले..!
त्यांनी दोन्ही हातात पट्टे चढवले आणि आता मारु मरु युद्धाची आरोळी ठोकली....!

सुदर्शन फिरावे तसा पट्टा फिरत होता..!
जो आडवा येत होता त्याची खांडोळी उडत होती.
आसपास बिथरलेली जन्गली जनावरे सुद्धा त्या पट्ट्याच्या वर्तुळात जाऊ शकत नव्हती...!
वस्ताद काकांच्या आक्रमणामुळे बाजींद व काकांच्यातील अंतर कमी होऊ लागले..!

आता,बाजींद ला युद्धासाठी सज्ज व्हावे लागणार होते....त्यांनीही हातात पट्टे चढवले व काकांशी सामोरा गेला...!

पट्ट्या वर पट्टे आपटून ठिणग्या पडू लागल्या...कोण कोणाला कमी नव्हते...पण बाजींद ची निष्पाप श्रद्धा व तपश्चर्या नक्कीच काकांपेक्षा मोठी ठरली आणि एका वर्मी घावाने काकांचा पट्टा खोबणीतुन तुटला....!
संधी मिळताच काकांच्या छातीवर जोरदार लाथ घालून बाजींद उभा राहिला...!
त्या लाथेने तोल जाऊन काका खाली पडले....!
काका खाली पडते न पडते इतक्यात आसपास उभे असणाऱ्या वाघ,सिंह,लांडगे,कोल्हे एकाच वेळी त्यांच्यावर तुटून पडले...काकांनी आता आपले जीवन संपले आशा आवेशात डोळे घट्ट मिटले आणि मृत्यूस तयार झाले...!

ति जनावरे आता काकांच्यावर हल्ला चढवणार...

इतक्यात

जंगलाच्या पूर्व दिशेला तोंडाला काळे अवलान बांधून पांढऱ्याशुभ्र घोड्यावर उभा असणाऱ्या एका धीरगंभीर योध्याने चित्रविचित्र आवाज काढून जन्गलातील त्या बिथरलेल्या प्राण्यांना जागीच स्तब्ध केले....अजून अधिक तीव्र व गूढ आवाज ऐकून ते सारे हिंस्त्र प्राणी गुमान मागे सरकू लागले....!
अजून काही वेळ गेला आणि ते सारे प्राणी दाट जंगतलात निघून गेले.........

हे सारे दृश्य बाजींद पाहत होता..!
कोण...?
जो बाजींद च्या गूढ विद्येचा जाणकार आहे..?
जो मला माहिती नाही,पण बाजींद ची ती गूढ विद्या जाणतो....?

बाजींद ने हातातील पट्टे खाली टाकले आणि त्याच गूढ भाषेत केवळ त्या योध्याला समजेल असे विचारले...

"अरे,महान योध्या ?
तू कोण आणि काय तुझे नाव गाव....?
तुला हे बाजींद चे अती पवित्र ज्ञान कसे माहिती,जरा मला सांग कृपा करुन..."

त्याच्या प्रश्नावर त्या योध्याने त्याच भाषेत उत्तर दिले....."

मी कोण हे तुला सांगायची गरज नाही..आणि तू जसे म्हणतोस की हे ज्ञान बाजींद चे आहे...तर तुझ्या माहितीसाठी सांगतो....मला कुठल्या बाजींद ने ही भाषा शिकवली नाही.....ही भाषा मला शिकवली आहे ते माझ्या आत लपलेल्या योध्याने...माझ्या प्राणप्रिय ध्येयाने...या भाषेचा उगमच जर विचारशील.....तर ऐक........अश्या अनेक भाषा विद्या ज्या महान पुरुषापुढे थिटी पडतील असा पुरुष आहे..."राजा शिवछत्रपती "

राजा शिवछत्रपती......

खंडोजीच्या अंगावर काटे व डोळ्यात पाणी तरळत होते जेव्हा त्याच्या मुखातून शिवाजी महाराजांचे नाव येत होते...!
एकाग्र मनाने सखाराम व त्याचे सवंगडी ती कथा ऐकत होते.
भरल्या डोळ्यांनी ती कथा सांगत खंडोजी रडू लागला होता...!
काही क्षणात तो सावरला ...तो सावध झाला.....!

सखाराम बोलला....

खंडोजीराव...ज्या गूढ ज्ञानापाई तुमी सारं रामायण केलं ते गूढ ज्ञान बाजींद व्यतिरिक्त कुठल्या योध्याला माहिती होते ओ ??
कोण असा योद्धा होता जो वस्ताद काकांना वाचवायला एवढ्या जंगलात आला होता ज्याला पण बाजींद सारखी जनावरं बिथरुन टाकायची कला माहिती व्हती...?

खंडोजी शांतपणे सखाराम कडे पाहून हसू लागला....!

योद्धा....मी सांगतोय ना पहिल्या पासन....अरे त्यो योद्धा नव्हता....ना शिपाई होता....ना देव होता....ना राक्षस होता......तो साधा माणूसच होता रं...... फक्त त्याचा देव शिवाजी होता....त्या देवासाठीच त्यानं सार आयुष्य ओवाळून टाकलं होतं.....

ते होते...खुद्द बहिर्जी नाईक......

•●क्रमश●•

बाजींद भाग क्र.२५

एव्हाना दिवस उजाडला होता.
सकाळची कोवळी सूर्यकिरणे घनदाट धुक्याला जाळत वातावरणात उब निर्माण करत होती.

सुर्याची कोवळी सुर्यकिरणे सखाराम च्या मुखावर पडली आणि त्याला जाग आली.
सुर्यनारायणाच्या झिलमीत किरणात समोरच खंडोजी बसला होता.
जणु सुर्य त्राटक लावले आहे..त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु येत होते.

सखाराम दचकून जागा झाला व त्याच्या साथीदारांना जागे केले.

आसपास केवळ माळरान होते,ते जिथे झोपले होते तिथे केवळ सपाट खडक होता..!

सखाराम व त्याच्या साथीदारांना काहीच समजत नव्हते...रात्री सावीत्री समोर व शिरक्यांच्या छावणीत बसून खंडोजी व सवित्रीचा भुतकाळ ऐकत कधी डोळा लागला समजला नाही,आणि जाग आली या पठारावर..आणि समोर खंडोजी ला पाहुन तर त्याहून अधिक धक्का बसला...!

मोठ्या आवाजात सखाराम,सूर्याकडे पाहत बसलेल्या खंडोजीला बोलला.....

तुम्ही कधी उगवला खंडोजीराव ??

सखाराम च्या बोलण्याने भानावर आलेल्या खंडोजीने सावध होत आपले अश्रूंनी डबडबले डोळे पुसले व चौघांकडे पाहुन बोलू लागला...

"मी ?
हे काय तुम्ही उठायच्या अगोदर इथे येऊन बसलो होतो..."

आणि रात्री अचानक कुठे गायब होता तुम्ही ?
रात्री आम्ही राजे शिरक्यांच्या छावणीत होतो आणि आत्ता इथे कसे काय आलो..? सखाराम बोलला...!

अहो,रात्री हेरगिरी करावे लागते...मी शिवरायांचा निष्ठावान गुप्तहेर आहे...असतात न सांगण्यासारख्या कामगीरी...!
तुम्ही गाढ झोपेत होता आणि शिरक्याची छावणी इथून दूर गेली...मला भेटले ते सारे...फक्त तुमची झोपमोड करणे त्यांना ठीक वाटले नाही...!
सावीत्री व मी उद्या भेटणार आहे..त्या अगोदर तुम्हाला वस्ताद काकांच्याकडे घेऊन जातो...म्हणजे तुमचे काम मार्गी लागेल..व मी सवित्रीसह आमच्या मार्गाने जाऊ..."

खंडोजीच्या स्पष्टीकरनाणे मात्र सखाराम ची शन्का दूर झाली.
आसपास च्या परिसरात सुद्धा रात्रीच्या छावणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या त्यामुळे शंका दूर झाली...."

समोरच एका गाठोड्यात खाण्याचे पदार्थ पाहून सखाराम बोलला...

हे जेवण तुम्ही आणलं काय खंडोजीराव ?

नाही...हे सावित्रीने तुमच्यासाठी ठेवले आहे...दोन घास खाऊन घ्या...आपण पुढचा प्रवास करु..!

जेवनाकडे पाहताच चौघांचेही चेहरे खुलले..ते चौघेही भाकरीचा तुकडा मोडून खाऊ लागले...."

पोटात थोडी भर गेल्याने सखाराम व त्याचे सोबती तरतरीत झाले.

मल्हारी,सर्जा,नारायण व सखाराम चौघेही आनंदी होते.

खंडोजी बोलला...गड्यानो आज फक्त एक दिवस..आज मी तुम्हाला वस्ताद काकांच्या सुपूर्द करतो,तुम्ही उद्याच राजश्री शिवाजीराजांच्या खासगी विभागात पोचते व्हाल..तुमची समस्यां कायमची मिटली जाईल......फक्त रात्र होण्याच्या आधी आपल्याला त्या गुप्तवाटेने जंगलात केवळ मला व काकांना माहिती असलेल्या गुहेत पोहचायचे आहे....

खंडोजीच्या बोलण्याने चौघे अजून आनंदी झाली...!

ते पाचही जण चालू लागले....!

धाडस करुन सखाराम बोलला....

खंडोजीराव..रात्री सावीत्री बाईसाहेब बोलत होत्या तुम्ही शिवाजीराजांशी गद्दारी केली असे बहिर्जी नाईकांचे मत झाले होते....ती कथा ऐकता ऐकता झोप आली...तुम्हाला राग येणार नसेल तर ती कथा पुढे संगशीला का ??

एक दीर्घ श्वास घेऊन मल्हारी बोलला....

राग ..?
कसला राग गड्यानो...आता खन्डोजी च्या आयुष्यात मानवी रुसवे फुगवे उरलाच नाहीत...आता जगतोय ते केवळ उपकारासाठी...
"

असे बोलून खंडोजी त्याचा भविष्यकाळ पुन्हा कथन करु लागला....!

यशवंतमाची

राजे येसजीराव शिरक्यांच्या तालमीत रात्रभर विचारात मग्न असलेल्या खंडोजीला काहीच सुचत नव्हते....भीमाला लढायला आपण उद्युक्त करुन चूक केली असे त्याला वाटत होते...!
एकतर स्वराज्याशी हरामखोरी आणि सवित्रीचा विरह दोन्ही गोष्टी त्याला सतावत होत्या....!
डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू ओघळत होते..!

सूर्यराव बेरड आपल्या नेकजात इमानदार कडव्या फौजेला घेऊन यशवंतमाची शेजारच्या डोंगरदरीत लपला होता.
त्यांच्यावर कोणी हल्ला चढवला याचे रहस्य मात्र त्याला उलगडत नव्हते.

