फॉलोअर

रविवार, १० मे, २०२०

🏰 हिरकणी भाग ७ 🏰

🏰 हिरकणी भाग ७ 🏰

आम्ही दोघं त्या दरबारात एखाद्या चोराप्रमाणे एका कोपऱ्यात उभे होतो.

आजुबाजुचे काही लोक एकमेकांमधे कुजबुजत होते. बराच वेळ दरबारातील रोजचे कामकाज चालले असावे. आम्ही आमच्या तंद्रीत होतो आणि अचानक तो पुकारा ऐकू आला. हो , हाकाऱ्याने आमचेच नाव पुकारले होते. ते पुकारल्या बरोबर काही शिपाई आमच्या आजुबाजुला येऊन उभे राहिले व त्यांनी आम्हाला पुढे घालून दरबाराच्या मधोमध उभे केले. माझे धनी ... मी ... आणि माझ्या हातात माझा कान्हा.

महाराजांनी आमचे निरीक्षण करता करता पेशव्यांकडे पाहिले. पेशवे उठून उभे राहिले आणि घसा खाकरून समोरील कागद ओढला. त्यांनी दरबाराला तो कागद वाचून दाखवायला सुरुवात केली. वाचून झाल्यावर पुर्ण दरबारात एक भिषण शांतता पसरली. कारण त्या कागदात मी केलेल्या गुन्ह्याचा इतीवृत्तांतच मांडला होता.

सगळ्या दरबाराच्या नजरा आमच्यावर खिळल्या. इतका बेळ अवसान गोळा करुन उभ्या असलेल्या माझ्या पायातुन जणू वारंच गेलं. मी यांच्याकडे पाहिले तर ते देखिल कानकोंडे होऊन अवघडलेल्या अवस्थेत कसेबसे उभे आहेत हे मला जाणवलं. धरणी फाटून मला त्यात सामावून घेईल तर बरे होईल असं मला वाटलं. माझ्या घशाला कोरड पडली. डोळ्यात पाणी उभे राहिले.

"

पंत , या अपराधासाठी गुन्हेगाराला काय शिक्षा आहे ?" एक अत्यंत धीरगंभीर आवाज त्या सुवर्ण सिंहासनावरून उमटला.

प्रत्त्युत्तरादाखल दरबारात काहीच आवाज झाला नाही. मी मान वर करुन पाहिले तर महाराजांनी नजर वळवून पेशव्यांच्या बैठकीकडे पहात पुन्हा प्रश्न विचारला..

" पंत , आम्ही तुम्हाला या अपराधासाठी गुन्हेगाराला काय शिक्षा आहे असं विचारलं?" त्यात स्वरात आता थोडी अधिकारवाणी झळकत होती.

" गडाचे दरवाजे बंद झाल्यावर ....( त्यांनी घसा खाकरत म्हटले )... गडाचे दरवाजे

बंद झाल्यावर अनधीकृतरीत्या गड उतरणे किंवा चढणे हा अत्यंत गंभीर अपराध असून तो हेरगीरी किंवा दगा या कलमांतर्गत मोडतो..... आणि .... आणि त्याचा दंड म्हणजे मृत्युदंड आणि अशा प्रकरणातील गुन्हेगाराला जाणीवपूर्वक आश्रय देणाऱ्या अपराध्याला आजन्म कारावास " कशाबशा आवाजात पेशवे उत्तरले.

मृत्युदंड...... मृत्युदंड..... मृत्युदंड "

संपूर्ण दरबारात आवाज घुमु लागला. पण ते ऐकायला माझे मन जागेवर होतेच कुठे? मी सुन्न होऊन मटकन खालीच बसले. धनी मला उठून उभे करत असावेत पण माझ्या पायातील बळ केव्हाच निघून गेले होते. लागला "

त्या सुवर्ण सिंहासनावरून पुन्हा धीरगंभीर आवाज त्या दरबारात उमटू या दरबारात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला इथल्या नियमांची व त्या नियमांना मोडल्यावर होणाऱ्या शासनाची माहिती निश्चितच आहे. सुर्यास्त झाल्यावर गडाचे दरवाजे आमच्या आज्ञेशिवाय कोणत्याही कारणास्तव व कोणासाठीहि उघडले जाणार नाहीत हा त्यातलाच एक अत्यंत महत्वाचा नियम आहे. या गडावर असणाऱ्या प्रत्येकाच्या जिविताची सुरक्षितता रहावी व कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणुन या अपराधाला "अत्यंत गंभीर " या सदरात टाकून आम्हीच त्यासाठी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद केली आहे आवाज श्वास घेण्यासाठी थांबला.

