फॉलोअर

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०१४

शंभू चरित्र भाग २७

शंभू चरित्र
भाग २७
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
.
शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते , त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा , तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि विचारले कि , ' इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार ?' तेव्हा शंभूराजे म्हणाले की , ' हत्ती तर आम्ही कसा ही घेऊन जाऊ , पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतो आहोत .' दिलेलखान तर सोडा पण हे असले फटके संभाजी महाराजांनी वेळोवेळी औरंजेबाला सुद्धा लगावलेले आहेत.

शंभू चरित्र भाग २६

शंभू चरित्र
भाग २६
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
वर्ष झालं, दीड वर्ष झालं, दोन वर्ष
झाली. औरंगजेबानं
शहाबुद्दीनला विचारलं, "तुम्हारा एक
दिनं कितनें बरसों का होता है?"...अरे!
एक दिवसात
किल्ला घेतो म्हणालेला दोन वर्ष
झाली,"आओ वापस!",
शहाबुद्दीनला माघारी बोलवलं
आणि पाठवला 'फ़तेह्खान'.
"फ़तेह्खान" तुम्हारे नाम में हि फ़ते हैं!
हमें फ़ते चाहिए!" वीस हजाराची फौज
घेऊन आला, त्या "रामसेज"
ला चिकटला,
गोचीडीसारखा चिकटला, झुंजत
राहिला, लढत राहिला. पण! मराठे
टक्करां देत राहिले. अरे! टाप
नाही मराठ्यांशी झुंजायचं, अजीबात
नाही. तसूभरं पुढं सरकू देईनात.
फ़तेह्खान वैतागला,
संतापला काही काही करता येईना.
अरे! सहाशे
मराठ्यांनी सळो कि पळो करून
सोडलं.
त्या फतेह्खानला काही कळेना,
शेवटी एक मांत्रिक त्याच्याकडं
आला, म्हणाला..."हुजूरं! मी भूतं वश
करायच्या कामात तरबेज आहे.
मला फक्तं एक सोन्याचा नाग तयारं
करून द्या, नाही तुम्हाला किल्ल्यावरं
घेऊन गेलो तर मग विचारा...!
फतेह्खानानं या मांत्रिकावरं विश्वास
ठेवला, त्याला सोन्याचा नाग तयारं
करून दिला. मांत्रिकानं नाग
छाती जवळ
धरला आणि म्हंटला..."मी पुढं
चालतो तुम्ही मागनं
या...बघा माझी जादू!" मांत्रिक पुढं
निघाला सैन्यं मागं.
फतेहखानला वाटलं आता मराठे
काही नाही करू शकत,
मांत्रिकाची जादू आहे. तो वेस
ओलांडून पुढं आला. मराठे नुसते
बघतायत...एक नाही-दोन नाही येऊ
द्या त्याला. निम्म्यापर्यंत
आला,निम्म्यापर्यंत
जसा आला तशी मांत्रिकाची छाती फुगली..."म्हंटल
ेलो कि नाय घेऊन जातो वरं,
आलो कि नाय
इतवर"...चला पुढं...पुढं-पुढं-पुढं
टप्प्यात आला तसा वरनं
गोफणीचा एक धोंडा असा "घुंग-घुंग-
घुंग" करत
आला त्या मांत्रिकाच्या छाताडावर,
डोळं पांढरं करून मांत्रिक तिथंच
पडला. नाग एकीकडं, मांत्रिक
तिसरीकड, फतेह्खान पळत मागं!
अरे! जिथं माणसं काही करू शकत
नाहीत तिथं भूतं काय करणारं?
मराठ्यांनी फतेह्खानच्या भूतांचाही निकाल
लावला.
क्रमशः

शंभू चरित्र भाग २५

शंभू चरित्र
भाग  २५
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
शहाबुद्दीनला काही कळेना,
"क्या किया जाय?" मग!
त्यांनी स्वतःच्या तोफखाना प्रमुखाला बोलावलं,
"क़ल तोफें लाना, डागों तोफें कीलें
पर...बस्सं!!! तोफों सें कितने पंल में
आएगा क़िला हाथ में?"
तोफखान्याचा प्रमुख
म्हणाला..."हुजूरं! दोन तासांत
किल्ला तुमच्या पायावरं ठेवतो".
आणि बघता बघता त्यानी तोफा लावल्या,
रात्रं
झाली आता सकाळी युद्धाला सुरवात
होईल. सगळे मोघल निवांत झोपले,
उद्या सकाळी उठायचं
आणि तोफखाना लावायचा, बस्सं!!!
तोफा चालू
झाल्या कि किल्ला ताब्यात. पण!
त्याचं रात्री सगळे निद्रादेत
असताना दीड-दोनच्या सुमारास
"मराठे" काही किल्ल्यावरून
खाली आले. सरळ
शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले.
सरळ-सरळ कापाकापी केली.
सगळा हल्ल-कल्लोळ माजवला.
मोघल जागे व्हायच्या आत "मराठे"
परत गायब!
"छापा-छापा, मराठों का छापा"...निंद
उडाली मोघलांची. शहाबुद्दीन
चार्र्फडत राहिला. सकाळ झाली,
तोफखाना प्रमुखाला तोफा लावायला सांगितलं,
तोफा लागल्या, दारू
ठासली आता फक्तं पेटवायचं वातांन,
अन तोफखाना प्रमुख पुढं गेला,
तोफेला बत्ती लावणारं त्याचं
वेळी वरनं "धाडं-धाडं" करत
तोफेचा गोळा आला, शेजारीच "धाड्म-
धूम" तसा तोफखान्याचा प्रमुख
म्हणाला..."पीछे लो-तोफें पीछे लो"
मोघलांचा तोफमारा सुरु
व्हायच्या आधी मराठ्यांचा तोफमारा.
त्या तोफखाना प्रमुखानं
सगळ्या तोफा मागं
घ्यायला लावल्या आणि पाठून गोळे
सोडायला लागला, पण! तोफा मागे
घेतल्यानं गोळे काय किल्ल्यावरं
जाईनात. आता मागे आलो म्हणून
गोळे जाईनात म्हणून पुढं यावं तर पुढं
आलो कि मराठ्यांचे गोळे अंगावरं
बरसतायत...करायचं काय?
शहाबुद्दीन खानानं विचारलं..."क्या
हुआ?"......"काय होत नाही हुजूरं!,
तोफा पुढं नेल्या कि त्यांचे गोळे
अंगावर, तोफा मागं नेल्या तर आपले
गोळे पोहोचेनात"......अरे! तुम्ही तर
म्हणाले ना मराठ्यांकडे
तोफा नाहीत!..."हुजूरं!, मराठ्यांकडे
तोफा नाहीत पण! डोकं तर
आहे"......म्हणजे?......"हुजूरं!
मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयारं
केल्यात,त्याला जनावराचं कातडं
लावंलय आतनं"......"ठीक हैं,तोफ एक
हि हैं!"......"साधी नाही तोफ हुजूरं!,
आपल्या दहा तोफांना एक तोफ
भारी आहे त्यांची"......"अरे! ठीक हैं,
तोफा तयार केल्या पण! गोळे?,
तोफगोळे कुठणं आणले त्यांनी?"..."हु
जूरं!, मग "मराठे"
रात्री कशाला आलते? हे गोळे
आपलेच आहेत"
शहाबुद्दीन खानाला काही कळेना,
काय?...काय?...काय?...करायचं!
क्रमशः