इकडे बाजीन्द व त्याच्या फौजेला सूर्यराव ला शोधून मारल्याशिवाय चैन पडणार नव्हता...एकदा जर का "बाजींद" चे गूढ दुसऱ्या व्यक्तीला समजले तर मात्र 100 वर्षाच्या तपस्येची राखरांगोळी होणार हे मात्र नक्की होती.!

दुसरीकडे वस्ताद काका मात्र यशवंतमाची उद्याच्या उद्या स्वराज्यात आणण्यासाठी मावळ्यांच्या प्रमुख शिलेदारांची बैठक घेत होते....ते मोठ्या आवेशाने बोलू लागले....

गड्यानो,उद्या जर यशवंतमाचीवर भगवा नाही फडकला तर सारी मराठेशाही शेण घालेल तोंडात आपल्या....यशवंतमाचीवर हल्ला चढवायला आपली फौज अपुरी आहे,पण ज्यादा कुमक यायला खूप वेळ जाईल...त्यापेक्षा एक युद्धनीती वापरायची आहे.....

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र...हाकेच्या अंतरावर सूर्यराव बेराडाँची फौज आहे.
त्यांचा पण यशवंतमाची बरोबर जुना बदला आहे,याचा फायदा उठवत त्यांना सोबत घेऊया...यशवंतमाचीच्या हद्दीत असल्याने जंगलवाटा त्यांना चांगल्याच ठाऊक आहेत...!

गड्यानो,तयारीला लागा....!

वस्ताद काकांचा आदेश मिळताच हजार एक मावळ्यांचे पथक क्षणात तयार झाले.
केवळ पायी हल्ला चढवायचा असल्याने पायीच यशवंतमाचीकडे कूच करावी लागणार होती.

वस्ताद काकांनी फौजेचे दोन भाग केले.
यशवंतमाचीच्या पाठीमागून अर्धी सेना जाऊन रात्रीच्या अंधारात दबा धरुन बसेल,इशारतीची खून मिळताच वाऱ्याच्या वेगाने यशवंतमाचीवर मागून हल्ला चढवायचा..उर्वरित सेना घेऊन सूर्यराव बेरडला गाठून मदतीची विनंती करुन समोरुन हल्ला करायचा..!

बस्स,अशी चोख योजना आखून पुढच्याच क्षणात सारी सेना वाटेला लागली..!
प्रत्येक मावळा शिस्तबद्ध होता.
शिस्त हा शिवरायांच्या फौजेचा आत्मा होता..!

दरम्यान,बाजींद च्या सेनेने प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही सूर्यराव सापडत नसल्याने,अर्ध्या धारकर्यांना चंद्रगड कडे जाण्याची आज्ञा केली व पाच पन्नास धारकरी सोबत ठेऊन त्याने सूर्यराव ला शोधून काढण्यासाठी आपल्याजवळ असलेल्या बाजींद च्या गूढ विद्येचा वापर करुन माकडे,घारी-गिधाडे,किड्या मुंग्यांना सांकेतिक आवाज काढून बोलावण्याचा निर्णय घेतला....

बाजींद ने एकाग्र ध्यान करुन आत्मसात केलेल्या गूढ ज्ञानाने सांकेतिक आवाज आसपासच्या वातावरणात सोडले..........
कीटक,मुंगी,घार, गिधाड यांच्या पर्यंत त्यांच्या भाषेत बोलून त्यांना आपले कार्य करायला लावणारे गूढ ज्ञान...खरोखर विलक्षण होते सर्वकाही...!

बघता बघता जंगलातील अणुरेणु शहारले आणि मुंग्यांनी,घार गिधाडांची गर्दी बाजींद च्या भोवताली जमली.....

एक विलक्षण हास्य त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते...जणू सृष्टीचा एक अशक्य भाग त्याचे स्वामित्व त्याच्याकडे असावे असे एकप्रकारचे हास्य होते ते....

त्याने त्या गूढ व विचित्र आवाजात सभोवतालच्या प्राण्यांना संदेश देणे सुरु केले....

सूर्यराव बेरड कुठे लपला आहे...त्याच्याकडे किती लोक आहेत...त्याच्याकडे लौकर जाण्याचा मार्ग काय...त्यांना जिथे आहे तिथे थोपवण्यासाठी मुंग्यांनी हल्ला चढवाव.. आणि या बदल्यात सर्व प्राण्यांना ताज्या मांसाची मेजवानी मिळेल असेही त्याने सांगून टाकले....."

त्याच्या त्या आदेशाने सर्व प्राणी त्वरित कामाला लागले व मजल दरमजल करत त्या गुप्त जागेत जिथे सूर्यराव यशवंतमाचीवर हल्ले करायची नियोजने करत होता तिथे पोचते झाले...

त्यागोदरच वस्ताद काकांच्या हेरांनी बातमी आणली की सूर्यराव बेरड कुठे लपला आहे...टाकटोक वस्ताद काका व धारकरी हाती पांढरे निशाण घेऊन सूर्यराव च्या गुप्त जागेत शिंग तुताऱ्या फुंकून सूर्यराव ला खून सांगू लागले...

शिवरायांची फौज ...?

नुकत्याच बाजींद च्या आकस्मित हल्ल्यातून वाचत गुप्त जागेत पुढे नियोजन करत बसलेल्या सूर्यराव ला शिवरायांच्या खूनेची चाहूल लागली व त्याने त्वरित निशाणबारदार पाठवून कोण,कुठून,कशासाठी आले आहे बातमी काढली.....,

बहिर्जी नाईकांची खास फौज वस्ताद काकांसह चर्चेसाठी सूर्यराव बेरड यांना भेटायला आली आहे...!

निरोप मिळाला...,

मोठ्या इतमामाणे सर्वांचे स्वागत झाले..!

इकडचे तिकडचे विषय संपवत काकांनी मूळ मुद्द्याला हात घातला...!

आमच्या एक हजार फौजेंसोबत जर तुमची हजार पाचशे फौज मिळाली तर यशवंतमाची सहज पडणार...!

उद्या सकाळी हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा माचीवर फडकला तर तुम्हाला त्याचे सरदार नेमु हा शब्द आहे आमचा....!

हे ऐकून सूर्यराव च्या चेहऱ्यावर हास्य उमलले व तो बोलू लागला...!

काका,मला आपला कौल बिलकुल स्वीकार आहे..पण,यशवंतमाचीचा पाडाव करणे इतकी सोपी गोष्ट नाही.
शेकडो चोरवाटा,निष्ठवान पैलवानांची फौज यासह अजून एक खास गोष्ट त्यांच्या ताफ्यात नुकतीच सामील झाली आहे ती म्हणजे तुमचे गुप्तहेर म्हणून माचीत शिरलेल्या खंडूकडे प्राण्यांचे गूढ आवाज व त्यांना आपल्या सारखे काम करायला लावणारे विलक्षण ज्ञान लिहलेली वही आहे....आता आधीच बिकट असलेली माची अजून बिकट झाली आहे..."

हे ऐकताच काकांना खंडू ने बोललेले शब्द खरे वाटू लागले...पण ती वही केवळ बहिर्जींला देईन असे त्याचे वचन पण आठवले...ज्या खंडोजी ला मी ओळखतो..तो प्राण देईन पण वचन तोडणार नव्हता....पण,पण आता काय उरले होते...स्वतःच्या बांधवांच्या खांद्याला खांदा लावून कुस्ती खेळाला त्यांचे गळे चिरायला ज्याला काही वाटत नव्हते तो स्वराज्याशी हरामखोरी करायला मागे पुढे कसा पाहिलं याची खंत काकांना होती...दीर्घ श्वास घेऊन ते बोलले....

सूर्यराव..यावर दुसरा पर्याय ..??

सूर्यराव उत्तरला....

यावर पर्याय एकच...माचीच्या आतून कोणी जर गुप्तवाट दाखवली तर माची संपली म्हणून समजा....!!

हे विषय सुरु असताना आभाळात घारी गिधाडांची गर्दी होती..आसपास मुंग्यांची दाटी उडाली होती आणि पुढच्याच क्षणी सर्व फौजेवर मुंग्यांची तिखट डंके बसू लागले आणि सर्वच्या सर्व अंग झाडून धावू लागले....एकेकाला पन्नास पन्नास मुंग्या....सर्वजण ती जागा सोडून धावून पठारी भागात आले व त्या मुंग्यापासून सुटका करुन घेऊ लागले....

दुसऱ्याच क्षणी घारी गिधाडांनी वस्ताद काका व सूर्यराव यांच्यात झालेली बातचीत व सूर्यराव चे ठिकाण बाजींद ला सांगितले....

क्षणात बाजींद ने सोबतच्या धारकर्यांना तयारीचे आदेश दिले आणि तो वीरांचा लोंढा पुन्हा सूर्यराव वर पडणार होता...पण आता अजून एक शत्रू वाढला होता तो म्हणजे वस्ताद काका...!

पण असो....बाजींद च्या गुप्ततेशिवाय जगात काहीं महत्वाचे नाही...चला रे....तलवार उचलणारे हात धडापासून वेगळे झाले पाहिजेत.....त्यांच्या सोबत जन्गलातील साप,विंचू,अजगर,वाघ सिंह,हत्ती चे थवेच्या थवे चवताळून ,बेताल ओरडत,किंचाळत धाऊ लागले......असे वाटत होते की आता यांच्या आडवे जो कोणी येईल त्याचे तुकडे पण वाटणीला यायचे नाहीत.......!

इकडे यशवंतमाची अजूनही विजयाच्या धुंदीत होती.
वास्तविक शत्रू पुन्हा येईल म्हणून योजना करायच्या सोडून भीमा स्वतःच्या लग्नाची स्वप्ने पाहत होता...!
सकाळीच तो राजांना भेटायला गेला होता...समोर राजकुमारी सावीत्री पण होती....!

भीमाला पाहून राजे बोलले....!

भीमा,तू यशवंतमाचीची अब्रू ,मान काल राखलास.
प्रत्यक्ष शिवाजीराजांच्या सेनेला पराभूत करणे म्हणजे आदिलशाही दरबारी मानाची गोष्ट..!
पण,तुझी सावित्रीची अट मला मान्य नाही मला माफ कर....!
सावित्रीला सूर्यराव बेरदडाच्या हल्ल्यातून वाचवणारा खंडेराय हा तिने पती म्हणून स्वीकारला आहे...!

