बाजींद भाग ४९
स्वराज्याची राजधानी म्हणून आम्ही रायगड निवडला,पण त्या राजधानीच्या अस्तीनीतील निखारे तुमच्या मुळे बाजूला झाले…आता आमच्या डोक्यात केवळ दक्षिण-दिग्विजय आहे…!
राजे सावित्रीकडे पाहत बोलले…..सावित्री..तुझ्यासारख्या मुली ही खरी स्वराज्याची दोलत आहे.
चुलीपुढे काम करणारे हात स्वातंत्र्यासाठी रणांगण गाजवू शकतात हे तुझ्या कृतीने तू दाखवून दिल्रेस…खंडोजी,तू मोठा भाग्यवान आहेस ,तुला सावित्री सारखी पत्नी मिळत आहे..खंडोजी मान खाली घालून केवळ ऐकत होता…!आणि बाजिंद.
राजांच्या आवाजाने बाजिंद ने पुन्हा मुजरा केला.
राजे बोलू लागले.
महाराष्ट्र ही बुद्धिवंतांची जननी,पण बुद्धी बरोबर कर्तव्य, स्वाभिमान, संस्कृतीची जपणूक करणारे तुमच्यासारखे वीर आम्हाला भेटले नसते,तर असे हजारो शिवाजी मिळूनही महाराष्ट्र स्वतंत्र झाला नसता…!
यावर बाजिंद बोलु लागला.
राजे…..असे बोलून मला लाजवू नये…..१०० वर्षे आम्ही आमच्या मूळ पुरुषाचा हा अनमोल ठेवा जणू काही तुमची वाट बघत जपला होता…आता आम्हाला मरण जरी आले तरी आम्ही तयार आहोत.
हिंदवी स्वराज्याचे हे पवित्र कार्य,आसेतु हिमाचल असेच सुरु राहील यासाठी आम्ही सारेच जीवाची बाजी लाव……!
राजे हसले…..आपण सारेच जीवाची बाजी लावून काम करुया…!जगायचे तर स्वताच्या भूमीत,स्वतंत्र भूमीत..नाहीतर लढता लढता मरण
पत्करायचे.
वस्ताद काकाकडे पाहत राजे बोलले.
काका…आम्हास माफ करा,हा सारा खेळ तुमच्या उपरोक्ष आम्ही अमलात आणला.
कारण कमी वेळेत खूप काही साधायचे होते….सर्वाना सांगत बसलो असतो तर अजून १० वर्षे रायगड मध्ये देवा धर्माचे राज्य आणणे अवघड होते.
जे विरोध करत होते,ते आपलेच लोक होते..त्यामुळे हि नीती आम्हाला अमलात आणावी लागली….चला…निघतो आम्ही …पुढची तयारी काय असेल..हा यशवंता तुम्हाला सांगेल….जातो आम्ही..!
आणि आल्यापावली राजे घोड्यावर स्वार झाले आणि रायगडाच्या वाटेला निघून गेले..मागोमाग महाराजांची शिवगंगा दोडत निघाली….!
सारेच थक्क झाले होते राजांच्या बोलण्याने. सखाराम ने वस्ताद काकांना खून करत बोलला.
काका…आमच्यासोबत जे चार दिवस खंडोजी बनून आले होते….ते हेच ..!
यशवंताकडे पाहत सखाराम बोलत होता,आणि यशवंता हसत हसत सर्वांच्या जवळ आला आणि सखाराम ला बोलला….
काय सखाराम….तुमच काम झालं म्हण…?
मजी महाराज म्हणत व्हत..की अतापास्न टकमकावर्ण एकबी हरामखोर टाकणार नाय…?
बेस झाल बगा तुमच…
आता मात्र सखाराम ला हुंदका आवरणे अशक्य झाले….त्याने रडतच यशवंता च्या पायाला मिठी मारली आणि बोलू लागला.
मला कायबी समजना..कोण आहे तुमी…आमच्या गरीब लोकांना देव म्हणून भेटलासा…तवा खंडोजी…आणि आता यशवंता …खर कोण हायसा तुम्ही ते तर बाजूला उभा असलेला खंडोजी हासतच बोलला.
सखाराम….हे …हेच आहेत आमचे बहिर्जी नाईक…!
हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख.
क्रमशः...
मित्रहो, मी हा ब्लॉग असंख्य शिवभक्तांना एक प्रेरणा, शक्ती आणि सळसळत्या रक्तातला अंगार अजून उफाळून हे हिंदवी स्वराज्य, हिंदुराष्ट्र व्हावं या एकाच महात्वाकांशेपोटी बनवला आहे. यातील बरेचसं साहित्य माझे स्वताचे नसून सोशल मिडीयावरून एकत्र करण्यात आले आहे. यावर हक्क ज्या त्या कवी/लेखकाचा असेल. धन्यवाद आपला मित्र शिवभक्त विनोद जाधव माझ्या कविता आणि इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. https://www.facebook.com/mhkharakuraitihas
फॉलोअर
सोमवार, ६ जुलै, २०२०
बाजींद भाग ५०
बाजींद भाग ५०
आणि सखाराम च्या अंगावर सरसरून काटा आला.
त्याला सर्व गोष्टीचा उलघडा होऊ लागला,की उंबराच फुल म्हणताच आम्हाला रायगडावर एव्हढा का मान मिळत होता….आमचा घोडा हा जवळ असला की का पळून जात होता.
पण,बहिर्जी नाईकांनी सखाराम बनून का आम्हास्नी रायगड दावला..आणि रात्रीच्या वेळी तुम्ही कुठे गायब होत होता….हा प्रश्न मात्र सखाराम ने बहिर्जी नाईकांना केला….!नाईक हसले आणि बोलले…..गड्या,या खंडोजी ने स्वराज्यासाठी खूप काही भोगले आहे,हा वेडा स्वताहून तर काय हे लोकांना सांगणार नाही,म्हणून तुमच्या कानावर याची महती घातली.
रात्रीच्या वेळी स्वराज्याच्या महत्वाच्या बातम्या स्वराज्यातील अनेक हेराकडून मला मिळत असायच्या त्यामुळे मला जावे लागत असे,पण सावित्रीने मला या कमी खूप मदत केली..जराही शंका न येऊ देता तुम्हाला सर्वकाही समजून सांगितले तिने…!