शंभू चरित्र भाग २४

शंभू चरित्र
भाग २४
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
..
संभाजी राजांना शिखस्त
करण्यासाठी काय करावं? याच
संतापानं औरंगजेब विचारं करू लागला.
आणि कुणीतरी औरंगजेबाला सल्ला दिला,
"हुजूरं! मराठों की जान है, उनके
गड्किलोंमें...पहलें गड्किलें ले लेतें है!
मराठें खुदबखुद आयेंगे घुटने टेंकते
हमारें सामने!......बहुत खूब!!! ये बात
सच है!
आणि त्यानी विचारलं..."ऐसा कौनसा क़िला है?
जो जल्द से जल्द
लिया जा सकतां है!"
तरसला होता विजयासाठी औरंगजेब,
तरसला होता. आणि मग! एकानं
सांगीतलं, "हुजूरं! एक क़िला है!
नाशिक जिल्ह्यातला". "दिंडोरी"
पासून अवघ्या दहा मैलावरं
असणारा "प्रभु श्री राम" तिथं
विश्रांतीसाठी जायचे. त्यांची सेज
तिथं आहे. म्हणून त्या किल्ल्याचं
नावं पडलं "रामसेज"..."हुजूरं!
छोटासा क़िला आहे.
आणि मराठे?...अवघे सहाशे हुजूरं! ,
तोफखाना?...कुछ नहीं हुजूरं! ,
बज्मीयत?...कुछ नहीं हुजूरं!..."कौन
जाएगा?"
आणि उभा राहिला शाहबुद्दीन खान,
"हुजूरं हम जायेंगे!!!"...कितने दिनों में
ले लोगें क़िला? कितने दिनं?..."हुजूरं
एक दिनं काफ़ी है! आज गया क़ल
क़िला लेकें आया!". औरंगजेब खुश
झाला, "बहुत
खूब!!!"...दहा हजाराची फौज दिली.
"ज़ाव ज़ाव हमें 'रामसेज' चाहिए!"
आणि विजयाची खबर
ऐकायला औरंगजेब आतुरला,
निघाला शाहबुद्दीन खान.
वेढा टाकला "रामसेज"ला. अरे!
अफाट सेनासागर मराठ्यांचे अवघे
सहाशे मावळे वरनं बघतायत. प्रचंड
सैन्यं, तोफा, बारूद,
बज्मीयत...अफाट!!!
आणि बघता बघता शाहबुद्दीननं
वेढा लावला, मोर्चे लावले
आणि आदेश दिला. "यल्गारं...!!!" अनं
निघाली मोघली फौज "रामसेज"वरं
वेस ओलांडून पुढं-पुढं पारं
निम्म्यापर्यंत पोहोचली.
आमच्या मराठ्यांची हालचालं
ना प्रतिकारं. शाहबुद्दीन
खानाला वाटलं, बहुतेक न लढताच
किल्ला देतायत वाटतं. मोठा उत्साह
आला..."चलो आगे!...चलो आगे! ले
लो क़िला. सैन्यं पुढं-पुढं-पुढं, सैन्यं
निम्म्याच्या पुढं आलं तसे आमचे
मराठे सावध झाले.
किल्लेदारांची इशारत घुमली, मराठे
उभे राहिले.
हातातल्या गोफण्या थरारल्या, दगडं
भरली...सुटली दगडं. "दणा-दणा-
दणा-दणा,,थाड-थाड-थाड!!!" दगडं
आदळू लागली. पत्थरांची बौछारं
नुसती. त्या दगडांच्या मारांनी घायाळ
झालं शहाबुद्दीनचं सैन्यं.
पाठीला पाय लाऊन पळत सुटलं.
त्या शाहबुद्दीनच्या मस्तकावर दगडं
बसलेला ती जखम दाबीत शाहबुद्दिन
म्हणाला..." कैसे है ये मराठें,
पत्थरोंसे खेलतें है! " एका दिवसात
किल्ला घेतो म्हणालेला तो शाहबुद्दीन
खान रात्री खलबत खाण्यात
जखमा शेकत बसला होता.
"क्या किया जाय अब?" त्यात एक
सरदार होता मोठा त्याने
युक्ति काढली, "हुजूरं ऐसा करतें
हैं...बोलो!...नहीं काल आपण चालत
चालत गेलो दगडं डोक्यावरं बसली,
उद्या चालत चालत
नको जायला...मग!...सर्र्पटत,
सर्र्पटत जाऊ म्हणजे दगडं
आली तरी वरनं जातील
आपल्याला लागणारं नाही.
मोठी नामी कल्पना,
फतेखानला पटलं..."ऐसा हि करेंगे!".
दुसऱ्या दिवशी चढाई सुरु झाली.
उरलं-सुरलं सैन्यं निघालं, निघालं-
निघालं सरपंटत, सर्र-सर्र-सर्र
करत पुढं, पुढं-पुढं-पुढं वेस ओलांडून
पुढं पार निम्म्यापर्यंत. कुणी डोकं
वरं करायला तयार नाही, चुकून डोकं
वरं करायचो, डोक्यात दगड
बसायचा, डोक्याला ताप नको बघ
खाली आणि चाल पुढं, सर्र-सर्र
करत निघालाय सैन्यं. आता जवळ-
जवळ किल्ल्यावरं पोहोचणारचं.
शहाबुद्दीन आनंदला "ले
लिया किला...चलो आगे!" आणि हे
सर्र्पटनारं सैन्यं टप्प्यात आलं तसे
मराठे सावध झाले. रात्रंभर जागून
तटबंदीवर मोठ-
मोठ्या दगडी शीळा गोळा करून
ठेवलेल्या. हे सैन्यं जवळ आलं
तशा दगडी शीळा दिल्या नुसत्या ढकलून,
गडगडा करत शीळा सुटल्या खाली.
सर्र्पटणाऱ्या प्राण्यांना कायमचं
सर्र्पटणारं करून मग! तळा जाऊन
थांबल्या.
क्रमशः