हे ऐकताच भीमा संतापला....काय...?
खंडेराय ..?
राजे...जीवावर उदार होऊन केवळ साऊ साठी मी लढलो...आजवर फक्त तीच्यासाठी जगलो..!
नाही...मी लग्न करेन तर साऊ शी....भलेही मला खंडेराय चा खून करायला का लागू नये...असे बोलून त्याने समशेर उचलली आणि तरातरा तालमीकडे खंडेराय ला गाठून मारायच्या उद्देशाने तो निघाला....!

जाताना सावीत्री फक्त माझी आहे अश्या आरोळ्याने सारी माची तालमीजवळ आली होती..!

धाडदिशी त्याने तालमीच्या दरवाजाला लाथ मारली आणि तो आत गेला....!

राजे व साऊ सोबत हजारो यशवंतमाचीचे नागरिक धावत तालमीजवळ आले होते...आता भीमा खंडेराय ला जीव मारणार...ते तालमीच्या दरवाज्यातून आत जायला जाणार इतक्यात त्याच दरवाजातुन एकाच वेळी 3-4 पैलवान धाडकन बाहेर फेकले गेले...आणि आपल्या प्रचंड हातात भीमा ला अंतराळी उचलून खुद्द खंडेराय तालमीतून बाहेर आला व त्याला सावित्रीच्या पायात आदळून त्याच्या छातीवर पाय ठेऊन बोलू लागला..

सावीत्री......सावीत्री तुझी नव्हे...जन्मोजन्मी फक्त या खंडेरायाची आहे....तिच्यासाठी मी माझ्या देवाला विसरेन एकवेळ हरामखोर कुत्र्या...!

असे म्हणत त्याने तलवार त्याच्या छातीवर रोखली...पण त्वरित साऊ पुढे झाली व ती रोखत म्हणाली...नको खंडोजीराव...याला प्राणदान द्या....

याने माची वाचवून उपकार केलेत सर्वावर....याला प्राणदान द्या.....राहिली गोष्ट या सावित्रीची....हि साऊ फक्त आणि फक्त तुमचीच राहील ..

असे म्हणत तिने घट्ट मिठी खंडेरायाला मारली....!

उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवल्या व त्या विवाहाला जणू अप्रत्यक्ष संतमती दिली...!

भीमा व त्याच्या पाच पन्नास साथीदारांना यशवंतमाचीच्या फौजेने हाकलून माची बाहेर काढले..!

साऊ व खंडेरायाचे लग्न उद्याच सकाळी लावून दिले जाईल असे राजे यशवंतरावांनी जाहीर केले....!

सारी माची आनंदात होती पण अपमानाचा सूड घेण्याची तीव्र इच्छा मनी बाळगून भीमा व त्याचे साथीदार माचीबाहेर पडले......!

•●●क्रमश

बाजींद भाग क्र.१९

बाजींद

भाग क्र.१९
~~~~~~~~~~~~~~~~~
✍🏻लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
Www.facebook.com/kustimallavidya
Whatsapp - 9850902575
(सदर कथा लेखकाच्या नावसहित share करणे आवश्यक आहे)
~~~~~~~~~~~~~~~
सुर्यकांत ची चाहूल लागताच ती वाघांची प्रचंड धुडे शरीर झिंझाडत उठू लागली,जणू खूप दिवस ती तिथेच बसून असावीत.
सुर्यकांत ला पाहून त्यांनी मान वर करत प्रचंड डरकाळ्या फोडल्या...गुहेतील अणुरेणु शहारले...!

सुर्यकांत च्या पायाखालची जणू जमीन सरकू लागली असे ते दृश्य होते.
पण,आता माघारी फिरुन धावणे अशक्य होते..एका झेपत त्याचा घास झाला असता.
तो तसाच तटस्थ उभा राहिला.
ते दोनही वाघ बाजूला सरकू लागले..जणू ते काहीतरी खून सांगत असावेत.
सुर्यकांत ला समजेना काय घडत आहे,तितक्यात गुहेच्या प्रवेशद्वारातून भलामोठा हत्ती चित्कार करु लागला.

सुर्यकांत ची विचारशक्ती क्षीण होऊ लागली...पुढे मागे दोन्हीकडून जणू यमादेवाशी गाठ पडली होती.

तो तसाच पुढे धावु लागला...धावता धावता पायाखाली असलेल्या दगडाला ठेचकाळून तो पडला....जमिनीवर वाळलेल्या गवताची गंजी असल्याने त्याला फारसे लागले नाही.
तो उठणार इतक्यात समोर एका चौकोनी दगडावर त्याला काहीतरी वस्तू असल्याचा भास झाला...!

तो धाडस करुन समोर जाऊ लागला आणि बाजू उभा असलेल्या वाघांचे अन बाहेर उभ्या हत्तीचे किंचाळने जास्तच सुरु होते....त्याने त्या दगडावर पाहिलं...!

एका हरणाच्या कातडीमध्ये चौकोनी वस्तू बांधून ठेवल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
त्याने ते हरणाचे आवलण सोडवले ,आत त्याला एक मजबूत वही दिसून आली...!

कोणत्यातरी प्राण्याच्या कातडीचे पाने असणाऱ्या त्या वहीवार नैसर्गिक रंगाने चित्रविचित्र आकृत्या कोरलेल्या होत्या..!

मोठ्या कुतूहलाने त्याने पहिले पान उघडले...तो वाचू लागला...वाचू लागला....आणि वाचतच राहिला...!

निमिषें,पळे, घटिका भूतकाळात विलीन होऊ लागल्या..तहान भूक विसरुन तो सर्वांगाने जणू डोळे करुन ती वही वाचू लागला...!
पहिला दिवस संपला... दुसरा...तिसरा...चौथा....पाचवा...!

तब्बल पाच दिवस तो आणि ती वही जणू एकरूप,एकजीव झाले होते...!

जेव्हा तो भानावर आला...तेव्हा त्याच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या...अंगावरील रोमरोम पुलकीत झाले होते..!

तीच दुनिया जी पाच दिवसापूर्वीची होती..तो विचित्र नजरेने पाहत होता..!

भोवताली बसलेले ते वाघ असे का बसले होते इतके दिवस त्याचे रहस्य त्याला समजू लागले...!
विचित्र आवाज करुन त्याने त्या वाघांना जवळ बोलवले...मायेने कुरवाळले व तो थकल्या पावलांनी गुहेच्या बाहेर आला....!

समोर जो बलाढ्य हत्ती उभा होता तो शतश त्याच्यासमोर झुकून उभा होता...

तो त्या विस्तीर्ण जंगलात सर्वत्र मोठ्या आनंदाने पाहू लागला.
ते निर्जीव,निर्मनुष्य,भयप्रद जंगल त्याला विलक्षण सजीव वाटू लागले..!
आनंद अवर्णनीय होता..!

काय असे घडले होते त्याच्यासोबत ??
ती वही, साधी वही नव्हती ती बाजींद ने त्या वन्य प्राण्यांची भाषा समजून घेण्याचे जणू तंत्रच त्यात लिहले होते.
जशी माणसांची दुनिया असते,तशी प्रत्येक जीवांची पण दुनिया असते,भावभावनांचे अनेक खेळ जसे मानवी आयुष्यात होतात,अगदी तसेच पण वेगळ्या पद्धतीने प्राण्यांच्या दुनियेत होतात.
ती त्यांची भाषा शिकायचे जणू सांकेतिक स्फुट विज्ञानच बाजींद ने पुढील पिढीसाठी लिहून ठेवले होते.

ते कुठे व कसे लपवले याची माहिती कोणाला तरी दिल्याशिवाय त्याने प्राण सोडले नव्हते याची जाणीव सुर्यकांत ला झाली.
त्याचे डोळे अश्रूंनी भरुन गेले.

मग मात्र त्याने कंबर कसली.
उजाड झालेल्या चंद्रगड मध्ये पुन्हा जीव फुंकण्याचे ध्येय धरुन त्याने काम सुरु केले.
जंगली जनावरे त्याच्या एका शब्दावर काहीही करु लागली.

पण,जोवर शूरवीर मनुष्याची फौज उभी होत नव्हती तोवर बाजींद ज्या ध्येयासाठी खस्त झाला त्याच्या बलिदानाचे चीज होणार नव्हते,ज्या पवित्र भावनेने त्याने प्राण्याच्या गूढ भाषेचे ज्ञान लिहून ठेऊन त्याचा उपयोग समाजाला करता यावा ती भावना घेऊन उठलेले अनेक स्नातक निर्माण केल्याशिवाय होणार नव्हती.

या गोष्टीचा विचार करत महाराष्ट्रभरातून निस्वार्थी भावनेने प्रतिकूल परिस्थितीत लढत असलेले अनेक वीर सुर्यकांत ने एकत्र जमवले.
प्राण्यांच्या गूढ भाषा जाणणाऱ्या त्याच्या विलक्षण कौशल्याने सर्व त्याला जणू देवाचाच अवतार मानू लागले,पण प्रत्यक्षात तसे नव्हतेच...तो साधाच मनुष्य होता.
पण ज्याने जे काम उभे केले ते मात्र महान होते.
चंद्रगड ला "बाजींद" चे झपाटलेले जंगल बनवले.
इथे पाऊल ठेवणारा परका माणूस परत जिवंत जाणार नाही असा नियम बनवला गेला.
केवळ महाबलेशवर जंगल नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आख्यायिकेत बाजींद बद्धल बऱ्याच अंधश्रद्धा पेरल्या गेल्या आणि ती शे दोनशे वीरांची टोळी देशासाठी जगू लागली.
पण,मर्यादा राखून..!
उभा आडवा महाराष्ट्र पारतंत्र्यात असताना शे दोनशे वीर उठून बंड कसे उभा करतील.
अशक्य होते ते,आता ते सर्व शोधत होते एक संधी.
सुर्यकांत ब्रम्हचारी राहिले व त्यांच्या फौजेतील सर्वात निस्वार्थी व पात्र धारकऱ्याला ते गूढ ज्ञान देत असत व त्याला "बाजींद" म्हणून सेनेचे नेतृत्व देत असत..!
100 वर्षे झाली हाडमांस शिंपून आम्ही हे बाजींद चे जंगल व दहशत टिकवून आहोत.
मी सध्याचा "बाजींद" या नात्याने नेतृत्व करत आहे.
गुप्तपणे सारा महाराष्ट्र फिरला ,जागोजागी अन्याय,अत्याचार पाहून काळीज तुटत होते.

