
✒️प्रसाद कुलकर्णी
किरेर काळ्या रातीचं.....आमी शेपाचशे फाकडं गडी गुंजवणीच्या ढवात उतरलो....डोळ्यात बोट घातल्यागत काळा कुट्ट अंधार होता..आधी गारठा हाई फोडीत होता त्यातनं पानी लईच गारदोन झाल्यालं... सुभेदार तान्या निधइया छाताडानं समयांच्या म्होरं हुता...किती बी आवाज न्हाई करायचा म्हनलं तरी बी पान्याचा आवाज हुतच हुता... आमी चार घोळक्यान पानी कपाय सुरवात केल्ती...आमच्या आदी सुर्याजीन त्येच्या गडयांना नदी पल्याड न्हेल हुतं... माज्या गळ्या पातूर पानी आल्याव म्या समशेर दातात धरली अन पान्याव आडवा हन पानी कापाय सुरवात केली...... इतक्यात पाज्यात येकच हैदोस उठला पाक समदं पानी ढवळून निघालं...
म्या काय ते उमगलो.. मघापासनं
पुरुषभर लांबीची मगर ...डुख धरुज पव्हत ती...
म्या येळ न दवडता शेजारचा गडी काखत घेतला ...अन पल्याड टाकला....तवड्यात जनावरान मला बगल देत ढुशी दिली ...जाइभरड खरखरीत जनावराचं धूड अंगाला घाशीत म्होरं गेलं.....अन काय कळायच्या आत.. पुढच्या गड्याव भला मोठा जबडा वासला... हातभर धारदार जर्द सुळ्याची पंगत अंधारात बी चमकून दिसली......खिनभर मी सोताला
सुधरलं अन दातातली समशेर काढून पान्यात उसळी मारून जनावरांच्या पाटानीत भोकसली... समशेर खडखडत पाठीत पुसलीपण... करून आलं. वयात समोरून तान्यानं जनावरांच्या नरियाला कवळा घातला...पान्यात जनावरांन सुटायची धडपड केली पन सुभेदारानं घातल्याला कवळा कोनाच्या बा ला सुटायचा न्हवता.....म्या मागनं तलवार सपासप लावली.. आसपासचं पानी अजूनच गडद झाल..हळूहळू जनावराची हालचाल थंडावली.. वार काय वर्मी बसला न्हाय....तरी जनावर काय हटाय मागना..... चवताळून अधीकच चाल
शेलारमामा आमच्या मागणी... दीडशे गडयांना घीवुन पल्याड पोचला हुता...घटका मरानं आमी नदी पल्याड आलो....पान्यातनं भाईर आल्याव थडी अजुनच झोबाय लागली....घटकाभर दम खाऊन आम्ही कोडान्याची वाट
धरली...
गोंधळ्याच्या वस्तीवर आधीच सोय झालती... आता पातूर समदं अंधारून आलं हुत.... वाईच उशिरच झालता....
नदीतीरावरनं गुंजवणीची झुडपं, दगड.तुडवीत आमी कोंडान्याच्या सोंडेवरनं निम्म्या डोंगरात गांदळ्याच्या वस्तीव पोचलो.. वस्तीव आदीच चार पाच मावळ्यानी भाकर तुकडा पोचवला हता..आमी ह्यानच दोन चार भाक-या कुस्कारील्या.
वर गडाव समदं गपगारच हतं..सर्याजीच्या मावळ्यांनी मावळतीला डोंगरकड़्याच्या कपारीत कालवाडून घेतलं हतं... आमी सोंडेच्या पल्याड घळीत शाकारून मोर्चा धरला.शेलारमामा अन तानाजी गोंधळ्याच्याम्होरक्यावर बातचीत करीत हुतं...
सुर्याजीनं शीळइशारा केला तसा आमी मावळ्यांनी बाराबंद्या आवाळल्या तुमानी खेचून गुड़ग्यापातूर चढविल्या.
वहाणा काय्यानं पिंडरीपातूर बांधून घेतला... ढाली पाटानीवर बाधुन घेतल्या..... मुंडास शेल्यान हनुवटीवर बांधून
टाकलं......
आमच्यात सव्वाशे गडी भालाईत तर पाच पन्नास पट्टाईत.. हतं.बाकी आमी समदी ढालाइत
-..सुभेदारान पाच पंचवीस पट्टेवाले आमच्यात घेतले हुते.बाकीचं पट्टवाल सूर्याजी बरुबर हु...अन शेलार मामाकई भाले-बरचे ढालाइतांची सरमिसळ झाल्याली....
म्या तलवार येक डाव परत दगडाव पाजकून घ्येतली.मागच्याच खंड़यानवमीचं नवीन हत्यार.... कर्नाटकी पोलाद... चार नाळीचं पान चांगलं चार बोट रुंदीला हतं...परजेला मुसकळ मजबूत हतं... गांज्या खाली इतभर अन टोकाला टप्पूर दोनी हातात धरावी आन गनीम आख्खा फाडून काढावा अशी दमदार समशेर अस्सल उमदं हत्यार हातात आल्यापासनं कवा छाप्यावं जातूय अन हत्याराची पारख करतुय अस झाल्त....