शंभू चरित्र भाग २३

शंभू चरित्र
भाग २३

२३


२३
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
संभाजी राजांजवळ मैत्रीचं फर्मान
घेऊन
आलेल्या अकबरला संभाजींनी हाताशी धरलं
आणि आपल्या राजकारणाच्या पटावरच्या चाली खेळायला सुरवात
केली. पण! लागोपाठ तीन तडाखे
बसलेला औरंगजेब चवताळून उठला.
आग्यामोहळं उठावं असा औरंगजेब
पिसाळला आणि उचलली पाऊलं
त्यांनी "खासे दख्खन" वरं
औरंगजेबाचे "साम्राज्यं" म्हणजे
आशिया खंडातलं सगळ्यात मोठं
"साम्राज्यं". आणि संभाजींच
"स्वराज्य" म्हणजे आशिया खंडातलं
सगळ्यात छोटं "साम्राज्यं". मनंभर
सैन्यं कणभर
मराठ्यांना चिरडायला निघालं.
औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या साडे
चौदा हजार होती, कईक नातंलग,
शहजादे, अफाट-अफाट सेनापती, चार
लाखांचं सैन्यं, चौदा कोटींचा खजिना,
चाळीस हजार घोडी, सत्तर हजार
घोडी, पस्तीस हजार उंट. अरे!
औरंगजेबाची छावणी पडली तरं तीन
मैलांचा परिसर व्यापून जायचा. एवढं
अफाट सैन्यं आलं चालून
महाराष्ट्रावरं
आणि सह्याद्रीच्या कड्यांवरनं
कडाडला छावा!..."येऊद्य
ा त्या औरंगजेबाला, अखेरं!
त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तरं...!!!"
आता बघेल
या छाव्याचा "गनिमी कावा".
आणि बघता बघता संभाजी सज्ज
झाला. वय वर्ष अवघं तेवीस.
महाराष्ट्राचं आभाळ काळवंडून गेलं.
औरंगजेबानं एकापाठोपाठ
मोहिमी लगडल्या.
सरबुलंद खान, आलेखान, फ़तेह्खान,
शहजादा अज्जम, बेदारबख्त
मुअज्जम, शहाबुद्दीन खान, बहादूर
खान, एक-एक नामचीन
सेनापती अफाट ताकदीने
महाराष्ट्राला कैचीत
पकडायला चाहोबाजूंनी आत घुसवले
आणि मराठे सज्ज झाले.
संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोघलांची लंगडेतोड
चालू केली. मराठे सुसाट सुटले. जिथं
भेटेल तिथं मोघलांना कपात राहिले.
अरे! सरबुलंदखान मारं खाऊन
परतला, फ़तेह्खान तोंड काळं करून
गेला, तो बहादूर खान नुसता पळून
पळून दमला, शहाबुद्दीन खानला तरं
काही सुचेना. औरंगजेब
चहोबाजूंनी नुसत्या शिखस्तीच्या बातम्या ऐकत
राहिला. हार-पराभव, हार-पराभव.
अरे! तेवीस वर्षाचा 'छावा'
संभाजी मोघलांना पार
सळो कि पळो करून सोडलं. तू
महाराष्ट्रात येतो ना!
संभाजी राजांनी विलक्षण
युद्धनीती खेळली,
मराठ्यांच्या फौजा सरळ
मोघलांच्या प्रांतात घुसवल्या. इतकं
इतकं फाडलं
कि औरंगजेबाला काही कळेना, मराठे
तिथं आले म्हणून सैन्यं पाठवावं तरं
मराठे पुढं, मराठे तिथं गेले म्हणून
सैन्यं पाठवावं मराठे त्याच्या पुढं,
अरे! कुठं कुठं शिवावं? सगळीकडंच
फाटत निघालंय. इथं शिवावं तरं तिथं
मराठे फाडतायत, तिथं शिवावं तरं
मराठे तिकडं फाडत निघालेत. कुठं
कुठं? ठीगळं लावावी. वैतागून, संतापून
गेला औरंगजेब. आपल्या सरदारांवर
बरसत राहिला..."क्या करतें
हो बंदोबस्त? खिल्लतें पेहेनके
ख़ाली मारं खातें हो! इतनी फ़ौज
दी दिमत ने कहाँ गयी ?
कहाँ गया वों दख्खन का चुहाँ ?
तसा कुणी सरदार म्हणाला, "हुजुर
वों संभा सैतान है!......अरे! फ़िर हम
कहां सैतान से कम है!...फ़िर
भी क्यों शिखस्त? फ़िर
भी क्यों हार?" औरंगजेबानं
मोठ्या थाटात मराठ्यांविरुद्ध
ची मोहीम उघडली पण!
संभाजी राजांनी त्याची पुरती वाट-
वाट-वाट लावली.
कडाडला संभाजी राजा,""आमच्याच
वाटेवर येऊन...आमच्याशीच
वाटमारी करणाऱ्याची...त्
याच्या वाटेवर जाऊन...वाट
लावल्याशिवाय...आमच्या वाटेवर
परतत नाही आम्ही""..."तलवा
रीच्या टोकावर भाकरी भाजतात
मराठे तुला भाजायला वेळं
नाही लागणारं!!!"
आणि बघता बघता मराठे भाजत-
भाजत सुटले. त्या धगीनं औरंगजेब
हैराण झाला.
क्रमशः

शंभू चरित्र भाग २२

शंभू चरित्र
भाग २२
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
३ एप्रिल १६८० शिवरायांच निधन
झालं. त्यावेळी संभाजी महाराज
नुकतेच पन्हाळ्याला आलेत. ते
रायगडावर न्हवते याच कारण! ते
बुऱ्हाणपुराच्या स्वारीत अडकले
होते. राजारामाचं लग्नं ते स्वारीत
असतानाच झालं. म्हणून ते
लग्नाला येऊ शकले नाहीत. ते कैदेत
वगैरे अजिबात न्हवते.
हि वस्तुस्थिती आहे.
आणि शिवरायांच निधन झाल्यावरं
शिवरायांच्या निधनाची वार्ता लोकांना कळाली तरं
रायतेतं गोंधळ माजेल आणि शत्रू
आक्रमणं करायची भीती आहे. म्हणून
शिवरायांच्या निधनाची वार्तासुद्धा गोपनीय
ठेवण्यात आली. पण!
त्याचवेळी मंत्री रायगडावर
जमा झाले. मंत्र्यांचा नवीनच डाव सुरु
झाला. कसंही झालं संभाजीराजे
गादीवर येत उपयोगाचे नाहीत. कारण!
संभाजीराजे "धर्मपंडित",
"संभाजी संस्कृत चे ज्ञानी",
"संभाजी निर्णय क्षमता असणारे",
"संभाजी प्रचंड बुद्धिमान",
"संभाजी प्रचंड शौर्यशाली".
संभाजी जरं गादीवर आले तरं अत्ताच
ते आपला मुलायजा ठेवत नाहीत,
पुन्हा तरं आपल्यालाच ठेवणार
नाहीत. त्यामुळे
कसल्याही परीस्थितीत
संभाजी गादीवर येत कामाच नयेत.
त्यापेक्षा राजारामाला गादीवर
बसवूया. राजाराम अल्पवयी आहे,
त्याला कारभारं जमणार नाही म्हणजे
कारभारं आपल्याच हातात येणारं.
स्वार्थी मंत्र्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कसल्याही परिस्थितीत
संभाजीला गादीवर येऊ न
देण्याचा चंग बांधला.
त्यासाठी सोयराबाइंना सरळ सरळ
हाताशी धरलं आणि तिकडं
कराडला "हंबीरराव मोहिते" जे
सोयराबाइंचे सख्खे बंधू, मराठेशाहीचे
सरंसेनापती, सरलष्करं,
त्यांना निरोप पाठवला, पन्हाळ्यावर
संभाजीला कैद करण्यास जायचयं.
आपण ससैन्यं तयार रहा.
त्यांची भूमिका अशी कि कुणाला वाटणारं
नाही, आपला भाचा गादीवर येऊ नये.
आता राजारामाला गादीवर बसवतोय
म्हंटल्यावर मामा "हंबीरराव" तरं
लगेच तयार होतील
आणि झालंही तसंच
हंबीररावांनी लगेच कळवलं
"मी तयारच आहे, तुम्ही या मिळूनच
संभाजीला कैद करायला जाऊ".
मंत्री आनंदले, निघाले, आले.
तळबीडला आले हंबीररावांच्या पुढं.
चला आता सैन्यं घ्या संभाजीला कैद
करायचयं. आणि त्याच
क्षणी हंबीररावांनी डाव बदलला,
बुंबरान त्याचं त्यांच्यावर उलटवलं.
आल्या मंत्र्यांना सरळ
काढण्या चढविल्या. सगळे कैद केले
आणि पन्हाळ्यावर नेऊन
संभाजींच्या पायावर घातले
आणि कडाडले
सरलष्करं..."ही घ्या नादान हरामजाद
माणसं"..."राजं! जाऊन अजून
अकरा दिवस नाही झाले
आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद
करायला आलेत....घ्या ताब्यात!!!"
आणि मंत्री फ़िल्तोरं गिरफ्तार झाले.
संभाजी राजांनी त्यांना कैदेत ठेवलं.
एक महिना पन्हाळ्यावरचं कारभारं
चालवला आणि मग!
संभाजी रायगडावर आले.
पण! या काळात
संभाजींनी हंबीररावांना विचारलं..."मामा
साहेब, आपण राजारामांचे
मामा असून,
आमच्या मातोश्री सोयराबाई
साहेबांचे सख्खे बंधू असून आपण
त्यांच्यापाठीशी उभं
राहण्यापेक्षा आमच्या पाठीशी कसं
काय उभं राहिलात?"
त्यावेळी हंबीररावांनी सांगितलं,
"या मंत्र्यांचा डाव लक्षात येताच
आणि मंत्री माझ्याकडे येताच
सोयराबाइंनी मला कळवलं कि,
कैसेही करून
संभाजी राजांना वाचविणे.
सोयराबाइंनी निरोप दिल्यामूळच
मी आपल्याला वाचवू शकलो".
दुर्दैवानं
सोयराबाइंची भूमिका मराठ्यांच्या इतिहासात
"कैकैयी" सारखी करून टाकल्यामुळं
त्याही व्यक्तित्वावर अन्याय
झालायं ही सगळ्यात
मोठी वस्तुस्थिती आहे.
त्यांना भिंतीत छिलून-बिलून मारले,
असल्या काही गोष्टी कल्पोकल्पित
रंगवल्यात. अजीबात नाही,
सोयराबाइंना कुणीही भिंतीत छिलून
मारलं नाही उलट या घटनेनंतर दीड
वर्ष पुढं सोयराबाई जिवंत आहेत,
ही वस्तुस्थिती आहे. रायगडावर
संभाजीराजे आले. शिवरायांचे
अंत्यविधी सुद्धा नीट झाले न्हवते.
संभाजी राजांनी पहिल्यांदा ते करवून
घेतले. रायगडावर
शिवरायांची समाधी उभारली आणि तब्बल
स्वराज्याची घडी नीट बसवून तब्बल
नऊ
महिन्यांनी स्वतःला राज्याभिषेक
करून घेतला. "संभाजी राजे"
स्वराज्याचे दुसरे "छत्रपती" झाले.
क्रमशः