महाराष्ट्रावर परकीय आक्रमकांच्या टोळधाडी आळीपाळीने तुटून पडत होत्या.
वतने,जहागिरी यासाठी स्वकीय बांधवांचे अगदी आनंदाने गळे चिरणारी पिढी तयार होत होती.
आपण परकीय सत्तेच्या अधीन आहोत हेच लोकांना समजत नव्हते.
धर्म,मानवता नावालाही शिल्लक नसताना ,एक बाल क्रांतिकारक उठला पुण्यातून ज्याने भागवत धर्माचा भगवा पताका आपल्या राज्याचा ध्वज म्हणून जाहीर केला आणि हिंदुस्थानातील पाचही जुलमी राजवटी विरुद्ध प्रचंड लढा उभा केला ते पण कोणतीही परिस्थिती अनुकूल नसताना..!
त्यांचे नाव ..."पुण्यश्लोक शिवाजी"

महाराजांच्या या पवित्र कार्याची महती आमच्या रक्तारक्तात भिनली गेली.
तेव्हाच आम्ही ठरवले..हे बाजींद चे गूढ गुप्त ज्ञान आता फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्यासाठी द्यायचे...!

मी गेली ६ महिने आमच्या जंगलातील घरी गिधाडे खंडोजी तुझ्यावर पाळत ठेऊन आहेत.
जेव्हा तू यशवंतमाचीत कुस्ती खेळायला जाणार होतास तेव्हा स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांनी तुझ्यावर सोपवलेली यशवंतमाचीची जबाबदारी हे देखील मला या पशु पक्ष्यांनी सांगितले...!
तुझा या सवित्रीवर बसलेला जीव आणि बेरडाच्या हल्ल्यात तू कर्तव्य सोडून तू चूक करणार हे मी आधीच जाणले होते, तुम्हाला नाईलाजास्तव त्या दरीत उडी टाकून पळावे लागले आणि भिल्लांच्या भीतीने तुम्हाला इथवर आणण्या इतपत सर्वच्या सर्व घटना.....आपोआप घडल्या नसून...त्या मी घडवल्या आहेत..!

तुम्ही इथे आला नसून....आणले गेला आहात...!

असे म्हणताच बाजींद पुन्हा हसू लागला...आणि त्याच्या त्या हसण्याने जंगलातील सर्व प्राणी प्रचंड कल्लोळ करु लागले...!

सायंकाळच्या संधीप्रकाशात डोक्यावर धो धो पडणारा पाऊस वाचवण्यासाठी....खंडोजी,नारायण,सखाराम,मल्हारी व सर्जा पाचही जण एका विस्तीर्ण झाडाखाली उभे होते...अंगावरील बोचरी थंडी सोसत ते चौघेही खंडोजी च्या तोंडून ती बाजींद ची विलक्षण कथा ऐकण्यात गढून गेले होते...!

सुर्य अस्ताला जाऊ लागला अन खंडोजी उठला....!
त्याला जाणवले की कथा सांगायच्या नादात सुर्य अस्ताला जात आहे...तो ताडकन उठून भर पावसात भराभर पावले टाकत जाऊ लागला....!

त्याला त्या भर पावसात बाहेर जाताना पाहताच ते चौघेही त्याला हाक मारु लागले..पण विजेचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस यामुळे क्षणात तो दिसेनासा झाला...!

सखाराम ने दीर्घ श्वास घेतला आणि मल्हारी,सर्जा व नारायण कडे पाहत बोलू लागला.....!

गड्यानो,ह्यो खंडोजी साधासुधा माणूस नक्कीच नाय.
त्यो ज्या बाजींद ची कथा सांगतोय,त्यात नक्कीच कायतरी लपले आहे...चला...आजच्या रातीला निवारा हुडकुया...उद्या येरवाळी त्यो येडा नक्की हजर असलं....!

•●क्रमश●•

✍🏻लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
Www.facebook.com/kustimallavidya
Whatsapp - 9850902575
(सदर कथा लेखकाच्या नावसहित share करणे आवश्यक आहे)