आणि वस्ताद काकासारखा निष्ठावान हेर नक्कीच याचा मागोवा काढत तुम्हाला इथवर आणणार हे आम्हाला ठाऊक होते…काय काका बरोबर ना ..?
बहिर्जी नाईक हसत हसत बोलत होते आणि वस्ताद काकांना अश्रू अनावर झाले.
नाईक… .तुमची निष्ठा,तुमची खेळी जगात कुणालाच समजणार नाही
बघा…..तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली आम्ही तयार झालो हे आमचे नशीब…!
अहो,नशीब काय काका ……या भणंग भिकाऱ्या बहिर्जीच्या आयुष्यात शिवाजी नावाच्या परीसाचा स्पर्श झाला आणि आयुष्याचे सोने झाले,नाहीतर गावोगावच्या यात्रे जत्रेत सोंग करत भिका मागत हिंडलो असतो….
जे काय आहे त्याचे श्रेय केवळ महाराजांच्या जीवनकार्याला आहे काका.
आपल्या सर्वांच्या आयुष्यातून शिवाजी वजा केले तर शिल्लक काहीच उरत नाही.तुम्हाला इथवर आणणे,
खंडोजी कडून शिर्क्यांना स्वराज्यात आणणे,
शिक्यांच्या कडून १०० राज्ये स्वराज्यात घेणे
याचा सूत्रधार जो कोणी आहे त्यांचे नाव म्हणजे ‘शिवाजी महाराज’
त्याना विचारल्याशिवाय आणि त्यांच्या आदेशानुसार हा बहिर्जीच काय
स्वराज्यातला अणुरेणु सुध्दा निर्णय घेऊ शकत नाही.
बाजींद हे सारे ऐकत होता,आणि त्याच्याही अश्रूंचा बांध फुटला होता….
तो मनोमन विचार करत होता….
बाजींद हे सारे ऐकत होता,आणि त्याच्याही अश्रूचा बांध फुटला होता….
तो मनोमन विचार करत होता….
आजवर या बाजींद ने उगाच जगाला घाबरवून फुशारकी मारली…..पण,आज कळून चुकले होते…खरे बाजींद तर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आहेत.
दूरवर दौडत निघालेल्या महाराजांच्या फौजेकडे तो पाहत होता आणि सोबत मावळत्या सूर्याच्या संधीप्रकाशात भगवा झेंडा फडफड फडकत निघाला होता…..!
मित्रांनो इथेच या कथेचा प्रवास समाप्त होतोय. राजमुद्रा चॅनेल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवन हे छत्रपती शिवाजी महाराज या नावा शिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
समाप्त !...
आणि सखाराम च्या अंगावर सरसरून काटा आला.
त्याला सर्व गोष्टीचा उलघडा होऊ लागला,की उंबराच फुल म्हणताच आम्हाला रायगडावर एव्हढा का मान मिळत होता….आमचा घोडा हा जवळ असला की का पळून जात होता.
पण,बहिर्जी नाईकांनी सखाराम बनून का आम्हास्नी रायगड दावला..आणि रात्रीच्या वेळी तुम्ही कुठे गायब होत होता….हा प्रश्न मात्र सखाराम ने बहिर्जी नाईकांना केला….!नाईक हसले आणि बोलले…..गड्या,या खंडोजी ने स्वराज्यासाठी खूप काही भोगले आहे,हा वेडा स्वताहून तर काय हे लोकांना सांगणार नाही,म्हणून तुमच्या कानावर याची महती घातली.
रात्रीच्या वेळी स्वराज्याच्या महत्वाच्या बातम्या स्वराज्यातील अनेक हेराकडून मला मिळत असायच्या त्यामुळे मला जावे लागत असे,पण सावित्रीने मला या कमी खूप मदत केली..जराही शंका न येऊ देता तुम्हाला सर्वकाही समजून सांगितले तिने…!
आणि वस्ताद काकासारखा निष्ठावान हेर नक्कीच याचा मागोवा काढत तुम्हाला इथवर आणणार हे आम्हाला ठाऊक होते…काय काका बरोबर ना ..?
बहिर्जी नाईक हसत हसत बोलत होते आणि वस्ताद काकांना अश्रू अनावर झाले.
नाईक… .तुमची निष्ठा,तुमची खेळी जगात कुणालाच समजणार नाही
बघा…..तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली आम्ही तयार झालो हे आमचे नशीब…!
अहो,नशीब काय काका ……या भणंग भिकाऱ्या बहिर्जीच्या आयुष्यात शिवाजी नावाच्या परीसाचा स्पर्श झाला आणि आयुष्याचे सोने झाले,नाहीतर गावोगावच्या यात्रे जत्रेत सोंग करत भिका मागत हिंडलो असतो….
जे काय आहे त्याचे श्रेय केवळ महाराजांच्या जीवनकार्याला आहे काका.
आपल्या सर्वांच्या आयुष्यातून शिवाजी वजा केले तर शिल्लक काहीच उरत नाही.तुम्हाला इथवर आणणे,
खंडोजी कडून शिर्क्यांना स्वराज्यात आणणे,
शिक्यांच्या कडून १०० राज्ये स्वराज्यात घेणे
याचा सूत्रधार जो कोणी आहे त्यांचे नाव म्हणजे ‘शिवाजी महाराज’
त्याना विचारल्याशिवाय आणि त्यांच्या आदेशानुसार हा बहिर्जीच काय
स्वराज्यातला अणुरेणु सुध्दा निर्णय घेऊ शकत नाही.
बाजींद हे सारे ऐकत होता,आणि त्याच्याही अश्रूंचा बांध फुटला होता….
तो मनोमन विचार करत होता….
बाजींद हे सारे ऐकत होता,आणि त्याच्याही अश्रूचा बांध फुटला होता….
तो मनोमन विचार करत होता….
आजवर या बाजींद ने उगाच जगाला घाबरवून फुशारकी मारली…..पण,आज कळून चुकले होते…खरे बाजींद तर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आहेत.
दूरवर दौडत निघालेल्या महाराजांच्या फौजेकडे तो पाहत होता आणि सोबत मावळत्या सूर्याच्या संधीप्रकाशात भगवा झेंडा फडफड फडकत निघाला होता…..!