शंभू चरित्र भाग २१

शंभू चरित्र
भाग २१ (प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )

शृंगारपूरचे सुभेदार

छत्रपती दक्षिण मोहिमेला गेल्यानंतर अष्टप्रधानांची कारस्थाने सुरू झाली.इकडे शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजीराजेंतील कवी,लेखक जागा झाला. बुधभूषणम् हा संस्कृत तर नायिकाभेद,नखशिख आणि सातसतक हे ब्रजभाषेतील तीन ग्रंथ त्यांनी याच कालावधीत लिहिले.यावेळी त्यांना कवी कलश यांची चांगली साथ लाभली.शृंगारपूर परिसरात दुष्काळ पडल्यामुळे,रयतेकडून एक वर्ष करवसुली न करण्याचा संभाजीराजेंनी निर्णय घेतला.पण अष्टप्रधानानीं संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास नकार दिला.संभाजीराजे राज्य चालविण्यासाठी अयोग्य आहेत,असा प्रचार अष्टप्रधान मंडळीनी आरंभिला.तशी पत्रे त्यांनी कर्नाटकात मोहिमेवर असलेल्या छत्रपतींना पाठविली.

आपल्या निर्णयाला स्वराज्यात किंमत नाही,असे समजल्यामुळे संभाजीराजे निराश झाले.अशातच दिलेरखानाने संभाजीराजेंना पत्र पाठवून आपल्याकडे येण्याचा निरोप दिला.मुघलांना मिळून त्यांची गुपीते मिळवावी असा विचार करून त्यांनी मुघलांना सामील व्हायचा निर्णय घेतला.सभासदाच्या बखरीमध्ये याचे पुढीलप्रमाणे वर्णन आहे.'इतकियात संभाजीराजे राजियाचे पुत्र ज्येष्ठ राजियावर रूसून मोघलाईत गेले .'
दिलेरखानाने संभाजीराजेंना ढाल करून भूपाळगडावर हल्ला केला.शत्रूपक्षात संभाजीराजे असल्यामुळे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा तसेच इतर मावळ्यांनी शरणागती पत्करली.संभाजीराजेंनी सर्व सैनिकांना सुखरूप जाऊ मागणी दिलेर खानाकडे केली.पण दिलेर खानाने सर्वच सैनिकांचा एक हात कलम करण्याचा आदेश दिला,तसेच त्याने आदिलशाहच्या ताब्यातील अथणीवर हल्ला करून तेथील जनतेचा अनन्वित छळ केला.मोघलांना सामील होऊन आपण चूक केल्याचे संभाजीराजेंना कळल्यामुळे मोघलांच्या तावडीतून निसटून ते विजापूर मार्गे पन्हाळा किल्ल्यावर येऊन दाखल झाले.

शंभू चरित्र भाग २०

शंभू चरित्र
भाग २०



(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
एके दिवशी "संभाजी राजांनी"
सरलष्करांना विचारले, "मामासाहेब
स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो,
पण! औरंगजेबाचाही थाट
उतरला पाहिजे.
जागा शोधा मौक्याची".
आणि हंबीररावांनी जागा काढली अगदी मौक्याची..."राज ं!
एक जागा हाय "बुऱ्हाणपुरा दारंउक्
मुल्खदख्खन". "बुऱ्हाणपुरा" म्हणजे
औरंगजेबाची दख्खनेतील राजधानी.
एखाद्या सुंदरीच्या गालावरं तीळं
शोभावा असा "बुऱ्हाणपुरा" शोभतो.
ऐश्वर्य, संपत्ती, सामर्थ्य...अफाट!
अन त्याच
वेळी कडाडला छावा!..."मग,
टाका छापा त्या बुऱ्हाणपुरावर,
करा कोळसा पुरा त्याचा". अरे! सुटले
मराठे, बुऱ्हाणपुराचे सतराचे सतरा पुरे
धुतले. काही काही ठेवलं नाही. अरे!
बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाचं
"हळवं काळीज पानं". परं चेंदा-
मेंदा करून टाकला मराठ्यांनी.
पहिला तडाखा सोसतो न सोसतो तोच
संभाजी राजांनी दुसरा तडाखा दिला "औरंगाबाद".
औरंगजेबाच्या नावानी बसवलेले
"औरंगाबाद".
संभाजी राजांनी त्यालाच हात घातला.
इतकं लुटलं, इतकं धुतलं
कि औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं
काही ठेवलंच नाही. एखाद्या बागेचं
सौंदर्य डोळ्यात साठवावं म्हणून
डोळे मिटावे आणि पुन्हा उघडून बघावं
तरं पुढं स्मशानं दिसावं
अशी अवस्था "औरंगाबाद"ची केली होती.
औरंगजेब चरफडला, तरफडला भयाण
वैतागला पण!
त्याचवेळी त्याला तिसरा तडाखा बसला.
दस्तूरं खुद्द
औरंगजेबाचा मुलगा त्याचा शहजादा "अकबरं"
औरंगजेबाच्या विरोधात उठला.
आणि सरळ आला महाराष्ट्रात
कारण! त्याला माहितीये, या पुऱ्या-
पुऱ्या हिंदोस्थानात औरंगजेबाशी झुंज
घेईल असा एकचं ""मर्द सर्जा""
आहे......""संभाजी""
तो आला सरळ संभाजी राजांकडचं.
औरंगजेबाला दुसरं कोणी नमवू
नाही शकत...औरंगजेबाला दुसरं
कुणी झुकवू
नाही शकत...औरंगजेबाल ा दुसरं
कुणी मातीत गाडू नाही शकत......एकचं
""संभाजी"" क्रमश