बाजींद चे पूर्वीचे भाग खालील लिंकवरुन वाचा..!
https://facebook.com/kustimallavidya/albums/583649891795060/?ref=content_filter
~~~~~~~~~~~~~~~~~~~

बाजींद भाग क्र.20

बाजींद

भाग क्र.20
~~~~~~~~~~~~~~~~~
✍🏻लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
Www.facebook.com/kustimallavidya
Whatsapp - 9850902575
(सदर कथा लेखकाच्या नावसहित share करणे आवश्यक आहे)
~~~~~~~~~~~~~~~~~

पावसाचा जोर कमी झाला आणि अंधाऱ्या रस्त्याचा मागोवा घेत सखाराम व त्याचे साथीदार चालू लागले.
मध्येच वीज चमकायची आणि त्याच्या लख्ख प्रकाशात त्या रायगड परिसरातील भयान जंगलाचे स्वरूप समोर दिसायचे आणि क्षणात पुन्हा काळोख पसरायचा..!

जवळपास एक प्रहर होत आला ते चालत चालत एका विस्तीर्ण पठाराजवळ आले होते.
दूरवर काहीतरी ऐकू येत आहे याची चाहूल सखाराम ला लागली आणि त्याने कान देऊन ऐकले व बोलला...गड्यानो..दूरवर माणसांची वस्ती असण्याची दाट शक्यता आहे,मला माणसे असल्याचा आवाज येत आहे.
चला...तिकडे जाऊया..!

असे म्हणताच..सर्वजण त्या आवाजाच्या बाजूने चालू लागली.

हळूहळू तो आवाज तीव्र होऊ लागला आणि सोबत घोड्याच्या खिंकाळन्याचाही आवाज येऊ लागला...!

सखाराम ने पाहिले कि समोर कोणाची तरी छावणी पडली आहे.
पिवळा ध्वज त्यावर गरुडाचे चिन्ह असणारे निशाण समोर डौलत होते.

सावधपणे ते हळूहळू छावनिकडे सरकू लागले इतक्यात त्या चौघांच्या पाठीला कोणीतरी तलवारी लावल्या....एक म्होरक्या उच्च रवात बोलू लागला......कोण र तुम्ही ?
राजे येसाजीराव शिर्क्यांच्या छावणीची टेहळणी करता काय ?

तोवर दुसरा बोलला.....आर बोलून ताकत काय वाया घालवतोस...घाल रपाटा डोस्क्यात...!

सावध झालेल्या सखाराम ने जाणले कि ही छावणी सावित्रीच्या वडिलांची आहे ...त्याने प्रसंगावधान राखत त्या शिलेदाराला सांगितले...,

आओ शिलेदार आम्ही राजकुमारी साहेब सावित्रीबाईंचे पाहुणे आहोत....सोडा आमास्नी...!

काय...?
राजकुमारीसाहेबांचे पाहुणे ...?
एक जण बोलून गेला...!

होय,त्यांनीच रात्री इकडे बोलावले म्हणून आलोय आम्ही..!

त्याचे ते बोल ऐकताच त्या म्होरक्याने तलवारी खाली घेतल्या आणि त्या चोघांच्याकडे बघत बोलू लागला....,

तुम्हाला राणीसाहेबांचे नाव माहिती आहे म्हणजे नक्कीच तुमची ओळख असेल....चला आमच्या सोबत आम्ही राजकुमारी साहेबाना वर्दी देतो...त्यांनी जर तुम्हाला ओळखले नाही,तर तुमचे मरण नक्की...चला...!

त्या चौघांना धक्का देत छावणीकडे आणले गेले..!

ठायी ठायी हातात नंग्या तलवारी घेऊन पहारा देणाऱ्या त्या छावणीत केवळ शे-पाचशे वीर उभे होते.

मुख्य छावणीवर शिर्क्यांचा गरुडध्वज वार्यावर हिंदोळे देत होता..!
पलीत्यांच्या प्रकाशात छावणी उजळून निघाली होती.नुकत्याच झालेल्या पावसाने गारठलेली घोडी ,बैल अंग झिन्झाडत होती..!

त्या शिलेदाराने सावित्रीच्या कक्षात जाऊन वर्दी दिली आणि ते ऐकताच आत बिछान्यावर पहुडलेली सावित्री धावतच बाहेर आली.....!

सखाराम ने सावित्रीला पाहताच सुटकेचा उच्श्वास टाकला..!

सकाळी कुठे गायब झालात तुम्ही सारे ?

गंभीर मुद्रेने सावित्रीने त्या चौघांना प्रश्न केला.

काय ?
आम्ही गायब ?
बाईसाहेब रात्री आम्ही त्या मंदिरात झोपलो ,पण आम्हाला जाग आली ते एका डोंगरावर..ऐन वेळी खन्डोजीराव तिथे आले नसते तर त्या भुकेल्या वाघांनी आमची न्याहारीच केली असती....!
सखाराम उत्तरला...!

काय ?
खंडोजी आलेला.....कुठे आहे तो..?
त्याला शोधून शोधून आमच्या सर्वांचा उर फाटला आहे आणि तो असा लपंडाव खेळतोय...?

माझे डोके बधीर होत आहे बाईसाहेब....आज दिवसभर खन्डोजीराव आमच्या सोबत या जंगलातल्या डोंगरकापर्यातून इथवर चालत आले आणि सूर्य अस्ताला गेल्यावर कुठेतरी गायब झाले .....आता लिहून ठेवा तो सकाळी इथे उगवणार नक्की...!

खंडोजी दिवसभर तुमच्या सोबत होता ?
सावित्रीने प्रतिप्रश्न केला ..?

तो का असा वागत आहे समजेना..मी व माझ्या यशवंतमाचीची सारी फौज त्याला शोधत आहोत ..!

चला...मी तुम्हाला माझ्या वडिलांची ओळख देते करून..असे म्हणून सावित्री व ते चौघे महाराज येसाजीरावांच्या कक्षात गेले.....!

एका उंच अशा माचानीवर भरजरी कपडे घालून एका पुराणपुरुषाप्रमाणे बैठक घालून सोबत २-३ वीरांसोबत बैठकीत व्यस्त असलेल्या राजे येसाजीरावानी सावित्री आणि त्या चौघाकडे पाहिले...तसे काही न सांगता समोर बसलेले २-३ वीर उठून राजे येसाजी आणि सावित्रीला मुजरा करत निघून गेले...!

या या ...बसा ....समोर असलेल्या बैठक व्यवस्थेकडे बसायची खून करत राजे येसाजी बोलू लागले ...!

कालच मला आमच्या साऊ नी तुमची व्यथा सांगितली...!
तुमच्या गावाची अडचण खूप मोठी आहे गड्यानो....नक्कीच राजे शिवाजी भोसले यात लक्ष घालतील तर हा त्रास कायमचा मिटेल....पण तुमचे अभिनंदन कि इतक्या मुसळधार पावसात जीव मुठीत धरून तुम्ही लोक गावासाठी बाहेर पडलात...तुमच्यासारखी समाजाची सेवक लोक हल्ली बघायला मिळत नाहीत रे ..!

सावित्री..यांचा चांगला पाहुणचार कर आणि उद्या मात्र खन्डोजीला शोधूनच काढले पाहिजे....!

खन्डोजीचे नाव घेताच सावित्री आणि राजे येसाजींच्या डोळ्यात पाणी आले ....ते सावरत राजे बोलले....साऊ वेळ फार नाही ग आता......फक्त उद्याची रात्र...काय करायचे असेल ते आजच करा......परवाचा सूर्योदय आणि शिर्के साम्राज्य..........!

बोलता बोलता राजे येसाजीचा शब्द जड झाला आणि ते उठून पाठमोरे झाले....!

डोळ्यावर आलेले पाणी पुसत सावित्री निर्धारी आवाजात बोलत उठली.....आबा ,काळजी करू नका..!
मी तुमचीच लेक आहे ......उद्या खंडोजी ला घेऊनच मी इकडे येते....तुम्ही विश्रांती घ्या...!

असे बोलून सावित्री त्या चौघांना घेऊन वेगळ्या छावणीत परतली..!
नोकर चाकाराना बोलावून घेतले आणि सखाराम व त्याच्या सहकार्यांच्या भोजनाची व्यवस्था केली ..!

दिवसभर मर मर चालून पोटात भुकेने काहूर उठले होते..!
जेवणाचे नाव उच्चारताच चौघांचेही चेहरे कमळासारखे फुलले...!
पंचपक्वान्न ठेवलेली थाळी चौघांनी संपवायला प्रारंभ केला...!

साऊ समोर बसूनच ते पाहत होती.......
ती म्हणाली...सावकाश होऊदे भाऊ...ठसका लागेल...!

घोटभर पाण्याचा घुटका घेत सखाराम बोलला....बाईसाहेब दिसभर खंडूजी न काल रातीची तुमची कथा सांगितली आमास्नी.....लय लय पुण्यवान मानस हायसा तुम्ही म्हणून तुम्हास्नी बाजिंद न तेच्या राज्यात बोलावून घेऊन १०० वर्षाचे आक्रीत उलघडून सांगितले ते......!

क्षणभर गंभीर होऊन सावित्रीने किंचित हास्य केले आणि बोलू लागली...!

होय,पुण्य तर केलेच होते माझ्या बाप जाद्यानी पण....आम्हाला काय माहिती होत कि नियती आमच्याशी इतका क्रूर खेळ खेळत आहे ...!
सावित्री पुन्हा तिच्या आयुष्याच्या गूढ गर्भात विसरून बोलू लागली.....!

बाजिंद ने आम्हाला तिथे बोलावून घेतले आहे याची जाणीव आम्हाला झाली,पण त्यापेक्षाही त्याच्यावर अभिमान एका गोष्टीचा होता कि १०० वर्षे हि वेडी माणसे स्वताचे जीवन न जगता ,इतके गूढ ज्ञान असून देखील त्याचा गैरवापर न करता प्रसिद्धी पासून दूर राहून देशाचे काम करत होती...!

त्या रात्री आम्हाला बाजिंद ने सारे चंद्रगड फिरवून दाखवले,पाहुणचार केला आणि रात्र होताच एका गंभीर विषयाचे बोलणे करायला सुरवात केली....!

खंडोजी....१०० वर्षे आम्ही ज्या संधीच्या शोधात आहे ,ती आम्हाला तुमच्या रूपाने मिळाली आहे....!

माझे एक काम कराल ?

बाजिंद ने मोठ्या गंभीर मुद्रेने प्रश्न केला ..!

खंडोजी ने होकाराठी मान हलवत म्हणाला......बाजिंद ....मला माहिती नाही आपले जन्मोजन्मीचे काय नाते असावे ...पण तुमचे हे जे कार्य आहे ते महाराजांच्या कार्यापेक्षा कमी नाही आहे ...!

नाही,नाही खन्डोजीराव.....महाराज हिमालय तर आम्ही कुठली तर भुरटी टेकडी..ते गरुड तर आम्ही डास..!

अरे ३५० वर्षाची गानिमांची भीती सामान्य माणसांच्या मनातून काढून असामान्य कामगिरी करवून घेणारे शिवाजीराजे हे जणू शिवाचे अवतार वाटतात कधी कधी...!

माझे एक काम कराल ?

हो नक्कीच..आदेश द्या ..खंडोजी बाजिंद ला म्हणाला....!

ऐक,खंडोजी....मी बाजिंद च्या तपस्येची,संघर्षाची कमाई असलेले ते गूढ विज्ञान लिहलेली वही हिंदवी स्वराज्याच्या महान कार्याला देऊ इच्छितो...!

तू ती वही स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्याकडे देशील का /

खंडोजी चे डोळे विस्फारले गेले...हृदयाची कंपने अतितीव्र झाली...!
निसर्गाच्या अनंत किमयेच्या एका कुलपाची चावी माझ्याकडे मिळत आहे हे ऐकूनच तो भान हरपून गेला....!

त्याला सावध करत बाजिंद बोलला.....बोल खंडोजी..माझ्यापुढे तुझ्या इतका प्रामाणिक आणि विश्वासू माणूस दुसरा कोणीच नाही....कारण......बहिर्जी नाईक हे गुप्तहेर शिवाजी महाराज,जिजाऊ मासाहेब व्यतिरिक्त माहिती असेल तर तो फक्त तू आहेस ...आणि हि वही फक्त आणि फक्त नाईकांच्या हाती गेली तरच स्वराज्याचे काम अनंत पटीने वाढेल.........!

बोल....करशील एवढे काम ?
क्षणात खंडोजी उत्तरला......!
होय....करेन हे काम मी...!

•●क्रमश●•

✍🏻लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