मित्रांनो इथेच या कथेचा प्रवास समाप्त होतोय. राजमुद्रा चॅनेल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवन हे छत्रपती शिवाजी महाराज या नावा शिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
समाप्त !...
बाजींद भाग ३५
बाजींद भाग ३५
वस्ताद काकाचे हे बोल ऐकताच सखाराम बोलला..
काका…ही पेटी बघा….आम्ही साधी गरीब लोक…कशाला राजकारणात पडतोय.जे पाहिल.ज्याने है दिल ते तुम्हाला सांगितल…खंडोबाची आन मी खोटे नाही बोलत..
पण काका खंडोजी मेला तर काय त्याचे भूत होत काय आमच्यासोबत…?शक्यच नाही ओ..माणसासारखा माणूसच होता,किती साधा आणि सरळ…..
गप्प बसा…..काका ओरडले…..
आय माहिती काय आहे खंडोजीबद्दल तुम्हास्नी…..या हातानी लहानाचा मोठा केलाय, कुस्ती शिकवली हत्यारे शिकवली आहेत मी…..
पण कर्तव्यापुढे हिंदवी स्वराज्यात कोणालाही मान नाही….असे म्हणत वस्ताद काका बोलू लागले…..
ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट रात्र होती.
जनावरांची भाषा अवगत असणाऱ्या बाजींदच्या तावडीतून प्रत्यक्ष आमच्या बहिर्जीनी जर आम्हाला वाचवले नसते तर आज आम्ही जिवंत नसतो..
जीवना-मरणाच्या दारात आम्ही सारे ज्याच्यामुळे उभे होते तो मस्त लग्नाच्या बोहल्यावर आनंदाने उभा होता..!
पण खुद्द बहिर्जी नाईक आमच्या सोबत होते त्यामुळे पुढे महासागर जरी आला असता ती विजय आमचाच होता….एक राजकारण घडले त्या रात्री…..
यशवंतमाचीच्या जगलात गस्तीवर असलेल्या मावळ्यांच्या हाती यशवंतमाची पैलवान लागले…भीमा जाधव आणि त्याचे सहकारी.
त्यांना कैद करुन मावळ्यांनी आमच्या छावणीत बहिर्जी नाईकांच्या समोर आणले.
घाबरलेल्या भीमाने यशवंतमाचीचा सरदार मला करणार असाल तर मी तुम्हाला माचीत घुसायची वाट दाखवतो असे म्हणाला.आणि त्याने दाखवलेल्या वाटेने मराठ्यांची सारी सेना यशवंतमाचीचा मार्ग त्या काळोख्या आधारात चालू लागली..
खंडोजी आणि सावित्री विवाहाच्या बंधनात अडकल्याचीही बातमी भीमाने आम्हाला दिली होती.
ती रात्र खंडोजी साठी काळरात्र ठरली होती.
कर्तव्यात कसूर करून एका स्त्रीसाठी मराठ्यांच्या विरोधात शस्त्र उचलणारा
खंडोजी ,बहिर्जी नाईकांच्या डोक्यातून जात नव्हता,यशवंतमाचीसारख्या
छोट्याश्या राज्याला स्वराज्यात आणायला इतका अवधी कसा जातोय याचीउत्तरे महाराजांना हवी होती.
त्यामुळे खुद्द बहिर्जी नाईकांनी या मोहिमेत स्वताहून भाग घेतला होता.
नाईक स्वता मोहिमेत असले कि मावळ्यांना प्रत्यक्ष शिवछत्रपती सोबत
असल्याचा अनुभव येत असे…त्यामुळे जवळपास विजयाची माळ आमच्याच
गळ्यात पडणार असे वाटत होते.
यशवंतमाचीच्या आत आम्ही सारे पोहचलो.
काही कस्न राजे येसाजीरावाना कैद करायची ही योजना आखली होती.
आत किती फौज आहे याची बित्तंबातमी भीमाने अगोदरच आम्हाला दिली होती.
मध्यरात्र उलटून गेली होती आणि त्या किरै रात्रीत साखरझोप घेणाऱ्या
यशवंतमाचीत मराठ्यांची पहिली आरोळी घुमली…..
हर हर महादेव…छत्रपती शिवाजी महाराज की जय ……
मराठ्यांच्या आरोळीने झोपलेल्या माणसांच्या अंगावर विस्तू पडून दचकून जाग यावी अशी यशवंतमाची जागी झाली.
शिर्के मंडळी सुध्दा युद्धाला तयार झाली.
हजारभर मराठे विरुद्ध कित्येक शिर्के मंडळी आता एकमेकाविरुद्ध तुटून पडणार होती…पण एवढ्या काळात मराठ्यांनी यशवंतमाचीची प्रेधा उडवणे सुरु केले होते.
कित्येक घरे जाळून टाकली होती,जीव वाचवून कित्येक लोक रस्त्यावरून धावत होते.
मराठ्यांच्या फौजेचे वैशिष्ट्य म्हणजे शत्रूच्या कुटुंब काबिल्याला कधीही प्राणदंड
दिला जात नसे ….कित्येक शिर्के मंडळी रस्त्यावरून धावू लागली..सारी यशवंतमाची भीतीने थरथर कापत होती…
दरम्यान यशवंतमाचीच्या बालेकिल्ल्यातून शूर शिक्यांची चिवट सेना नदीला पूर यावा तश्या त्वेषाने हातात नंग्या समशेरी घेऊन बाहेर पडल्या….
क्रमशः
वस्ताद काकाचे हे बोल ऐकताच सखाराम बोलला..
काका…ही पेटी बघा….आम्ही साधी गरीब लोक…कशाला राजकारणात पडतोय.जे पाहिल.ज्याने है दिल ते तुम्हाला सांगितल…खंडोबाची आन मी खोटे नाही बोलत..
पण काका खंडोजी मेला तर काय त्याचे भूत होत काय आमच्यासोबत…?शक्यच नाही ओ..माणसासारखा माणूसच होता,किती साधा आणि सरळ…..
गप्प बसा…..काका ओरडले…..
आय माहिती काय आहे खंडोजीबद्दल तुम्हास्नी…..या हातानी लहानाचा मोठा केलाय, कुस्ती शिकवली हत्यारे शिकवली आहेत मी…..
पण कर्तव्यापुढे हिंदवी स्वराज्यात कोणालाही मान नाही….असे म्हणत वस्ताद काका बोलू लागले…..
ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट रात्र होती.
जनावरांची भाषा अवगत असणाऱ्या बाजींदच्या तावडीतून प्रत्यक्ष आमच्या बहिर्जीनी जर आम्हाला वाचवले नसते तर आज आम्ही जिवंत नसतो..
जीवना-मरणाच्या दारात आम्ही सारे ज्याच्यामुळे उभे होते तो मस्त लग्नाच्या बोहल्यावर आनंदाने उभा होता..!
पण खुद्द बहिर्जी नाईक आमच्या सोबत होते त्यामुळे पुढे महासागर जरी आला असता ती विजय आमचाच होता….एक राजकारण घडले त्या रात्री…..
यशवंतमाचीच्या जगलात गस्तीवर असलेल्या मावळ्यांच्या हाती यशवंतमाची पैलवान लागले…भीमा जाधव आणि त्याचे सहकारी.
त्यांना कैद करुन मावळ्यांनी आमच्या छावणीत बहिर्जी नाईकांच्या समोर आणले.
घाबरलेल्या भीमाने यशवंतमाचीचा सरदार मला करणार असाल तर मी तुम्हाला माचीत घुसायची वाट दाखवतो असे म्हणाला.आणि त्याने दाखवलेल्या वाटेने मराठ्यांची सारी सेना यशवंतमाचीचा मार्ग त्या काळोख्या आधारात चालू लागली..
खंडोजी आणि सावित्री विवाहाच्या बंधनात अडकल्याचीही बातमी भीमाने आम्हाला दिली होती.
ती रात्र खंडोजी साठी काळरात्र ठरली होती.
कर्तव्यात कसूर करून एका स्त्रीसाठी मराठ्यांच्या विरोधात शस्त्र उचलणारा
खंडोजी ,बहिर्जी नाईकांच्या डोक्यातून जात नव्हता,यशवंतमाचीसारख्या
छोट्याश्या राज्याला स्वराज्यात आणायला इतका अवधी कसा जातोय याचीउत्तरे महाराजांना हवी होती.
त्यामुळे खुद्द बहिर्जी नाईकांनी या मोहिमेत स्वताहून भाग घेतला होता.
नाईक स्वता मोहिमेत असले कि मावळ्यांना प्रत्यक्ष शिवछत्रपती सोबत
असल्याचा अनुभव येत असे…त्यामुळे जवळपास विजयाची माळ आमच्याच
गळ्यात पडणार असे वाटत होते.
यशवंतमाचीच्या आत आम्ही सारे पोहचलो.
काही कस्न राजे येसाजीरावाना कैद करायची ही योजना आखली होती.
आत किती फौज आहे याची बित्तंबातमी भीमाने अगोदरच आम्हाला दिली होती.
मध्यरात्र उलटून गेली होती आणि त्या किरै रात्रीत साखरझोप घेणाऱ्या
यशवंतमाचीत मराठ्यांची पहिली आरोळी घुमली…..
हर हर महादेव…छत्रपती शिवाजी महाराज की जय ……
मराठ्यांच्या आरोळीने झोपलेल्या माणसांच्या अंगावर विस्तू पडून दचकून जाग यावी अशी यशवंतमाची जागी झाली.
शिर्के मंडळी सुध्दा युद्धाला तयार झाली.
हजारभर मराठे विरुद्ध कित्येक शिर्के मंडळी आता एकमेकाविरुद्ध तुटून पडणार होती…पण एवढ्या काळात मराठ्यांनी यशवंतमाचीची प्रेधा उडवणे सुरु केले होते.
कित्येक घरे जाळून टाकली होती,जीव वाचवून कित्येक लोक रस्त्यावरून धावत होते.
मराठ्यांच्या फौजेचे वैशिष्ट्य म्हणजे शत्रूच्या कुटुंब काबिल्याला कधीही प्राणदंड
दिला जात नसे ….कित्येक शिर्के मंडळी रस्त्यावरून धावू लागली..सारी यशवंतमाची भीतीने थरथर कापत होती…
दरम्यान यशवंतमाचीच्या बालेकिल्ल्यातून शूर शिक्यांची चिवट सेना नदीला पूर यावा तश्या त्वेषाने हातात नंग्या समशेरी घेऊन बाहेर पडल्या….
क्रमशः
बाजींद भाग ३८
बाजींद भाग ३८
हजारो हात खाली तो देह गेला आणि एका मोठ्या खडकावर आपटला आणि खाली खोल निबिड अरण्यात रक्ताने माखलेला खंडोजी गतप्राण झाला….
सूर्य उगवला.हजारो सूर्यकिरणांनी रायगड उजळून निघाला ,पण गडावरील कोणाचेच लक्ष कामात नव्हते..सर्वांच्या मुखात एकच नाव होते खंडोजी….
आज एक नवीन अध्याय लिहला गेला.
स्वराज्यात फितुरांना क्षमा नाही..इये भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते.खंडोजी चा अध्याय संपला.
यशवंतमाची वर भगवा ध्वज अभिमानाने डोलू लागला.
राजे येसाजीराव आणि जिच्यामुळे खंडोजीला प्राण गमवावे लागले ती सावित्री चोरवाटेने विजापूर कडे रवाना झाली होती.
भीमा जाधव शिाच्य हातून ठार झाला होता…!
यशवंतमाची च्या मोहिमेने खंडोजी सारख्या निष्ठ्वान हेराचा बळी मात्र नक्कीच घेतला होता…..एका स्त्रीच्या मोहपाशात कर्तव्य विसरलेला हेर….खंडोजी…!
वस्ताद काकांना हुंदके आवरत नव्हते …सखाराम आणि त्यांच्या साथीदारांची मात्र पाचावर धारण बसली होती…….खंडोजी मस्न गेला आहे.तर आम्हाला इथवर आणले तरी कोणी…..भीतीने त्यांचे सर्वाग थरथरत होते….!
वस्ताद काकांच्या बोलण्यावरून सखाराम व त्याच्या सवंगड्याना अक्षरश घाम फुटला होता.