सुभेदारानं बी झटकज तलवार पाजळून घेतली.... तान्याची तलवार आमा समयापरास वजनानं धा शेर जास्तच ,লांबी रुंदीला बी ज्यादा हुती .... पन हत्यार लैच अव्वल हतं. हातात घाशीव ढाल अन नगी समशेर घेतलेला, भंडारा मळवट भरल्याला सुभेदार तान्या आक्षी जेजुरीच्या सोन्या खंडोबावानी दिसायाचा ....गडी अंगानं एकदम जबरदस्त.. कुस्त्या खेळून गब्बर झाला.. छाती फुगावल्याव बाराबंदी दिल्ली हुन वाद्या तुटायच्या ... दडाव हातुब पुरायचान्हाय..... अस्सल घोटीव खाद
.-पुरुषभर लांब ढांग टाकायचा
.
गेल्यालं..म्हनून तर गाडी सर्जा शिवाजीचा गोष्टीतला होता...
समोरच्याला भेदून पल्याइ जाणारी नज़र ..मिशाचे आंकड़े कानापूर
दोन दिसआदी आमी इडा सुपारी घीऊन राजगडाव गेलतो रायबाच्या, तान्याच्या पोराच्या लग्नाचं आवताण द्याला .. पंतानी आमाला सदरला बसवून घेतलं...पाढ-याधूत सुतात जिजामाय बसल्याली... हातात जपमाळ घेतलेली माय, आक्षी देविवाणी दिसत हुती... तान्यानं डोईवरलं मुंडासं काढलं अन जिजाबायच्या सुरकुतलेल्या पायाव माथं टेकलं.
सुभेदाराची आपुलकीनं चवकशी करून माय म्हनाली....
"ताना. शिवबाला सांगावा धाडायला सांगितलं होतं...
अरे कौढण्या सारख आपल मोठ ठाण आणि त्यावरल्या गनिमाला उशाशी का बाळगायच ... एव्हढा गनिम जवळ
असणं स्वराज्यालाघातकच..."
ताना काई बोलनार तवर..ललकारी झाली. सर्जा शिवाजी आस्ते कदम सदरला येताना दिसला......
डावच बघत हुतो...
अंगालगत रंगीत बाराबंदी... पायात तंग तुमान...कमरंला रंगीत शेला ... कानात टपुरं मोती... कोरल्याली दाढी जीवणीवर टोकदार झाल्याली.... गळ्यात कवड्याची दुहेरी माळ... मळवटावर दोन भुवायात भगवा उभा टिळा..नजर
आमी भुईवरनं धडपडत उठलो... लवून मुजरा घातला...मागल्या वक्ताला सर्जाला जावळीच्या छाप्यात बघितला हुता... भोरप्याच्या डोंगराव माडव घालून अफझुल्याचा कोथळा काढला हुता सर्जा बहाददरान.पुढ न थाबता अगाव चिलखत घालून दोनी हातात धोप घिऊन आमच्या बरुबर गनीम कापत हता. पन आज एवढ्या जवळनं पहिल्या
रामाच्या बाणावानी आरपार..एका दोरीत सरळ नाक...मिशाला आकर्ड काढल्याल...सासन काठीवानी शिडशिडीत मजबूत बांधा अन खांद्याला रुंद.... उंचीला सुभेदारापरास दोन बोटं ज्यादाच..
सर्जा आल्यासरशी सुभेदाराला गळामिठी घातली.आमचा उर भरून आला...सर्जाने एकवार आमच्यावर नजर टाकून सलगी दिली.... सर्जा आसनावर बसून सुभेदाराला बोलता झाला.....
"कोंढाणा घ्यायचा बस्स.....
पण आम्ही ही कामगिरी आम्ही दुसन्यास देतो....
.रायबाचं लगीन काढलंस ..
....या वक्ताला राहुदेत....एकदा का कोंढाणा आला.. की मग तुला उसंत नाही तुझ्यासाठी बक्कळ कामगिरी असेल...."
येवढा येळ सजाके एकटक बधित बसलेल्या तान्यानं आवंढा गिळला...जड आवाजात म्हनला
"आरं राजा मी माय भवानीचा पाईक हाय...
सोराज्याचा सुभेदार."
अस म्हनत तान्यानं सदरवचा भंडारा तळहाताव घेतला अन गरजला
"आता .... आदी लगीन कौंडान्याचं मग रायबाचं
आमी संमदयानी "हारार म्हादयेव' चा गलका केला....मागाहून तानाजीने दिलेली जय भवानीची हाळी आख्ख्या राजगडाव घुमून राह्यली..
दोनच दिसांनी आमी पन्नास गडी अन राजगडावचं शे पाचशे मावळ्याची शिबंदी धीऊन सुभेदार तानाजी, सूर्याजी
अन शेलारमामा गड उतरून गुंजवणीच्या पान्यात उतरलो.....
रातीच्या भयाण वार्यात अचानक टिटवी चित्कारल्यागत शीळ घालून गेली..... यो शेलार मामाकडून इशारती हता
...मैंदाळ शीळ फुकली मतदान..मामा त्याच्या गड्या संगत कल्याण दरवाज्यावर मोर्चा धरुन बसला..ही याची
इशारत दिली....
क्रमशः
1 टिप्पणी:
अती उत्कृष्ठ चरित्र लिखाण केलाय तान्हाजी वर. पण पुढील भाग नाहीं पोस्ट केलेत का? प्लीज करा पोस्ट
टिप्पणी पोस्ट करा