Www.facebook.com/kustimallavidya
Whatsapp - 9850902575
(सदर कथा लेखकाच्या नावसहित share करणे आवश्यक आहे)

#बाजींद भाग क्र. २४ वा..!

Kustimallavidya कुस्ती-मल्लविद्या
#बाजींद

भाग क्र. २४ वा..!

 ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

दरम्यान मराठ्यांनी यशवंतमाचीच्या पूर्वेकडून हल्ला चढवत पूर्व वेस कब्जात घेतली.
मराठ्यांच्या त्या निकराचा लढ्यात अग्रभागी स्वत: वस्ताद काका नेतृत्व करत होते.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेवच्या घोषणांनी रायगडचे खोरे दुमदुमून गेले होते.
भगव्या जरी पटक्यांचे निशाण हिंदोळे घेत शिरक्यांच्या काळजात घुसत होते.
राजे येसजीरावांनी घोडदळाला आज्ञा केली व ते सुद्धा काळभैरवाच्या नावानं चांगभल आरोळी देत मराठ्यांच्या फौजेवर तुटून पडले.
तलवारीच्या खणखणाटाने यशवंतमाची हादरुन गेली होती.
कमजोर योद्धे गतप्राण होत होते, वीरांचे तांडव सुरु होते...!
इतक्यात मराठ्यांचा एक जंबियाचा गोळा फिरवणाऱ्या बहाद्दराने राजे येसजीरावांच्या रोखाने गोळा भिरकावला...!
सुदर्शन फिरावे तसा तो गोळा सुसाट वेगाने राजे येसजीरावांच्या छातीवर येऊन आदळला..!
घाव वर्मी बसल्याने, प्रचंड तडाख्याने राजे येसाजीराव घोड्यावरून खाली पडले..!
शिरक्याची फौज ते चित्र पाहून भयभीत झाली...!
घोडदळ मागे फिरू लागले.
हे पाहताच मराठ्यांच्या फौजेला अवसान शिरले... तुफान कत्तल करत ते पुढे सरकू लागले.
घोड्यावरून पडलेल्या येसजीरावांना काही अंगरक्षकांनी उचलून सावध केले.
ते शुद्धीवर आले, पण समोर शिरक्याची पीछेहाट पाहताच ते जखमी अवस्थेत पुन्हा घोड्यावर स्वार झाले.
पण, गोळ्याच्या प्रहाराने त्यांना शुद्ध टिकवणे कठीण होते...!
मराठ्यांनी जवळपास शिरक्यांच्या फौजेला कोंडीत आणले होते... आजवर अजिंक्य असलेली यशवंतमाची आज मराठे जिंकणार अशी लक्षणे दिसू लागली ..!

दूरवर यशवंतमाचीच्या राजे येसाजीरावांच्या वाड्यावरून "साऊ" हे सारे पाहत होती, इतक्यात वाड्याच्या मागे असलेल्या तालमीतून "काळ भैरवाच्या नावाने चांगभल" च्या आरोळ्या उठल्या... राजे येसाजीरावांच्या पदरी असलेले निष्ठावान शे दोनशे पैलवान युद्ध पोषाख घालून दौडत युद्धभूमीकडे धावत होते... त्यांचा म्होरक्या होता एक धिप्पाड पैलवान.... दुरुनच साऊने त्या म्होरक्याला ओळखले होते...!

"भीमा जाधव"

खंडेरायने यशवंतमाचीच्या यात्रेत चित करुन सपशेल पराभव केलेला राजे येसाजीरावांच्या खासगीतला मल्ल.
पराभवाचे उट्टे मातृभूमीचे रक्षण करुन काढण्याच्या मनसुब्याने त्वेषाने बाहेर पडला होता..!
ते शे दोनशे पैलवानांचे टोळके हातात तलवारी भाले घेऊन मराठ्यांच्या हल्ल्याचा प्रतिकार करावयास दौडू लागले...!

मजल दरमजल करत धुळीचे लोट उडवत त्या पैलवानांची पहिलीच टक्कर निकराची दिली.
पैलवानी घाव वाया जातच नव्हता.. ज्यावर पडेल त्याची खांडोळी होत होती.
एक एक पैलवान 10-10 धारकरी कापू लागला.
घोड्यासकट योध्याना उचलून आपटू लागले.
जणू रामायणात कुंभकर्णाने जसा संहार वानर सेनेचा मांडला होता, तसाच संहार त्या शिरक्यांच्या नेकजात पैलवानांनी मराठ्यांच्या सेनेविरुद्ध मांडला होता...!

आता थांबण्यात राम नव्हता... थांबलो तर जीव जाणार .. झाले... इशारतीची कर्णे वाजू लागली... विजयाची माळ गळ्यात पडता पडता भीमाने ती हिसका मारुन आपल्या हाती घेतली होती.

पुढे पळणाऱ्या फौजेची त्रेधातिरपीट बघत राजे शिर्के व पैलवानांची फौज उभी होती.... भीमाने डोक्याला चढवलेले शिरस्त्राण उतरवले... आणि राजे येसाजीरावांच्या समोर येऊन मुजरा केला...!
राजे निहायत खुश झाले... ते बोलले.... "भीमा... अरे तू आज धावून आला नसतास, तर शिरक्याची अब्रू, परंपरा सर्वकाही मोडीत निघाले असते.. संपले असते सारे..." असे म्हणत त्यांनी भीमाला मिठी मारली, पण छातीवरील आघाताने त्याच्या मिठीतच मूर्च्छित येऊन पडले.... सारे सैन्य राजे येसाजीना घेऊन वाड्याकडे जाऊ लागले....
एक योद्धा मात्र जाणीवपूर्वक मागे उभा होता... त्याचे बलदंड बाहू घामाने डबडबले होते.. हातातील नंगी समशेर रक्ताने निथळत होती.... त्या रक्ताकडे पाहत त्या वीरांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.... त्याने डोक्याला घातलेले शिरस्त्राण काढले व एकवार भरल्या नेत्रांनी त्या पळणाऱ्या सेनेला पाहू लागला.... आणि पुन्हा यशवंतमाचीकडे वळला...........

ओळखले....ओळखले.....

जंगलात उंच झाडावर हिरव्या पाल्याची झालर अडकवून हेरगिरी करणाऱ्या शिवछत्रपतीच्या निशाणबारदार हेजीबाने ओळखले... तो वीर कोण आहे ते.....

खंडेराय.....!

होय... खंडेराय सरदेसाई...!
ज्यांनी बहिर्जींच्या खांद्याला खांदा लावून अनेक युद्धात महाराजांना यश मिळवून दिले होते.... तो स्वराज्याचा गुप्तहेर... बहिर्जींचा उजवा हात... स्वराज्याशी फितूर झाला आहे... आपल्याच बांधवांची कत्तल उडवून तो अजूनही यशवंतमाचीत आहे...!

विजेच्या वेगाने ही खबर दस्तुरखुद्द बहिर्जी नाईकांच्या कानी पोचली ...!

कानात उकळते तेल ओतल्यासारखे झाले..!

डोळ्यात पश्चाताप उतरला होता...!
रायगड परिसरात एका गुप्त ठिकाणी हजारो मावळ्यांच्या पुढे बहिर्जी बसले होते आणि हेजीब खंडेरायाच्या कत्तलीचे वर्णन करत होता...!

समोर वस्ताद काका मान खाली घालून सर्व ऐकत होते...!

"वा काका... चांगले शिक्षण दिले तुम्ही तुमच्या पठ्ठयाला...!"
बहिर्जी नाईक ओरडले... सारी सेना भीतीने कापू लागली... बहिर्जींचा राग काय आहे सर्वाना ठाऊक होते...!

"आजवर शेकडो जीवघेण्या मोहिमा करुन मेलेली माझी नजर खंड्यासारख्या फितुराला कशी ओळखू शकली नाही, याचा मला पश्चात्ताप होतोय.... उद्याचा दिवस मावळायच्या आत स्वराज्याचा गद्दार आणि दिमाखाने महाराजांशी वैर करणारी यशवंतमाची जर स्वराज्यात आली नाही... तर तुमच्यापैकी एकाने सुद्धा मराठेशाहीचे नाव घेऊ नका..!
खंडूच्या जीवावर मोठ्या विश्वासाने माझी जीभ लवलवली होती, की यशवंतमाची एका महिन्यात स्वराज्यात येईल म्हणून... आज महिना होत आला, तर पदरात काय पडले ? अपयश ....? कत्तल....? गद्दारी...? मी जातीने उद्या माचीवर हल्ला चढवणार...."

इतक्यात समोर उभे असलेले वस्ताद काका धावत समोर आले.... त्यांनी बहिर्जींच्या पायाला मिठी मारली... ते बोलले... "नाईक... आम्ही जिवंत असताना तुम्ही मोहिमेवर जाणार..?
मराठेशाही शेण घालेल तोंडात... महाराज कधीही माफ करणार नाहीत...!
आजवरची माझी नोकरी रुजू धरावी आणि मला अखेरची संधी द्यावी...!
शिकस्त करुन माची स्वराज्यात घेऊन नाहीतर...हे तोंड परत कधीही तुम्हाला दाखवणार नाही नाईक....."

वस्ताद काकांच्या डोळ्यातील आग पाहून नाईकांना त्यांना उठवले...

ते बोलू लागले.... "काका माफ करा मला मी जहाल बोलतो. पण,आज मराठ्यांचा धाक अवघ्या पातशाहीला आहे, कारण महाराज दिलेला शब्द पाळतात. जर शब्द पाळू शकत नसेल, तर तो मराठा नव्हे....!
उद्या सायंकाळ पर्यंत वाट बघू.... नाहीतर... शिरक्याची शिबंदी पांगु अथवा न पांगु... आपल्या तलवारी यशवंतमाची वर वळल्या पाहिजेत.. ज्याचे नेतृत्व मी स्वता करणार....जय भवानी...!"

कराकरा पावले टाकत नाईक निघून गेले..!

इकडे यशवंतमाचीवर आनंदी आनंद होता...!
भीमा जाधव माचीचा खरा नायक ठरला होता...!

राजे येसजीरावांना शुद्ध आली होती, त्यांनी भीमाला बोलावून घेतले होते..!
सारा दरबार भीमावर कौतुकाचा वर्षाव करत होता.

राजे बोलले....."भीमा... आज तुझ्या पराक्रमामुळे यशवंतमाचीची अब्रू वाचली.
बोल.. डोंगराएवढे उपकार आहेत तुझे माझ्यावर.... काय देऊ तुला...?"

धीरगंभीर मात्र मुत्सद्दी मुद्रेत उभा असणारा भिमा शांत उभा होता.

राजे मोठ्या आवाजात गर्जले.. "आजपासून मी शिरक्यांच्या सेनेचे सेनापतीपद भीमाला बहाल करत आहे...!"

हे ऐकताच सारी यशवंतमाची भिमावर फुले टाकू लागली...

"बोल भीमा! अजून काय हवे तुला....?"

भीमा शांतपणे पुढे आला....
राजे येसजीरावांना मुजरा केला व बोलू लागला...."राजे जेव्हापासून तारुण्यात पदार्पण करुन प्रेम म्हणजे काय समजले आहे... माझ्या मनात, बुद्धीत, श्वासात एकच मुलगी आहे... सावीत्री.... राजे मला जर काही द्यायचेच असेल, तर साऊचा हात द्या... माझ्या प्रणापेक्षा जास्त मी तीला जपीन....."

हे ऐकताच वरच्या मजल्यावर स्रीयांच्यात उभी असलेल्या सावित्रीच्या हृदयाचे ठोके वाढले.... डोळ्यात आग उतरली... ती बेभान होऊन भिमाकडे पाहू लागली... व दुसऱ्या क्षणात निघून गेली.....

राजे येसजीरावांना भीमाला काय उत्तर द्यावे समजेना....!

"ते बोलले... भीमा.. मी स्वत: जातीने साऊ बरोबर चर्चा करुन उद्या तुला होकार-नकार सांगीन... तुझ्यासारख्या वीराच्या हाती माझी मुलगी देणे मी भाग्याचे समजतो...." असे म्हणताच सारा दरबार टाळ्या वाजवू लागला....जनतेचा कौल भीमाच्या बाजूने होता...!

दरबार बरखास्त झाला आणि भीमा तालमीत आला.... पाठमोऱ्या अवस्थेत उभा असणाऱ्या खंडेरायाला मिठी मारुन भीमा बोलू लागला.... "खंडोजी... आज केवळ तुमच्यामुळे या भीमाचे स्वप्न पूर्ण होत आहे. माझी गेलेली इज्जत तुम्हीच मला परत मिळवून दिली... कसे आभार मानू तुझे मला समजेना....!"