शंभू चरित्र भाग १९

शंभू चरित्र
भाग १९
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
इंग्रजासोबत करार:-तो दिवस होता 26 एप्रिल 1684.संभाजी राजे ज्यावेळी बीरवाडीच्या किल्ल्यामध्ये मुक्कामी होते व इंग्रजांबरोबर करार करण्यासाठी ते तेथे पोहचले होते.
यापूर्वी संभाजी राजांनी इंग्रजांची चांगलीच नाकाबंदी केली होती व त्यामुळेच ते तहाला व मैत्रीपुर्ण करारासाठी उत्सुक होते.
अनेक दिवसांपासून यासाठी ते संभाजी राजांच्या होकाराची वाट पहात होते.
तहानुसार इंग्रजांना मराठ्यांच्या मालकीची किनारपट्टी असलेल्या जिंजी व मद्रास प्रांतात वखार बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली.
परंतु त्याचवेळी संभाजी राजांनी धुर्त इंग्रजांची भावी डावपेचाची रणनिती पाहुन त्याचवेळी इंग्रजांना निक्षुन बजावले होते.
"आपण येथे फक्त व्यापार आणि व्यापारच करायचा व्यापाराच्या नावाखाली स्थानिक राजकारणात नाक खुपसायचे नाही व वखारीच्या नावाखाली किल्ले बांधायचे नाहीत".
अगदी वखारीची लांबी रुंदी आणि उंचीही संभाजी राजांनी निर्धारित करुन दिली.
व त्याप्रमाणे वखार बांधावी असे सुचविले.
जेणेकरुन वखारीच्या नावावर इंग्रजांना भुईकोट किल्ला बांधण्यास वाव मिळणार नाही याची दक्षता घेतली गेली.
शिवाय आयात निर्यातीवर जकात आकारली आणि त्याचवेळी इंग्रजांना कोणतीही सुट न देण्याची कठोर भूमिका त्यांनी इंग्रजांबाबत राबवीली.
त्याचवेळी वखारीत काम करणार त्यांची नावे व पत्ते जवळच्या सुभेदाराकडे किंवा अंमलदाराकडे देणे बंधनकारक केले.
वखारीत लोक कामाला ठेवताना ते स्थानिक असावेत व त्यासाठीपरवाना घेण्याची सक्त ताकीदही संभाजी राजांनी इंग्रजांना दिली होती.
गुलामाची पोरे विकण्यावर व खरेदी करण्यावर बंदी घातली.
इंग्रज या गोष्टीसाठी जवळपास अगोदर असणार्या जकातीच्या सहा ते आठपट जकात देण्यासतयार झाले होते.
तरीही जकात मिळणार म्हणुन माणुसकी आणि माणसे विकायला संभाजी राजे थोडेचतयार होणार होते.
इतरांची साम्राज्य पैशाच्या बदल्यात माणसे विकत घेऊन वाढली असतील.
परंतु स्वराज्याच्या निर्मितीत माणसाला माणुस म्हणुन वागणुक मिळावी हाच उदात्त हेतु होता व संभाजी राजे तो पुर्ण पाळत होते.
म्हणूनच त्यांनी गुलामगिरीच्या वेठबिगारीच्या पध्दतीला परवानगी दिली नाही.
उलट "एवढीच गुलामांची गरज असेल तर स्वत:च्या देशातुन गुलाम म्हणुन माणसे आणा म्हणजे माणुसकीची किंमत कळेल.
"असा इशाराही इंग्रजांना दिला.
व्यापार उद्दीमाच्या नावाखाली माणसे खरेदी करण्याचा उद्योग आणि वेठबिगारीची पध्दत मोडीतच काढली.
एकुणच काय तर बालकामगार विरोधी कायदा करणारे छत्रपती संभाजी राजे हे आधुनिक काळातील पहीले राजे ठरले.
परंतु आपणालाहे कोणी सांगितले नव्हते, तर ते आपण पुढच्या पीढीला कशातुन सांगणार?
शेवटी आपल्यालाच आपल्या इतिहासाची कदर नसेल तर कपाळ फोडून काय करणार?
इंग्रजाबरोबरीचे तहाचे शेवटचे कलम होते.
"स्वराज्याच्या हद्दीतील कोणाही मनुष्यमात्रास गुलाम म्हणुन किंवा धर्माँतर करुन ख्रिस्त करण्यासाठी इंग्रजांना विकत घेण्यावर निर्बंध".
धर्मांतर होऊ नये यासाठी आमिषाच्या बळावर किंवा मारुन मुटकून धर्मांतर होऊ नये या साठी धर्माँतर बंदीचा कायदा करणारा राजा म्हणूनही छत्रपती संभाजी राजांना हिंदुस्तान ने लक्षात ठेवायला हवे होते.
परंतु आपला देश ठरला लोकशाहीवादी अर्थातलोकशाही म्हणजे पुढर्यांना वेगवेगळे सोंगे मिरवण्याची मुक्त परवानगीच त्यामुळेच सांप्रद काळात सगळा बट्ट्याबोळ होऊन बसतो.
परंतु संभाजी राजांनी अगदी दुरदर्शीपणे 350वर्षापुर्वी अशाप्रकारे गुलामगिरी विरोधात वेठबिगारी विरोधात बालकामगार विरोधात व धर्मांतराबाबतीतकायदे करुन एक आदर्श राजा असल्याचे सिध्द केले.
परंतु बखरकारांनी संभाजी राजांची ही रुपे आणि सामाजिक सुधारणा कधीच लोकांसमोल येणार नाहीत याची दक्षता घेतल्यानेच हा इतिहास लपुन राहीला हे ही तेवढेच खरे....!
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुविरराजे....!

शंभू चरित्र भाग १८

शंभू चरित्र
भाग १८ (प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )

छत्रपती शिवरायांची व संभाजीराजेंची ऐतिहासिक भेट
छत्रपती शिवरायांना कर्नाटकाच्या मोहिमेवर असताना संभाजीराजे स्वराज्यात परत आल्याची वार्ता समजल्यानंतर ते त्वरेने संभाजीराजेंना भेटावयास पन्हाळा किल्ल्यावर आले.तो ऐतिहासिक दिवस होता १३ जानेवारी १६८०.संभाजीराजेंची पन्हाळा किल्ल्याचा सरसुभेदार म्हणून नेमणूक करून ते रायगडाला परतले.
रायगडावर आल्यानंतर छत्रपतींनी ७ मार्च,१६८० रोजी राजारामची मुंज केली.तर १५ मार्च १६८० रोजी,प्रतापराव गुजरांची कन्या जानकीबाई हिच्याशी राजाराम याचा विवाह केला.
मनात अढी असल्यामुळे सोयराबाईंने संभाजी राजेंना विवाहासाठी बोलाविले नाही. राजारामच्या विवाहानंतर काही दिवसातच,३ एप्रिल १६८० या रोजी महाराजांचे निधन झाले.महाराजांच्या निधनाची बातमी संभाजीराजेंना न कळवता,लहान असलेल्या राजारामला राज्याधिकारी करण्याचे अष्टप्रधान मंडळी व राणी सोयराबाईंनी ठरविले.महाराजांच्या मृत्युनंतर अठरा दिवसांनी,२१ एप्रिल रोजी राजाराम महाराजांचे रायगडावर त्यांनी मंचकारोहन केले.