नरभक्षक वाघांच्या तडाख्यातून ज्या खंडोजी ने वाचवले ,ज्या खंडोजी ने रायगड पर्यंत येण्याचा मार्ग सुकर करून दिला,तो खंडोजी जिवंतच नाही ही कल्पनाच
त्याना पटेना,पण वस्ताद काकांच्या काळजातून आलेले शब्द आणि डोळ्यातील अथू खोटे असावेत असे त्याना वाटेना…!सखाराम ला तर फार मोठा धक्का बसला होता,कसे सांगावे की याच खंडोजी बरोबर दिवसभर चालून बाजिंद ची रहस्यमय कथा जाणून घेतली.
त्याच्याबरोबर राहून शिवराय समजून घेतले,बहिर्जी नाईक समजून घेतले. सर्वच जटील होते..
काही क्षण भूतकाळात विलीन झाले आणि निर्धाराने वस्ताद काका बोलले.
चला…माझ्या खंडोजी ने मरुन सुध्दा कर्तव्य बजावले हे मात्र खरे.
लहान मोठ्या सर्वानाच मदत करणारा होता तो,शिवाजी महाराज रक्तात होते त्याच्या..पण,पण कर्तव्य विसरलेला हेर हा शिक्का कायमचा पडला होता.त्याच्यावर तो किमान माझ्या पुरता तरी पुसला गेला आहे..!
चला,आपण हेर खात्याच्या केंद्रात जाऊ..तिये जाऊन बहिर्जीना याची वर्दी देऊ..तिथून पुढे तुमच्या वाडीवर जाऊन महाराजांच्या हकमानुसार अंमलबजावणी करु..
चला…
सारे उठले आणि ती जंगलातील चोरवाट चालू लागले..
मजल दरमजल करत एका डोंगरावर चढून ज्या मार्गे येताना ते आले होते त्याच मार्गातील गुहेत शिरले….
गुहेत पूर्वीचाच हेर साधूचे रूप घेऊन ध्यानस्त बसला होता.
त्याला पाहताच काका बोलले…जय रोहिडेश्वर…..
त्यावर डोळे उघडत तो हेर बोलला..जय भवानी…..
क्रमशः...
हजारो हात खाली तो देह गेला आणि एका मोठ्या खडकावर आपटला आणि खाली खोल निबिड अरण्यात रक्ताने माखलेला खंडोजी गतप्राण झाला….
सूर्य उगवला.हजारो सूर्यकिरणांनी रायगड उजळून निघाला ,पण गडावरील कोणाचेच लक्ष कामात नव्हते..सर्वांच्या मुखात एकच नाव होते खंडोजी….
आज एक नवीन अध्याय लिहला गेला.
स्वराज्यात फितुरांना क्षमा नाही..इये भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते.खंडोजी चा अध्याय संपला.
यशवंतमाची वर भगवा ध्वज अभिमानाने डोलू लागला.
राजे येसाजीराव आणि जिच्यामुळे खंडोजीला प्राण गमवावे लागले ती सावित्री चोरवाटेने विजापूर कडे रवाना झाली होती.
भीमा जाधव शिाच्य हातून ठार झाला होता…!
यशवंतमाची च्या मोहिमेने खंडोजी सारख्या निष्ठ्वान हेराचा बळी मात्र नक्कीच घेतला होता…..एका स्त्रीच्या मोहपाशात कर्तव्य विसरलेला हेर….खंडोजी…!
वस्ताद काकांना हुंदके आवरत नव्हते …सखाराम आणि त्यांच्या साथीदारांची मात्र पाचावर धारण बसली होती…….खंडोजी मस्न गेला आहे.तर आम्हाला इथवर आणले तरी कोणी…..भीतीने त्यांचे सर्वाग थरथरत होते….!
वस्ताद काकांच्या बोलण्यावरून सखाराम व त्याच्या सवंगड्याना अक्षरश घाम फुटला होता.
नरभक्षक वाघांच्या तडाख्यातून ज्या खंडोजी ने वाचवले ,ज्या खंडोजी ने रायगड पर्यंत येण्याचा मार्ग सुकर करून दिला,तो खंडोजी जिवंतच नाही ही कल्पनाच
त्याना पटेना,पण वस्ताद काकांच्या काळजातून आलेले शब्द आणि डोळ्यातील अथू खोटे असावेत असे त्याना वाटेना…!सखाराम ला तर फार मोठा धक्का बसला होता,कसे सांगावे की याच खंडोजी बरोबर दिवसभर चालून बाजिंद ची रहस्यमय कथा जाणून घेतली.
त्याच्याबरोबर राहून शिवराय समजून घेतले,बहिर्जी नाईक समजून घेतले. सर्वच जटील होते..
काही क्षण भूतकाळात विलीन झाले आणि निर्धाराने वस्ताद काका बोलले.
चला…माझ्या खंडोजी ने मरुन सुध्दा कर्तव्य बजावले हे मात्र खरे.
लहान मोठ्या सर्वानाच मदत करणारा होता तो,शिवाजी महाराज रक्तात होते त्याच्या..पण,पण कर्तव्य विसरलेला हेर हा शिक्का कायमचा पडला होता.त्याच्यावर तो किमान माझ्या पुरता तरी पुसला गेला आहे..!
चला,आपण हेर खात्याच्या केंद्रात जाऊ..तिये जाऊन बहिर्जीना याची वर्दी देऊ..तिथून पुढे तुमच्या वाडीवर जाऊन महाराजांच्या हकमानुसार अंमलबजावणी करु..
चला…
सारे उठले आणि ती जंगलातील चोरवाट चालू लागले..
मजल दरमजल करत एका डोंगरावर चढून ज्या मार्गे येताना ते आले होते त्याच मार्गातील गुहेत शिरले….
गुहेत पूर्वीचाच हेर साधूचे रूप घेऊन ध्यानस्त बसला होता.
त्याला पाहताच काका बोलले…जय रोहिडेश्वर…..
त्यावर डोळे उघडत तो हेर बोलला..जय भवानी…..
क्रमशः...
रविवार, ५ जुलै, २०२०
बाजींद भाग ३७
बाजींद भाग ३७
साऱ्या रायगडच्या काळजात धस्स झाले अशी कठोर शिक्षा खुद्द बहिर्जी नाईकांनी फर्मावली.
कडेलोट……
होय…..अश्या फितुरांना स्वराज्यात एकाच शासन….मृत्युदंड. भल्या पहाटेच खंडोजीचे हात मागे बांधून तोंड काळ्या वस्त्राने बांधून त्याला टकमक टोकावर आणले गेले होते. वस्ताद काका स्वता पाठीमागे उभे होत.ज्याला लहानाचे मोठे या हातानी केले ,कुस्तीसह हत्यारे शिकवली.