हे ऐकताच खंडोजीला युद्धाच्या वेळेचा प्रसंग समोर दिसू लागला...

वस्ताद काका घाईने निघून गेले आणि यशवंतमाचीची पूर्व वेस मराठ्यांनी जिंकली होती..!
मराठ्यांची शुरता फक्त खंडोजीलाच माहिती होती.... पण काही करुन ही गूढ वही सुरक्षित रहावी, म्हणून त्याने यशवंतमाची बाहेरच्या डोंगरातील गुप्त गुहेत ती लपवली आणि पुन्हा यशवंतमाचीत आला, तर राजे येसाजीराव जखमी असून यशवंतमाची हारण्यात जमा होती...!

खंडोजीने साऊला भेटायला थेट वाडा गाठला व वस्तुस्थिती सांगितली....

अश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी साऊ बोलली.... "खंडोजीराव... मला माझे राज्य आणि वडिलांचा प्राण गमावून स्वतःचा संसार थाटायचा नाही...! एकतर मला तुमच्या तलवारीने मारुन टाका... नाहीतर माझ्या वडिलांचे प्राण वाचवा...." आणि हुंदका देत ती रडू लागली.... तो पोलादी पुरुष साऊच्या प्रेमाने विरघळला आणि तडक तालमीत आला व तालमीतल्या शे दोनशे पैलवानांना जागे केले व बोलू लागला.....

"अरे मर्दांनो... ज्याच्या जीवावर आजवर दूध तूप खाऊन पैलवान झालात, तो तुमचा धनी तिथे बेशुद्ध पडला आहे.... ज्या मातीत कुस्ती खेळाला ती माती धोक्यात आहे.... भीमासारखा भीमकाय मल्ल इथे असताना राजे येसाजीराव स्वता युद्ध खेळतात हे बरे नव्हे... चला उचला समशेर आणि गाजवा मर्दुमकीचे तडाखे.... जिंकलात तर नाव होईल हारलात तर अमर व्हाल.... भीमा तू स्वता नेतृत्व कर आमचे..."

असे म्हणत ते शे दोनशे पैलवान चवताळून मराठ्यांच्या फौजेवर तुटून पडले... स्वता खंडेराय पण होता त्यात... ज्याच्यासोबत तलवार चालवायला शिकला, तीच तलवार आपल्या बंधूंच्या पोटातून आरपार करताना त्याचे काळीज तुटत होते.. पण सवित्रीचा विरह मात्र यापेक्षा जीवघेणा होता, म्हणून तो अखे घोडे उचलून फेकू लागला होता......

भरल्या नेत्रांनी खंडेरायला सारे आठवत होते

••● क्रमश ●••

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

#लेखकपैगणेश_माणुगडे
#Mob_9850902575

#बाजींद भाग क्र. २३ वा..

#बाजींद

भाग क्र. २३ वा..!

 ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

सखाराम व त्याचे सवंगडी सर्वांगाचे कान करुन सावित्रीच्या तोंडून तीचा भूतकाळ ऐकत होते.
सावीत्री भरल्या नेत्रांनी तिच्या भूतकाळात रममाण झाली होती..!

"बाईसाहेब....पुढे काय झाले ?"

धाडस करुन मल्हारीने सावित्रीला प्रश्न केला.

"पुढे..?"
डोळ्यात आलेले अश्रू पुसत सावीत्री बोलली..!

"दैव अशी विचित्र परीक्षा का घेतो देव जाणे... जेव्हा असे वाटते, की आयुष्यात सर्व संपले, तेव्हा नवीन अध्याय समोर मांडते, तर जेव्हा वाटते, की आता काही नको... अगदी त्याचवेळी नियतीची वाईट चपराक बसते..

खंडोजीच्या मिठीत मी जग विसरले होते, सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी पहाटेचे शीतल चांदणे विरुन गेले, रायगडच्या बाजूने आलेल्या गार वाऱ्याने आम्ही दोघेही भानावर आलो...

खंडोजी म्हणाला...."साऊ.. आता तुझा विरह सहन करणे मला अशक्य आहे...!
मी आजच बहिर्जी नाईकांच्या खासगीत वर्दी धाडून त्यांची भेट घ्यायला निघतो... बाजींदची बहुमूल्य जबाबदारी त्यांच्या हाती सुपूर्द करुन मला तुला कायमचे घेऊन जायचे आहे..."

खंडोजीची मिठी सैल करत साऊ बोलली.... "ठीक आहे... मलाही तुमच्याशिवाय जगणे आता मुश्किल आहे.. मी पण आजच आबासाहेबांची समजूत काढते.. घडलेले सर्व कथन करते.. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या पवित्र कामात आता शिरक्याची तलवार चालावी... मी नक्कीच आबांना समजून सांगेन..."

सावित्रीचे दोन्ही खांदे घट्ट पकडून खंडोजी बोलला...

"साऊ.. असे जर घडले, तर माझ्यावर नाईकांनी सोपवलेली कामगिरी फत्ते होईल... रक्ताचा थेंब न सांडता यशवंतमाची स्वराज्यात आली, तर तू आणि मी जन्मोजन्मी एकत्र राहू ही शपथ मी तुला देतो... मी त्वरित खेडेबाऱ्याकडे रवाना होतो..."

सवित्रीचा निरोप घेऊन घाईने खंडोजी तालमीकडे जाऊ लागला.."

दरम्यान, हत्यारबंद शिबंदी जंगलमार्गत पेरुन खंडोजीसोबत शेवटची वाटाघाटी करायच्या उद्देशाने वस्ताद काका रात्रीच यशवंतमाचीच्या हद्दीत आले होते.

खंडोजी तालमीत आला व लपवून ठेवलेली ती गुढ वही घेतली, कमरेला तलवार, पाठीला ढाल अडकवली.. ढालीच्या आत ती वही लपवली आणि क्षणभर जगदंबेचे समरण केले... आता पुढचे काही तास त्याच्यासाठी खूप महत्वाचे होते..!

तिकडे सूर्यराव बेरडाने यशवंतमाचीवर निकराचा हल्ला चढवायचे नियोजन केले, आजवरच्या अपमानाचा बदला राजे येसजीरावांच्या रक्ताने धुतला जाईल, असे त्याने मनोमन योजले.
यशवंतमाची व बाजींदची ती गूढ ठेव दोघांचीही तहान त्याला लागली होती.. ही तहान आता केवळ शिरक्यांच्या रक्ताने शमणार होती..!

पण, सूर्यरावचे मनसुबे धुळीस मिळवण्यास बाजींदची चिवट फौज वाऱ्याच्या वेगाने जंगलात घुसली होती... घुसली नव्हे आलीच....!

हर हर महादेवच्या गर्जनेने जंगल दुमदुमून गेले.. यशवंतमाचीकडे रोखलेले सूर्यरावचे भाले मागे वळाले.... तुफानी युद्धास प्रारंभ झाला...!

हल्ला कोणी केला? का केला? विचार करायला सूर्यरावला सवडच मिळाली नाही... त्याने बाजींदच्या फौजेशी निकराची लढत द्यायला सुरवात केली. 
बाजींदच्या येण्याने जंगलातील सर्व प्राणी कमालीचे बिथरले होते.. त्यांच्या गोंगाटाने आसमंत दुमदुमून गेला होता... समोरुन अनोळखी शत्रूचा हल्ला व जंगलातील प्राण्यांनी, पक्ष्यांनी, कीटकानी चालवलेला गोंगाट याने सूर्यरावची फौज भेदरून गेली व वाट दिसेल तिकडे धावू लागले... सूर्यराव सर्वाना ओरडून थांबायचे आदेश देत होता, पण भीतीने गंगारलेली त्याची सेना काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती..!

इकडे खंडोजी तालमीतून बाहेर पडणार इतक्यात वस्ताद काकानी तालमीचे दार उघडले...!

काकांना पाहताच खंडोजी आनंदाने बेभान झाला.. त्याने वेगाने जाऊन काकांच्या चरणांना स्पर्श केला.. काकांनी त्याला उठवत मिठी मारली..!

"खंडू.... कसा आहेस तू ? आणि काय करुन बसला आहेस तू ? आपण यशवंतमाचीची रसद पांगवून यशवंतमाची स्वराज्यात आणण्यासाठी येथे आलो होतो... पण तू, शिरक्यांच्या मुलीसाठी खुद्द बहिर्जी नाईकांचा आदेश डावललास ? मी ज्या खंडूला ओळखतो, तो नक्कीच तू नव्हेस..."

शांतपणे ऐकून घेत खंडोजी बोलला... "वस्ताद काका मला माफ करा... मला माझे कर्तव्य पूर्ण माहिती आहे.. पण.. पण सावित्रीच्या प्रेमात मी आकंठ बुडालो आहे... मला कर्तव्य बजावू दे... मी सवित्रीशी लग्न करणार आहे..!"

घडलेला सर्व वृत्तांत खंडेरायने वस्ताद काकांना सांगितला... बाजींदची गूढ वही.. सर्व काही त्याने वस्ताद काकांना कथन केले... खंडेरायचा वस्ताद काकांच्यावर खूप विश्वास होता... तो बोलला 
"मला त्वरित खेडेबऱ्याला पोहोच करा काका.. माझी आणि नाईकांची भेट झाली पाहिजे लौकर... साऊ, पण त्यांच्या वडिलांना सर्व समजून सांगून यशवंतमाची स्वराज्यात सामील करण्यास भाग पाडणार आहे... चला काका.. सूर्यराव बेरडाचा निकराचा छापा कधीही यशवंतमाचीवर पडणार आहे, अशी खबर आहे..!"

दीर्घ श्वास सोडत काका बोलले.... "खंडू... अरे केवळ मनपरिवर्तन करुन जर यशवंतमाची स्वराज्यात येणार असती, तर नाईकांना ही जीवघेणी कामगिरी तुझ्यावर का सोपवली असती...? काही गोष्टी शब्दांनी नव्हे, तर तलवारीने सुटत असतात...! बाजींदच्या गूढ कथा आजवर मी ऐकून होतो, पण तू केलेल्या उलघड्यावरून मला तुझ्यावर कसा विश्वास ठेवावा, हा प्रश्न पडला आहे..!"

हे ऐकताच खंडोजीने कशाचाही विलंब न करता पाठीवर अडकवलेल्या ढालीतून ती गूढ वही काढून वस्ताद काकांच्या हाती ठेवली... "काका.. मी आजवर तुमच्याशी कधीही खोटे बोललो नाही..हे बघा हा पुरावा..!"

त्या वहीचे अवलोकन करत वस्ताद काका कमालीचे गंभीर झाले.. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले... त्यांनी त्वरित खंडोजीला ती वही परत केली आणि बोलु लागले...

"खंडोजी... खूप वेळ झाला तुझ्या येण्याला... काही क्षणात मराठ्यांची फौज यशवंतमाचीवर तुटून पडेल... तू इथे थांबू नकोस.. तुला गिरफ्तार करायचे आदेश आहेत नाईकांचे.... तू थांबू नकोस इथे....!"

असे ऐकताच ज्वालामुखी भडकावा तसा खंडोजी भडकला... "यशवंतमाचीची रसद न पांगवता जर हल्ला चढवायचा होता, तर मला या कामगिरी वर का नियुक्त केले काका..? मी सावित्रीला सांगून रक्ताचा थेंब न पडता माची स्वराज्यात आणणार होतो आणि नाईकांनी अशी आज्ञा दिलीच कशी...?"

"कशी दिली हे विचारायची पात्रता कोणाचीच नाही खंडोजी ..!"