शंभू चरित्रं भाग 17

शंभू चरित्रं
भाग 17
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
शंभुराजे कृत नायिकाभेद मधील निवडक श्लोक
सवैया

राधिका कान्ह विरंची रची सब ।लोकनकी सुखमा सबे सैलै ॥
अंगके रंगन के ढिग जात व्हैं ।जात है शंभु सबे रंग मैलै ॥
लालनसों परवालनसों बॅंधी ।लालन जानि पेरे बहि गैलै ॥
पाय धरे जितही वह बाल ।तही रंग लाल गुलालसों फैलैं॥
अर्थ:राधाआणि कन्हैयाची जोडी विश्वनिर्मात्याने पृथ्वीवरील सर्व पहाडातील सौंदर्यएकत्र आणून तयार केली आहे.त्यांच्या शरीरावर सर्वात सुंदर अशा रंगाच्या छटाआलेल्या आहेत.शंभुराजे म्हणतात,'विधात्याने त्यावेळी सगळे रंग जवळ ठेवूनया जोडीची निर्मिती केली आहे,त्यामुळे त्या सगळ्या रंगाचा मिलापत्यांच्यात झालेला दिसतो.या जोडीला प्रवाळाने बांधले असावे.जिथे जिथे हीजोडी पाय ठेवते तेथे लाल गुलाबी रंगाची उधळण होत आहे'.
SAAMBHAR : www.marathidesha.com

शंभू चरित्रं भाग 16

शंभू चरित्रं
भाग 16
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
शंभुराजे कृत बुधभूषण मधील निवडक श्लोक
राजाची सामान्य कर्तव्ये
व्यसनानि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् ।
सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ॥
अर्थ:राजाने सात दोष टाळले पाहिजेत,हे दोष पुढीलप्रमाणे आहेत
वाग्दण्ड-राजाने कठोर बोलणे टाळावे
पारूष्य- इतरांचा अपमान करणे टाळावे
दुरयातंच-संरक्षणाशिवाय राजाने दुर जाऊ नये
पान-मद्यपानापासून दूर असावे
स्त्री-राजांस स्त्रीचे व्यसन नसावे
मृगया-गरीब प्राण्याची शिकार करू नये
द्युत-जुगारापासून राजाने दुर राहावे
काले मृदुर्यो भवति काले भवति दारूण: ।
राजा लोकद्वयापेक्षी तस्य लोकद्वंय भवेत ॥
अर्थ:राजामध्ये मवाळ व कठोर अशा दोन्ही वृती असाव्यात.वेळ आल्यावर राजाने कधी कठोर तर कधी मवाळ बनावे
भृत्यै:सह महीपाल: परिहासं च वर्जयेत् ।
भृत्या:परिभवन्तीह नृपे हर्षवशंगतम् ॥
अर्थ:राजाने नोकराबरोबर थट्टा मस्करी करू नये.नोकरांच्या वेढ्यातील राजा हर्षवश होऊन नंतर तिरस्कृत होतो.
SAAMBHAR : www.marathidesha.com

शंभू चरित्रं भाग 15

शंभू चरित्रं
भाग 15
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
शंभुराजे कृत सातसतक मधील निवडक श्लोक
सीता पग नष चंद की भजि कै संभ समाज ।
सातशतक ग्रंथहि रच्यो,संतन के हित काज ॥
अर्थ:सीतेच्याचरणाच्या नखचंद्रास आराधून शंभु राजांनी समाजाच्या व साधूसंताच्याहितासाठी सातशतक ग्रंथाची निर्मितीकेली आहे.शंभुराजे म्हणतात की माझे मनसंताच्या हितासाठी भमर झाले आहे.
मो मन मधुकर संत हित भऱ्यो ग्रंथ रसविंद ।
चित्रकूट के सिर्लान जे फूल पग अरविंद ॥
अर्थ:यातचित्रकुटमधील प्रभु राम,सीता आणि लक्ष्मण यांच्या पवित्र चरणाच्याप्रभावाने जे पारिश्रमिक फूल तेथील दगडावर फुलले तोच प्रेम रस होय.
सो रस पाइ छके महा सनकादिक सुक सेस ।
संभराज षगराज ,मुनि ,गिरजा ,गिरा गणेश ॥
अर्थ:तोरस प्राशन करून शुक्राचार्य,शेषदेव,सनकादिक मुनि तसेच खगराजगरूड,गिरीवरकन्या पार्वतीदेवी, सरस्वती, गणेश तसेच शंभुराजे संतुष्ट झाले.
उपालंभ कहि विनै कहि ,जगत सीष कहि ध्यान ।
बह्म निरूपम कुछ कहरो,जाते बाढत ग्यान ॥
अर्थ:उपहासात्मकबोलण्यापेक्षा जगाच्या शिकवणुकीकडे माझे लक्ष आहे.काही ब्रह्मनिरूपणात्मकसांगण्याची माझी इच्छा आहे.त्यामुळे ज्ञानवृध्दिही वाढते.
छत्र,गज,चमर,तुरंग अगनित संग ।
एते पर मन ना गरूर गहियतु है ॥
असन विहूँने अंग वे वसन सूँने राषो ।
लोक निंदा भाषो सुष मानि सहियतु है ॥
दूषण तुम्है जे देत मुगुध अचेत प्रभु ।
करिहौ उहे पे जाको जैसो चहिअतु है ॥
सैंभ षोइ महीपाल कहै सुनिए गोपाल ।
हम हरि हाल तुम सौ निहाल रहियतु है ॥
अर्थ:छत्रपती असल्यामुळे संभाजीराजेजवळ छत्र,गज,चामर,असंख्य घोडेइ.ऐश्वर्याच्या वस्तू असल्यातरी त्याबद्दल शंभुराजेंच्या मनात अहंकारनव्हता.शंभुराजासारख्या क्षत्रिय राजामधील वैराग्य रूप पाहून काही लोकांनीत्यांची निंदाही केली पण त्यातच सुख मानुन ती त्यांनी सहन केली.दृढनिश्चयीशंभुनी त्यात सुख मानिले आणि स्वत:ला परमेश्वरास अर्पण केले.जो परमेश्वरासदूषण देतो ते मुढ अचेतन होते.त्यांना ही तो अचेतनाही सुंदर करतो.जो परमेश्वराची इच्छा धरितो त्याचे परमेश्वर समाधान करतात.शंभुराजेगोपाळास(श्रीकृष्णास) म्हणतात,'मी माझी सारी जबाबदारी तुझ्यावर सोपवितो'.
वृंदावन कुंजन में गुंजत मधुप कुंज ।
कुंज बनि रहे सुर लोक के अषारे से ॥
तहॉं संभुराज मैं विलोके वृजराज जा पैं ।
अंग अंग वरिए अनंग अंग छोर से ॥
अर्थ:वृंदावनतील कुंज वनात भ्रमरवृंद गोड गुंजन करीत आहेत.हे वृंदावन उद्यानदेवाच्या भूमीतही शोभून दिसत आहे.तेथे कवि शंभुराजांना व्रजराजश्रीकृष्णांच्या अंग प्रत्यंगावर आपली गात्रे ओवाळून टाकावीत असे वाटते.
SAAMBHAR : www.marathidesha.com