हेरखात्यात नोकरी मिळवून दिली अश्या पोराला आज स्वताच्या हाताने मरण द्यायचे होते….
वस्ताद काकांनी बहिर्जी नाईकांना हात जोडून विनवणी केली….
नाईक,माझी आजवरची सेवा चाकरी रुजू धरून एक डाव या खंडोजीला माफी करा.
या पोरांन आजवर जीवावरच्या कामगिन्या आपल्या सोबत केल्या आहेत.
अशीही यशवंतमाचीसुध्दा स्वराज्यात सामील झाली असताना त्याला इतकी भयानक शिक्षा कशासाठी…?
कशासाठी……आज खंडोजीला माफ केले तर हजारो हेर जे स्वराज्यात फिरत आहेत ते सुध्दा स्वार्थापोटी संसार थाटून बसतील वस्ताद काका.
साधारण माणसांचे आयुष्य वेगळे आणि स्वराज्याचे हेर खाते वेगळे आहे हे तुम्ही जाणता.इये उठता बसता मरणाशी सामना करत आपण जगतो…आणि आपल्या मुळे महाराष्ट्राची प्रजा आज सुखात आहे.
महाराजांची शिस्त,त्यांची शिकवण….त्यांचा त्याग डोळ्यासमोर आणा काका ..तो एका पारड्यात टाका आणि खंडोजीचा गुन्हा …कोणाचे पारडे जड होईल तुम्हीच ठरवा.
खंडोजीच्या वैयक्तिक सुखासाठी कित्येक मावळे तलवारीच्या घावाखाली मरुन गेली.
ज्या शिर्क्यांच्या मुजोरीने आदिलशाही महाराजांना कमी लेखत होती त्या यशवंतमाचीची महत्त्वकांक्षी मोहीम आपण खंडोजी ला दिली आणि घात करून बसलो.
आज रायगड परिसरात अनेक स्वकीय राज्ये स्वराज्यात नाहीत….एका
यशवंतमाचीला जिंकायला इतका वेळ तर मग इतर राज्यांचे कसे होईल…
महाराजांच्या डोक्यात दक्षिण-दिग्विजय थैमान घालत आहे. आणि इकडे हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडच्या दिव्याखाली अंधार,
हा ठपका महाराजांच्यावर येतो काका…देशाचा विचार करा..म्हणजे वैयक्तिक !
खंडोजीवरील तुमचे प्रेम कुठे आहे समजेल…..
बहिर्जी नाईकांची नाकपुडी रागाने फुलली होती.
पाठमोरे उभे राहून ते भरल्या डोळ्याने सांगत होते..!
खंडोजीवर साऱ्यांचे प्रेम होते.
मनमिळावू स्वभाव कुस्तीत-हत्यारे चालवण्यात पटाईत…महाराजांच्यावर अढळ श्रद्धा या गुणामुळे तो सर्वांच्या मनात बसला होता. पण,असा योद्धा एका स्त्री साठी असा का वागु शकतो याचे कोडे सर्वाना पडले होते.
त्याला मृत्युदंडाची शिक्षा देऊनही महाराज गप्प का होते हे कोडे उलगडत नव्हते…कदाचित दक्षिण दिग्विजयाच्या तयारीमुळे त्यांना वेळ नसेल…..।
वस्ताद काका मात्र हुंदके देत देत सारे आठवत होते.
खंडोजीला टकमक टोकावर आणला गेला होता….
टकमकाखालून थंडगार वारे वर येत होते.
पहाटेच्या गर्द शांततेत सारे स्वराज्य झोपी गेले होते मात्र स्वराज्यासाठी
आहोरात्र जगलेला पण कर्तव्यात चुकलेला एक हेर आता मरणाच्या दारात उभा होता…!
वस्ताद काकांनी डोळे पुसत त्याला धरून आणलेल्या हशमाना खून केली…. एक क्षण. दुसरा क्षण…..खंडोजीला टकमक टोकावरून खाली ढकलून दिले गेले….
क्रमशः...
साऱ्या रायगडच्या काळजात धस्स झाले अशी कठोर शिक्षा खुद्द बहिर्जी नाईकांनी फर्मावली.
कडेलोट……
होय…..अश्या फितुरांना स्वराज्यात एकाच शासन….मृत्युदंड. भल्या पहाटेच खंडोजीचे हात मागे बांधून तोंड काळ्या वस्त्राने बांधून त्याला टकमक टोकावर आणले गेले होते. वस्ताद काका स्वता पाठीमागे उभे होत.ज्याला लहानाचे मोठे या हातानी केले ,कुस्तीसह हत्यारे शिकवली.
हेरखात्यात नोकरी मिळवून दिली अश्या पोराला आज स्वताच्या हाताने मरण द्यायचे होते….
वस्ताद काकांनी बहिर्जी नाईकांना हात जोडून विनवणी केली….
नाईक,माझी आजवरची सेवा चाकरी रुजू धरून एक डाव या खंडोजीला माफी करा.
या पोरांन आजवर जीवावरच्या कामगिन्या आपल्या सोबत केल्या आहेत.
अशीही यशवंतमाचीसुध्दा स्वराज्यात सामील झाली असताना त्याला इतकी भयानक शिक्षा कशासाठी…?
कशासाठी……आज खंडोजीला माफ केले तर हजारो हेर जे स्वराज्यात फिरत आहेत ते सुध्दा स्वार्थापोटी संसार थाटून बसतील वस्ताद काका.
साधारण माणसांचे आयुष्य वेगळे आणि स्वराज्याचे हेर खाते वेगळे आहे हे तुम्ही जाणता.इये उठता बसता मरणाशी सामना करत आपण जगतो…आणि आपल्या मुळे महाराष्ट्राची प्रजा आज सुखात आहे.
महाराजांची शिस्त,त्यांची शिकवण….त्यांचा त्याग डोळ्यासमोर आणा काका ..तो एका पारड्यात टाका आणि खंडोजीचा गुन्हा …कोणाचे पारडे जड होईल तुम्हीच ठरवा.
खंडोजीच्या वैयक्तिक सुखासाठी कित्येक मावळे तलवारीच्या घावाखाली मरुन गेली.