" बोलणारा

ते काही क्षण मला युगानुयुगं गेल्यासारखे भासले. त्या दैवी व हुकूमत गाजवणाऱ्या आवाजाने पुन्हा बोलायला सुरुवात केली.

हिरकणी.. हिरकणीच नाव ना तुझं ..... तर हिरकणी कडून सूर्यास्त झाल्यावर गडाचे दरवाजे बंद असताना आमच्या अनुज्ञेशिवाय गड उतरून जाण्याचा जघन्य अपराध घडला आहे...... आणि असा गंभीर अपराध करणाऱ्या गुन्हेगाराला आश्रय देण्याचा गुन्हा येसाजी देखिल कडून घडला आहे. गुन्हेगारांना आपला अपराध कबूल आहे काय? "

सगळ्या दरबाराच्या नजरा आमच्यावर रोखल्या. आम्ही दोघांनी एकमेकांकडे केवीलवाण्या नजरेने पाहिले आणि मानेने होकार भरत

" व्हय, कबूल हाय जी " असं कसनुसं उत्तरलो आणि खाली बघत पायाने जमीन उकरु लागलो. माझा कान्होबा माझ्याकडे बघून हसत होता. त्या बिचाऱ्याला आपल्या आईवडीलांवर काय वेळ आली आहे याची काय कल्पना .......

ते राजसिंहासन पुन्हा बोलु लागलं " मांसाहेब ... तुमच्या मतानुसार या दोघांबरोबर काय सलूक करावा..... मांसाहेब ?" महाराजांनी मांसाहेब बसत त्या सदरेकडे पाहिले.

नव्हतं काय ...

पण ....... पण ती राजसदर ...... राजसदर कसली......तो तर देव्हारा ... तो देव्हारा आता रिकामा होता. थोरल्या धन्यांनी नेहमीच्या सवयीने त्या राजसदरेला साद घातली असावी. त्या देवीचा कौल मागितला असावा. पण राज्यभिषेक झाल्यावर ते दैवी छत्र महाराजांना आणि आमच्या सारख्या लाखो रयतेला पोरकं करुन गेलं आपली चुक लक्षात आल्यावर महाराजांनी त्या राजसदरेला पुन्हा एकदा न्याहाळलं. काही क्षण न्याहाळून झाल्यावर त्यांनी आपले डोळे गच्च मिटून घेतले. तोंडातल्या तोंडात ते काहितरी पुटपूटत असावेत. डोळे उघडले तेव्हा त्या रेखीव डोळ्यांच्या कडांना हलकसं पाणी आल्याची जाणीव मला झाली.

संपूर्ण दरबाराचं वातावरण आणखी गंभीर झालं. डाव्या बाजूच्या सिंहासनावरून आम्हाला न्याहाळंत आमचे धाकले धनी उठले आणि महाराजांच्या कानाशी लागून काहीतरी अत्यंत दबक्या आवाजात बोलु लागले. काही वेळ दोन्ही धन्यांची मसलत चालली होती. ती मसलत करत असताना दोघेही अधूनमधून आमच्याकडे पहात होते. जीवनमरणाचा प्रसंग येऊन उभा ठाकला होता. प्रत्येक क्षण एखाद्या मृत्यु घंटे प्रमाणे मेंदू वर आघात करत होता. शेवटी एकदाचे दोघांची चर्चा संपली. धाकटे धनी पुन्हा आपल्या सिंहासनावर स्थानापन्न झाले.

" हिरकणी तु केलेल्या अपराधाची माहिती पेशव्यांनी दरबाराला वाचून दाखवली, त्याची पार्श्वभूमी आणि पुढील घटनाक्रम आम्हाला आमच्या बहिर्जीकडून इत्यंभूत कळला परंतु आमची इच्छा आहे कि तु तुझ्या तोंडाने आमच्या उपस्थितीत सर्व दरबाराला सगळी घटना ऐकवावी. तुमच्या दोघांचा फैसला त्यानंतर आम्ही करू" खड्या आवाजात महाराजांनी मला आज्ञा केली.

मी धन्यांकडे एक बार पाहिले. त्यांनी डोळ्यांच्या खुणेनेच मला धीर दिला. कान्होबाला त्यांच्याकडे

सोपवून मी तुळजाभवानीचे स्मरण मनोमन केले.

सगळे अवसान गोळा केले आणि बोलायला. सुरुवात केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...