शंभू चरित्रं भाग 14

शंभू चरित्रं
भाग 14
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
शंभुराजे कृत नखशिख मधील निवडक श्लोक
पग वर्णन सवैया
कौहर कौल जपादल विद्रुम । का इतनीज बंधुकर्म कोति है ॥
रोचन रोरी रची मैहंदी । नृपशंभु कहे मुकता सम पोति है ॥
पाय धरैं ढरै इंगुरसो तिनमें । मनि पायलकी धनी जोति है ॥
हाथ व्हैं तीन लौ चारिह औरसो ।चांदणी चूनरीके रंग होति है ॥
अर्थ:राधिकांचेपाय लाल रंगाच्या (कौहर) फळासारखे तसेच लाल रंगाच्याकमळासारखे,पुष्पाप्रमाणे पिवळेधमक तसेच पोवळ्यासारखे लाल दिसतात.जसे विविधदिशांना उमललेले दुपहरीयांचे फळच.सखीच्या गोंधळात पायास मेहंदी लागलीआहे.कवी नृपशंभु म्हणतात, जणू काही मोत्यांचा लेप पायास लावला आहे वसिंदूरच पायातून ओघळत आहे.मण्याची माळ खुपच चमकत आहे,चारी बाजूंनी ती सहेलींनी घेरली गेली आहे.तिची बुनकीदार ओढणी चमकदार चंद्रप्रभेप्रमाने शोभत आहे.
मुख
राधिका के आनन को बरनन कहा कीजै ।
देखि नैन जै सो जुडावै सींची सुधा झर॥
संभुराज वृजराज प्रान को अधारे ताको ।
पावै कौन पार सो बखानै सोभा कौन वर ॥
सहसन कोटि जोति ओटि के इकठ्ठे कियो ।
कैधो चतुरान सभेत दियो बर हर ॥
फैलपट मंजु पर प्रफुल्लित कंज कैधों ।
बसि रह्यो ससि आइ कंचन की बेलि पर ॥
अर्थ:राधेच्यामुखाचे वर्णन काय करावे ? ज्याने ते पाहिले त्याला तो अमृताचा निर्झरप्रवाहीत आहे असे वाटू लागले.कवी शंभुराज म्हणतात वृजराज श्रीकृष्णांना तोप्राणाधार आहे.तिच्या सौंदर्याचे वर्णन कोण करू शकेल? सहस्त्र ज्योती एकत्रकरून बह्मदेवाने ते निर्माण केले आहे.साक्षात भगवान शंकराने शंभुराजास वरदिला आहे.असे प्रफुल्लित कमळ कामदेवाने निर्माण केले आहे.तिच्या सुवर्णवेलीवर राहण्यासाठी चंद्रच आला आहे.
SAAMBHAR : www.marathidesha.com

शंभू चरित्रं भाग 13

शंभू चरित्रं
भाग 13
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
शंभुराजे कृत नखशिख मधील निवडक श्लोक
रोडी वर्णन कवित्व
राधिका रोडी कोऊ कौंहरसी कहे सोन ।
मेरे चित्त दरगंध कहवाइ ॥
शंभुराज कोऊ कोऊ लालसी नरपानै तेतो ।
निपट निदानै वा कठौरता निघटवर ॥
यह तो नरम नैन देखत सुधासो पियैं ।
चुपरि अतर जों निसावति सुगंध झर ॥
रंजन मनाहि दुख भंजन सकल मनो ।
सुमन गुलाबकों दब्यो है कंजफूल तर ॥
अर्थ:राधिकेचीरोडी(टाच) ही सुवर्णकमळाप्रमाणे आहे असे कोणी म्हणतात.कवि शंभुराजम्हणतात,माझे अंतकरण तिला चोहोकडून घेरलेला सुगंध धारण केला आहे असेम्हणते.कुणी तिला लाललाल श्रेष्ठ खंड म्हणतात.अत्तर शिपडून निर्माणझालेल्या सुगंधाच्या झऱ्याची उपमा तिला देत आहोत.सर्वांच्या दुखाचे निवारणती अगदी आनंदाने करीत आहे.गुलाबांच्या फुलांनी दबवून टाकल्याप्रमाणे तसेचओल्या बह्मकमळाप्रमाणे ती दिसत आहे.
SAAMBHAR : www.marathidesha.com

शंभू चरित्रं भाग 12

शंभू चरित्रं
भाग 12
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
शंभुराजे कृत नखशिख मधील निवडक श्लोक
श्री गणजूलिखिते संभूकृत नखशिख

पद पद पत्र सम चरण जंघ जिमी कनक कर मकर ॥
नाभी ललित गभीर, उदर लंबित विसाल वर॥
उर दीरघ अति मंजु चारि कर, देत चारि फल॥
एक दंत अरू सुंड लषत, हरि जात सकल मल॥
अति नैन चारू ढाली फलक श्रवन सीस छविसों मढत ॥
ग्यान होत अग्यान के सो गननायक गुन पढत ॥
अर्थ:गणेशाचेपाय हे कमलपात्राप्रमाणे समचरण ,जांघ सोनेरी माशांची बनविलेली असून,नाभीखोल तर पोट लांब आहे.गणेशाची छाती अत्यंत विशाल असून चार हात धर्म,अर्थ,कामव मोक्ष आहेत.एक दात आणि सोंड ही सगळ्या पापाचे हरण करीत आहेत.अत्यंतसुंदर डोळे,मोकळे कान व शिर्ष सौंदर्याने नटवलेले आहे.गणेशाचे गुणगानकेल्यामुळे अज्ञानी मनुष्यही ज्ञानी होतो.


शंभू चरित्रं भाग 11

शंभू चरित्रं
भाग 11
(प्रत्येक हिंदू आणि मराठा यांनी शेअर करा कळू द्या जगाला कसा होता आपला शंभू राजा )
शंभुराजे कृत नायिकाभेद मधील निवडक श्लोक
नाइन दूती
राधिका के परवालसें हाथन ।लाल हरी घिरी लालि लुनाइ ॥
देखत ही बनी आपत कान्ह कहा ।करिये कवि शंभु बढाई ॥
लालि लसै अंगुरीन के बीच । तहॉं नख चंदन की छबि छाई ॥
कोपन की अहनाई में आनि मिलि । मनो बीचहि बीच जुन्हाई ॥
अर्थ:प्रवाळासारख्या असणाऱ्या राधेच्या हातात श्रीलाल कृष्णाची सुंदरता वेढलीगेली आहे.कवि शंभु म्हणतात, 'तिला पाहताच तिची प्रशंसा केली गेली .तीसुंदरता बोटांच्या नखामध्ये जणू चंदनाप्रमाणे सुगंधीत व सौंदर्य कोपराच्याआरशामध्ये एक झाली आहे.मधून मधून चांदण्याच्या चमचमण्याचा भास होतआहे.राधेच्या सुंदर हातात श्रीलाल कृष्णाचे प्रतिबिंब व कोपराजवळील आरशातया दोघांचे प्रतिबिंब ( चंद्र व चांदणे )एक झाले आहे'.
SAAMBHAR : www.marathidesha.com