ज्या शिर्क्यांच्या मुजोरीने आदिलशाही महाराजांना कमी लेखत होती त्या यशवंतमाचीची महत्त्वकांक्षी मोहीम आपण खंडोजी ला दिली आणि घात करून बसलो.
आज रायगड परिसरात अनेक स्वकीय राज्ये स्वराज्यात नाहीत….एका
यशवंतमाचीला जिंकायला इतका वेळ तर मग इतर राज्यांचे कसे होईल…
महाराजांच्या डोक्यात दक्षिण-दिग्विजय थैमान घालत आहे. आणि इकडे हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडच्या दिव्याखाली अंधार,
हा ठपका महाराजांच्यावर येतो काका…देशाचा विचार करा..म्हणजे वैयक्तिक !
खंडोजीवरील तुमचे प्रेम कुठे आहे समजेल…..
बहिर्जी नाईकांची नाकपुडी रागाने फुलली होती.
पाठमोरे उभे राहून ते भरल्या डोळ्याने सांगत होते..!
खंडोजीवर साऱ्यांचे प्रेम होते.
मनमिळावू स्वभाव कुस्तीत-हत्यारे चालवण्यात पटाईत…महाराजांच्यावर अढळ श्रद्धा या गुणामुळे तो सर्वांच्या मनात बसला होता. पण,असा योद्धा एका स्त्री साठी असा का वागु शकतो याचे कोडे सर्वाना पडले होते.
त्याला मृत्युदंडाची शिक्षा देऊनही महाराज गप्प का होते हे कोडे उलगडत नव्हते…कदाचित दक्षिण दिग्विजयाच्या तयारीमुळे त्यांना वेळ नसेल…..।
वस्ताद काका मात्र हुंदके देत देत सारे आठवत होते.
खंडोजीला टकमक टोकावर आणला गेला होता….
टकमकाखालून थंडगार वारे वर येत होते.
पहाटेच्या गर्द शांततेत सारे स्वराज्य झोपी गेले होते मात्र स्वराज्यासाठी
आहोरात्र जगलेला पण कर्तव्यात चुकलेला एक हेर आता मरणाच्या दारात उभा होता…!
वस्ताद काकांनी डोळे पुसत त्याला धरून आणलेल्या हशमाना खून केली…. एक क्षण. दुसरा क्षण…..खंडोजीला टकमक टोकावरून खाली ढकलून दिले गेले….
क्रमशः...
बाजींद भाग ३६
बाजींद भाग ३६
काळभैरवाच्या नांवान चांगभलं…….
तलवारीचे घाव एकमेकावर पडू लागले…!
मराठे विरुद्ध मराठे लढू लागले.हेच शिवाजी महाराजांना नको होते म्हणून कित्येक वर्षे यशवंतमाचीकडे
महाराजांचे दुर्लक्ष होते.
पण,परकीय शत्रूपेक्षा स्वकीय शत्रूच जास्त घातक हा अनुभव महाराज सारया
आयुष्यभर घेत आले होते.
आता निर्वाणीचा क्षण होता.रामराज्य आणायचे असेल तर रावण स्वकीय आहे
म्हणून गप्प बसता कामा नये.
आज शिर्के विरुद्ध मावळे घनघोर युद्धास प्रारंभ झाला होता.
खुद बहिर्जी नाईक या युध्दात होते.
कसे काय देव जाणे…आजवर बहिर्जी नाईक प्रत्यक्ष युद्धात फार कमी येत असत.व्यवस्थित पूर्वनियोजन करून देत सारे तेच करत असायचे मात्र हातात तलवार
घेऊन लढणे सहसा दिसत नव्हते…!
नाईकांच्या युद्धनीतीने मराठ्यांची सेना शिक्यांच्या विरोधात लढत होती.
यशवंतमाचीशी वैर करून त्यांच्याच विरोधात भीमा जाधवही लढत होता.
पण,या सार्या दंग्यात खंडोजी कुठे होता ?
तो तर सर्वात पुढे येऊन लढायला हवा होता. आतातर यशवंतमाधीचा जावई होता
तो….
पण,खंडोजी कुठेच दिसत नव्हता……
पण त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ होता….जीवघेण्या लढाईला प्रारंभ झाला.
भीमा जाधवाने शिर्क्यांचा संहार मांडला होता.त्याच्या तलवारीच्या घावाखाली
कित्येक शिर्के मंडळी मृत्युमुखी पडू लागली.
भीमाच्या भोवती अनेक शिर्क्यांनी कडे केले होते…तरीही भीमा मागे हटत
नव्हता…मारामारीत भीमा चांगलाच दूर गेला…दिसेनासा झाला..तरीही तलवारीचे
खणखणाट ऐकू येतच होता.
बहिर्जी नाईकांनी यशवंतमाचीच्या राजवाड्यावर हल्ला चढवला..काही क्षण
भूतकाळात जमा झाले आणि माचीवर हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकू
लागला…
झाले…..अनेक वर्षे गुर्मीत राहून महाराजांशी अभिमानाने वैर मिरवणारी
यशवंतमाची हिंदवी स्वराज्यात सामील झाली.
राजवाड्यात मात्र राजे येसाजीराव शिर्के,त्यांचा कुटुंबकबीला जाग्यावर
नव्हताच….कदाचित युद्धाच्या घोषणा झाल्या त्यावेळी गुप्तवाटेने ते पसार झाले
असावेत असे वाटते…पण माची स्वराज्यात सामील झाली.
एक मात्र घटना खूप वाईट तितकीच चांगलीही घडली.
खंडोजी मराठ्यांच्या हाती जिवंत गवसला.
खुद्द बहिर्जी नाईकांनी त्याला चोरवाटेने पळून जाताना पकडले होते.
तोंडावर काळे अवलान बांधून त्याला हात बांधून धक्के मारत त्यांनी सर्वासमोर
आणले….!
यशवंतमाची हिंदवी स्वराज्यात सामील झाल्याचे वृत्त रायगडावर रवाना झाले.
माचीच्या रक्षणाला मराठी फौज ठेवत नाईक आणि वस्ताद काका खंडोजीला
घेऊन रायगडावर आले होते…!
कोणत्या तोंडाने सांगावे महाराजांना खंडोजी सारख्या निष्ठावान हेराची गद्दारी..!