काका गर्जले.... "रक्त शिंपून उभे केलेले हे स्वराज्य असेतुहिमाचल असेच वाढावे, यासाठी नाईकांनी सर्वस्वाची होळी केली आहे, हे तू जाणतोस... आजवरच्या तुझ्या कामगिरीवरून तुला यशवंतमाचीची कामगिरी दिली... पण,मराठेशाहीचा शिरस्ता माहिती असूनदेखील तू स्त्री मोहात पडून कायदे मोडलेस ते कोणाला विचारून..? ठीक आहे, तुझ्यासोबत जे घडले ते गूढ व विलक्षण आहे खंडेराय.. पण.. पण आता तू जर इथे मराठ्यांच्या हाती लागलास, तर तुला गिरफ्तार केले जाईल... माझे ऐक... नाईकांचा निर्णय देव सुद्धा बदलत नाही.. तिथे मी कोण आहे... वातावरण शांत होईपर्यंत तू बाहेर रहा.. योग्य वेळ आल्यावर मी मध्यस्ती करीन... मग हा अनमोल ठेवा स्वराज्याच्या कामी येईल, यासाठी प्रयत्न करु...! मी निघतो आता.... मला इशारत करुन फौजेला सांगावा धाडला पाहिजे.... तू निघ इथून... उतरतीच्या डोंगरावर गुहेत रहा... तिथे मी येऊन भेटेन....!"

असे बोलून वस्ताद काका निघून गेले होते..!

खंडोजीच्या मनात विचारांचे महावादळ सुरु झाले होते...!

इकडे सावित्रीने घडलेला सर्व वृत्तांत येसजीरावांच्या कानी घातला.. व शिवाजी महाराजांना सामील होण्यासाठी कळकळून सांगितले...!

येसजीरावांच्या मनात बाजींदची कथा ऐकून मोठी खळबळ सुरु झाली होती...!
त्याचे मन म्हणू लागले, की 'किती वेळ महाराजांशी वैर धरायचे... सारा मुलुख शिवाजीराजांचा पोवाडा गातोय.. आपणही सामील व्हावे....' त्यांचे मन पालटू लागले.....पण, इतक्यात...

एक निशाणबारदार धावत आला....बोलू लागला...

"राजे घात झाला... भगव्या झेंड्याच्या निशानाची फौज यशवंतमाची वर तुटून पडली आहे... वेशीच्या रक्षकांची कत्तल उडवत ते आत घुसत आहेत... मराठ्यांचा छापा पडला आहे...."

काही वेळापूर्वीच मराठ्यांना सामील होण्याचे स्वप्ने पाहणारे राजे सावित्रीवर ओरडले... "पाहिलेस... आणि तू त्यांना जाऊन मिळायला सांगत होतीस मला ? ....आता मारु किंवा मरु... तू वाड्याबाहेर पडू नकोस...."

असे बोलून राजे बाहेर पडले... युद्ध डंका वाजू लागला... शिरक्यांचा सेना सागर जमा झाला....

आता युद्ध.... आता मोठमोठे अलंकारिक शब्द मौन राहतील... आता तलवारी बोलतील... तलवारीच चालतील... राजे येसजीरावांनी युद्धाचा पोषाख चढवून घोड्यावर स्वार झाले.. पाठोपाठ शिरक्याची चिवट फौज निघाली....

••● क्रमश ●••
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

#लेखकपैगणेश_माणुगडे
#Mob_9850902575

बाजींद भाग क्र. २२ वा..

बाजींद

भाग क्र. २२ वा..

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

राजे येसाजीरावांच्या पत्नीला रखमाईबाईसाहेबांच्या आनंदाला 'सावीत्री येत आहे', हे ऐकून पारावर राहिला नव्हता.
तिने वाड्यातील बायका एकत्र करुन पंचारती घेऊन खंडू आणि साऊला ओवाळून वाड्यात घेण्यासाठी घाई केली.
राजे येसाजीराव निहायत खुश होते.
शिरक्याची अब्रू सहीसलामत परत येत होती आणि तो घेऊन येणारा खंडू आपल्या पदरी असलेला पैलवान आहे, ही भावना त्यांना मनस्वी आनंद देत होती..!

अनेक जखमा घेऊन व गेली कित्येक दिवसांची दगदग त्यासोबत बाजींदसारख्या आख्यायिकेतून प्रसिद्ध असलेल्या मात्र आजवर कोणी न पाहिलेल्या अवलीयाला भेटून, त्याचे रहस्य ऐकून सोबत त्याच्या शंभर वर्षाच्या तपस्येचा ठेवा सोबत घेऊन आपण आलो आहोत याच्या जाणिवेने सावीत्री व खंडोजी मनात एक जबाबदारीच्या भावनेत होते.. जखमा व दगदग याची चिंता उरली नव्हती..!
मोठ्या आनंदात ते यशवंतमाचीत प्रवेशले..!

शिंगे तुतारीच्या निनादात आणि यशवंतमाचीच्या हजारो लोकांच्या साक्षीने सावीत्री आणि खंडोजी वाड्यात आले.
येसजीरावांच्या पत्नी व सावित्रीची आई रखमाबाईसाहेबांनी दोघांना ओवाळून वाड्यात घेतले.
राजे येसजीरावांनी खंडोजीला आनंदाने मिठीच मारली.. जड शब्दात ते बोलले... "खंडू आज शिरक्याची अब्रू, इज्जत केवळ तुझ्यामुळे सहीसलामत आम्ही पाहत आहोत.. तुझे उपकार शिर्के कधीही विसरणार नाहीत..!"
त्यांचे जोडलेले हात हातात धरत खंडोजी उद्गारला... "राजे... हे तर माझे कर्तव्य होते, तुम्ही सांगाल ते काम मी मोठ्या आनंदाने करेन"
खंडोजीचे बोलणे ऐकून राजे येसाजींनी त्याला पुन्हा मिठी मारली..!
त्याच्या अंगावरच्या जखमा पाहून त्यानी त्वरित वैद्यांना बोलावून आणले...!
वैद्यांनी जखमा पाहिल्या आणि शिरक्यांच्या वाड्याच्या मागे असलेल्या विहिरीत वर्षानुवर्षे ओतून जुने घट्ट बनवलेले तूप आणून त्याच्या जखमाना लावले... कित्येक दिवसांच्या वेदना शांत होताना पाहून खंडोजी दीर्घ श्वास घेत झोपी गेला....!
सावित्री तिच्या कक्षात पहुडली आणि गेली कित्येक दिवसांची चित्तथरारक घडत गेलेल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करु लागली.... बेरडाच्या जीवघेण्या हल्ल्यात जीवाची बाजी लावून तिला वाचवणारा खंडोजी तिला वारंवार आठवत होता... ती दरीतून मारलेली उडी... भिल्लांचा हल्ला.. बाजींदचे जंगल... खंडोजीची बहाद्दुरी आणि ज्या प्राणप्रिय ध्येयासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो यशवंतमाचीत पैलवान म्हणून आला, त्याचे ते काम सावित्रीला मनोमन आवडले होते..!
गेली कित्येक दिवस तिला खंडोजीच्या सहवासाची जणू काही सवय लागली होती... ती त्या रम्य आठवणीत झोपी गेली...!

खंडोजी यशवंतमाचीत आला आहे, ही बातमी वाऱ्याच्या वेगाने वस्ताद काकांच्या कानावर गेली.
बहिर्जींच्या परवानगी शिवाय खंडोजीने सावीत्रीला वाचवण्यासाठी सूर्यराव बेरडाचे जे वैर घेतले होते, ते बहिर्जींच्या कानावर गेले होते.
खंडोजीला गिरफ्तार करण्याचे आदेश वस्ताद काका व त्यांच्या तुकडीला मिळाले होते.
पण, खंडोजी सोबत आजवर शेकडो मोहिमा केलेल्या वस्ताद काकांचा खंडोजीवर जीव होता, कसेही करुन खंडोजीला यशवंतमाचीच्या फौजेला पांगवून हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा यशवंतमाचीवर फडकवायला जर आपण भाग पाडले, तर मात्र बहिर्जींचा राग शांत होईल असे त्यांना वाटत होते... त्यांनी त्वरित खंडोजीला भेटण्यासाठी राजे येसाजीरावांच्या वाड्यातील तालमीत निघाले..!

तिकडे सूर्यराव बेरडाच्या हेजीबाने बाजींदच्या जंगलात ऐकलेली बित्तबातमी खडानखडा सूर्यरावच्या कानी घातली.
हेजीबाने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवावा कसा, हा प्रश्न सूर्यरावला पडला !!
ठेवावा तर जे काही त्याने सांगितले ते वस्तुस्थितीला मान्य नव्हते आणि न ठेवावा तर जीवावर खेळून ही माहिती काढलेला हेजीब खोट बोलणार नव्हता... द्विधा मनस्थितीत सूर्यराव पुढच्या योजना डोक्यात आखत होता.

पण, त्याच्या डोक्यातून कृती होण्याआधीच ते डोके धडावेगळे करण्याच्या दृढ निश्चयाने "बाजींद" व त्याची चिवट फौज वायू वेगाने सूर्यरावच्या फौजेवर छापा घालण्याचा तयारीत होती.

पहाटेच्या मंद वाऱ्याची झुळूक खंडोजीच्या सर्वांगाला स्पर्श करुन गेली, गाढ झोपेतून तो उठला..!
सावित्रीच्या अनामिक ओढीने त्याला अस्वस्थ केले होते.
कित्येक संकटे सावित्रीच्या साक्षीने त्याने पार केली होती.. अंगावरच्या जखमांच्या वेदना कमी झाल्या होत्या, तो तसाच उठला आणि तालमीतून बाहेर जाऊ लागला.. तालमीचा दरवाजा उघडला आणि बाहेर वाड्याकडे पाहिले..!
सावित्रीला भेटलोच नाही कालपासून... त्याचे मन त्याच्याशीच बोलू लागले... चंद्रचांदण्यांचा प्रकाश आणि पहाटेचा मंदवारा.... दूरवर पाहरेकर्याचा आरोळीचा बारीक आवाज आणि उरात सवित्रीबद्धलची घालमेल.... खन्डोजी निश्चय करुन वाड्यात शिरला.... सांधीसपाटीत बोटे घालून त्याने वाड्याची दगडी भिंत चढली आणि सावित्रीच्या कक्षाजवळ प्रवेश मिळवला..!
समोरुन दरवाजा बंद होता, म्हणून पाठीमागून तो जेमतेम एक पाऊल बसेल इतक्या निमुळत्या जागेतून चालत सावित्रीच्या कक्षाजवळ असलेल्या खिडकीत गेला आणि खिडकीतून आत झेपावला..!

समईच्या सोनेरी प्रकाशात सारे दालन उजळून गेले होते, कक्षाच्या मध्यावर असलेल्या भव्य मंचकावर सावीत्री पहुडली होती..!

तिला पाहताच खंडोजीच्या हृदयाचा आवेग पुन्हा वाढला...!
तो धाडस करुन मंचकाजवळ जाणार इतक्यात सावीत्रीला कोणीतरी असल्याची जाणीव झाली आणि तिने उशाला ठेवलेला जंबिया उचलून... सावध पवित्रा घेतला आणि ओरडली.. "कोण आहे...?"

समईच्या मंद प्रकाशात खंडोजीचा तो धिप्पाड देह तिला दिसला..!
ज्याच्या आठवणीने रात्रभर ती अस्वस्थ होती, तो समोर उभा पाहून तिच्या हातातील खंजीर गळून पडले..!
बेभान होऊन तिने खंडोजीला मिठी मारली..!
खंडोजीनेही तिच्या मिठीने होणाऱ्या जखमेच्या वेदना सहन करत तिला बाहुपाशात घेतली..!
त्या वेदनेत सुद्धा मोठा आनंद होता...!

पहाटेचा मंद वारा खिडकीतून आत आला आणि समई विझली..!

पहाटेच्या रम्य वातावरणात.. चंद्राच्या शीतल प्रकाशात.. अंधाऱ्या खोलीत ते दोन जीव एक झाले होते...!
ना भूतकाळाची काळजी ना भविष्याची चिंता... अश्या मिठीत काळाचे भान उरत नसते.. ती एक समाधी अवस्था होऊन जाते...!
अनेक योगातून असाध्य असणारी ही अवस्था केवळ प्रेमयोगातच समजते..!
केवळ आनंद... केवळ आनंद....!
त्या मिठीत स्वर्गाचे सुखही अपुरे पडावे..!

सारी यशवंतमाची पहाटेच्या वेळी गाढ निद्रा घेत होती आणि हे दोन शरीरे जणू एक जीव झाले होते...!

त्या रेशमी आठवणी डोळ्यातून अश्रुवाटे घळाघळा वाहत होत्या आणि सावीत्री आपला भूतकाळ त्या चौघांसमोर कथन करत होती...!

∴●क्रमश:●∴
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

#लेखकपैगणेश_माणुगडे
#Mob_9850902575

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...