महाराजांना अश्या गोष्टी न सांगणेच हितकारक असते…
खंडोजीने कर्तव्यात कसूर करुन,एका स्त्री च्या मोहमायेत अडकून आपल्याच
बांधवाना कित्येकदा धोक्यात आणले व त्यांच्याविरुद्ध शस्त्र चालवले,त्याच्या या
वागण्याने मराठ्यांच्या गुप्त मोहिमेला आणि हेरखात्याच्या नियमांना तडा
गेला. कित्येक मराठे मृत्युमुखी पडले, कित्येक बायका विधवा झाल्या.असा ठपका त्याच्यावर ठेवला गेला आणि ….
साऱ्या रायगडच्या काळजात धस्स झाले अशी शिक्षा बहिर्जी नाईकांनी फर्मावली.
कडेलोट..!
होय! अशा फितुरांना स्वराज्यात एकच शासन..मृत्यूदंड
क्रमशः
काळभैरवाच्या नांवान चांगभलं…….
तलवारीचे घाव एकमेकावर पडू लागले…!
मराठे विरुद्ध मराठे लढू लागले.हेच शिवाजी महाराजांना नको होते म्हणून कित्येक वर्षे यशवंतमाचीकडे
महाराजांचे दुर्लक्ष होते.
पण,परकीय शत्रूपेक्षा स्वकीय शत्रूच जास्त घातक हा अनुभव महाराज सारया
आयुष्यभर घेत आले होते.
आता निर्वाणीचा क्षण होता.रामराज्य आणायचे असेल तर रावण स्वकीय आहे
म्हणून गप्प बसता कामा नये.
आज शिर्के विरुद्ध मावळे घनघोर युद्धास प्रारंभ झाला होता.
खुद बहिर्जी नाईक या युध्दात होते.
कसे काय देव जाणे…आजवर बहिर्जी नाईक प्रत्यक्ष युद्धात फार कमी येत असत.व्यवस्थित पूर्वनियोजन करून देत सारे तेच करत असायचे मात्र हातात तलवार
घेऊन लढणे सहसा दिसत नव्हते…!
नाईकांच्या युद्धनीतीने मराठ्यांची सेना शिक्यांच्या विरोधात लढत होती.
यशवंतमाचीशी वैर करून त्यांच्याच विरोधात भीमा जाधवही लढत होता.
पण,या सार्या दंग्यात खंडोजी कुठे होता ?
तो तर सर्वात पुढे येऊन लढायला हवा होता. आतातर यशवंतमाधीचा जावई होता
तो….
पण,खंडोजी कुठेच दिसत नव्हता……
पण त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ होता….जीवघेण्या लढाईला प्रारंभ झाला.
भीमा जाधवाने शिर्क्यांचा संहार मांडला होता.त्याच्या तलवारीच्या घावाखाली
कित्येक शिर्के मंडळी मृत्युमुखी पडू लागली.
भीमाच्या भोवती अनेक शिर्क्यांनी कडे केले होते…तरीही भीमा मागे हटत
नव्हता…मारामारीत भीमा चांगलाच दूर गेला…दिसेनासा झाला..तरीही तलवारीचे
खणखणाट ऐकू येतच होता.
बहिर्जी नाईकांनी यशवंतमाचीच्या राजवाड्यावर हल्ला चढवला..काही क्षण
भूतकाळात जमा झाले आणि माचीवर हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकू
लागला…
झाले…..अनेक वर्षे गुर्मीत राहून महाराजांशी अभिमानाने वैर मिरवणारी
यशवंतमाची हिंदवी स्वराज्यात सामील झाली.
राजवाड्यात मात्र राजे येसाजीराव शिर्के,त्यांचा कुटुंबकबीला जाग्यावर
नव्हताच….कदाचित युद्धाच्या घोषणा झाल्या त्यावेळी गुप्तवाटेने ते पसार झाले
असावेत असे वाटते…पण माची स्वराज्यात सामील झाली.
एक मात्र घटना खूप वाईट तितकीच चांगलीही घडली.
खंडोजी मराठ्यांच्या हाती जिवंत गवसला.
खुद्द बहिर्जी नाईकांनी त्याला चोरवाटेने पळून जाताना पकडले होते.
तोंडावर काळे अवलान बांधून त्याला हात बांधून धक्के मारत त्यांनी सर्वासमोर
आणले….!
यशवंतमाची हिंदवी स्वराज्यात सामील झाल्याचे वृत्त रायगडावर रवाना झाले.
माचीच्या रक्षणाला मराठी फौज ठेवत नाईक आणि वस्ताद काका खंडोजीला
घेऊन रायगडावर आले होते…!
कोणत्या तोंडाने सांगावे महाराजांना खंडोजी सारख्या निष्ठावान हेराची गद्दारी..!
महाराजांना अश्या गोष्टी न सांगणेच हितकारक असते…
खंडोजीने कर्तव्यात कसूर करुन,एका स्त्री च्या मोहमायेत अडकून आपल्याच
बांधवाना कित्येकदा धोक्यात आणले व त्यांच्याविरुद्ध शस्त्र चालवले,त्याच्या या
वागण्याने मराठ्यांच्या गुप्त मोहिमेला आणि हेरखात्याच्या नियमांना तडा
गेला. कित्येक मराठे मृत्युमुखी पडले, कित्येक बायका विधवा झाल्या.असा ठपका त्याच्यावर ठेवला गेला आणि ….
साऱ्या रायगडच्या काळजात धस्स झाले अशी शिक्षा बहिर्जी नाईकांनी फर्मावली.
कडेलोट..!
होय! अशा फितुरांना स्वराज्यात एकच शासन..मृत्यूदंड
क्रमशः
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४
संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...

-
*🚩 बाजींद भाग - ४४ ⚔️* * ▶ बाजीराव कडे गंभीरपणे पाहत तो म्हातारा गृहस्थ बोलला …* * कोण र तू .. ?* * हिकड मरायला प...
-
नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी 📜 ⚔ अग्निदिव्य लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार __ 📜 ⚔ 🗡 भाग - 7⃣ 📜 ...
-
शंभू चरित्रं भाग ३६ ( वाचा आणि शेअरं करा ) औरंगजेबानं आदिलशाही जिंकली , कुतूबशाही ताब्यात घेतली , आणि मग ! औरंगजेबा...