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण... भाग २

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण...
भाग २
आदिलशाही -
स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सुरुवातीपासूनच ते 'सहज शत्रू' राष्ट्र होते. मात्र राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. छत्रपति शिवराय दक्षिण दिग्विजय येथे गेले असताना मुघल-आदिलशाही एकत्र येउन मराठ्यांविरोधात उभी राहिली. मात्र पराभव झाल्यानंतर मुघलांनी थेट विजापुरलाच वेढा घातला. मराठ्यांकडून अनेक लढायांमध्ये पराभव मिळाल्यानंतर देखील मुघलांकडून येणाऱ्या दबावामुळे त्यांनी मराठ्यांशी १६७७ मध्ये मैत्रीचा तह केला. मुघलांना परास्त करत खुद्द शिवरायांनी विजापुरचा वेढा उठवला. अरिमित्र संबंध हे असे बदलत असतात.
कुतुबशाही -
स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात विशेष महत्त्व नसलेल्या कुतुबशाहीला मात्र राजाभिषेकोत्तर काळात महत्त्व प्राप्त झाले. दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये कुतुबशाही सोबत सख्य करून आदिलशाही आणि मुघल यांना परास्त करायचे हेच मराठ्यांचे धोरण होते. शिवराय खुद्द १६७७ मध्ये कुतुबशहा यास भेटावयास गेले आणि उभय पक्षांमध्ये तह घडला. यात मोहिमेचा खर्च कुतुबशहाने करायचा तर मराठ्यांनी लढाया करायच्या आणि मुलुख जिंकायचा असे ठरले.
तहाचे प्रकार ३. ज्येष्ट, सम आणि हीन.
तर तहाचे षाड़गुण्य अशा प्रकारे असतात.
१. संधि - काही अटींवर शत्रुशी तह करणे.
२. विग्रह - शत्रुस युद्धस उद्युक्त करणे.
३. यान - शत्रूची उपेक्षा करणे.
४. आसन - अनाक्रमणाचा करार.
५. संश्रय - आत्म समर्पणाच्या भावनेने झुंज देणे.
६. द्वैधीभाव - संधि आणि विग्रह या दोघांचा वापर करून कार्यभाग साधणे.
या प्रकारेच शिवरायांनी मुघल, कुतुबशहा आणि आदिलशहा यांच्याबरोबर तह केले. याशिवाय इंग्रज आणि पोर्तुगीझ या पश्चिम किनाऱ्यावर बस्तान बसवलेल्या ह्या परकीय सत्तांबरोबर शिवरायांनी अतिशय धूर्तपणे राजकारण केले.
इंग्रज -
इंग्रज मराठ्यांचे कायम सहज शत्रू राहिले. त्यांच्या सोबत मैत्रीचा कधीही प्रयत्न झाला नाही. सूरत आणि राजापुर येथील त्यांच्या वखारी मराठ्यांकडून लुटल्या गेल्या. पन्हाळा मोहिमेदरम्यान सिद्दीला मदत केली म्हणून राजांनी ४ इंग्रज अधिकाऱ्याना कैदेत घातले होते. पुढे ४ वर्षांनी त्यांची सुटका झाली. जलदुर्ग खांदेरी बांधताना मराठ्यांना त्रास देणाऱ्या सिद्दीला मदत करतात म्हणून मराठ्यांनी मुंबईवर हल्ला करण्याचे योजून इंग्रजांच्या तोंडाचे पाणीच पळवले होते.
पोर्तुगीझ -
या सत्तेला मराठ्यांनी नेहमी स्नेह आणि दंड या दोन्ही पात्यात पकडून ठेवत यशस्वी राजकारण केले. दुर्गाडी येथे जहाज बांधणीचा उद्योग सुरू करताना राजांनी पोर्तुगिझांची मदत मागितली होती. पुढे १६६० मध्ये मुघल आणि आदिलशाही स्वराज्यावर हल्ले करत असताना आणि इंग्रज सिद्दीला साथ देत असताना मात्र पोर्तुगीझ तटस्थ राहिले. मराठ्यांची पहिली आरमारी मोहिम बारदेश येथे गेली ती पोर्तुगीझ राज्याच्या सिमेमधून. तेंव्हा सुद्धा ते निष्क्रिय राहिले. मोघलांनी मराठ्यांविरोधात मदत मागितली असताना त्यांने ती साफ़ नाकारली. अगदी संभाजी राजांच्या काळात देखील पोर्तुगीझ मराठ्यांच्या बाजूनेच तटस्थ राहिले. १६९१ मध्ये पोर्तुगीझ गव्हर्नर आपल्या राजाला लिहितो,'रामराजा आणि बाद्शाहाचे अधिकारी या दोघांचा विश्वास आम्ही संपादन केला आहे. मात्र आमच्या राज्याला मुसलमानांपेक्षा हिंदू बरे. मुसलमानांवर कधीही विश्वास ठेवू नये.'
आरमाराचे बळ अधिक असलेल्या या सागरी सत्ता ताब्यात-धाकात ठेवायच्या तर आपले देखील आरमार हवे हे राजांनी खूप आधी ओळखले होते. यातून जलदुर्ग आणि आरमार यांची निकड निर्माण झाली. स्वराज्याचे ते एक वेगळे अंग बनले.
Photo: छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण... भाग २ आदिलशाही - स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सुरुवातीपासूनच ते 'सहज शत्रू' राष्ट्र होते. मात्र राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. छत्रपति शिवराय दक्षिण दिग्विजय येथे गेले असताना मुघल-आदिलशाही एकत्र येउन मराठ्यांविरोधात उभी राहिली. मात्र पराभव झाल्यानंतर मुघलांनी थेट विजापुरलाच वेढा घातला. मराठ्यांकडून अनेक लढायांमध्ये पराभव मिळाल्यानंतर देखील मुघलांकडून येणाऱ्या दबावामुळे त्यांनी मराठ्यांशी १६७७ मध्ये मैत्रीचा तह केला. मुघलांना परास्त करत खुद्द शिवरायांनी विजापुरचा वेढा उठवला. अरिमित्र संबंध हे असे बदलत असतात. कुतुबशाही - स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात विशेष महत्त्व नसलेल्या कुतुबशाहीला मात्र राजाभिषेकोत्तर काळात महत्त्व प्राप्त झाले. दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये कुतुबशाही सोबत सख्य करून आदिलशाही आणि मुघल यांना परास्त करायचे हेच मराठ्यांचे धोरण होते. शिवराय खुद्द १६७७ मध्ये कुतुबशहा यास भेटावयास गेले आणि उभय पक्षांमध्ये तह घडला. यात मोहिमेचा खर्च कुतुबशहाने करायचा तर मराठ्यांनी लढाया करायच्या आणि मुलुख जिंकायचा असे ठरले. तहाचे प्रकार ३. ज्येष्ट, सम आणि हीन. तर तहाचे षाड़गुण्य अशा प्रकारे असतात. १. संधि - काही अटींवर शत्रुशी तह करणे. २. विग्रह - शत्रुस युद्धस उद्युक्त करणे. ३. यान - शत्रूची उपेक्षा करणे. ४. आसन - अनाक्रमणाचा करार. ५. संश्रय - आत्म समर्पणाच्या भावनेने झुंज देणे. ६. द्वैधीभाव - संधि आणि विग्रह या दोघांचा वापर करून कार्यभाग साधणे. या प्रकारेच शिवरायांनी मुघल, कुतुबशहा आणि आदिलशहा यांच्याबरोबर तह केले. याशिवाय इंग्रज आणि पोर्तुगीझ या पश्चिम किनाऱ्यावर बस्तान बसवलेल्या ह्या परकीय सत्तांबरोबर शिवरायांनी अतिशय धूर्तपणे राजकारण केले. इंग्रज - इंग्रज मराठ्यांचे कायम सहज शत्रू राहिले. त्यांच्या सोबत मैत्रीचा कधीही प्रयत्न झाला नाही. सूरत आणि राजापुर येथील त्यांच्या वखारी मराठ्यांकडून लुटल्या गेल्या. पन्हाळा मोहिमेदरम्यान सिद्दीला मदत केली म्हणून राजांनी ४ इंग्रज अधिकाऱ्याना कैदेत घातले होते. पुढे ४ वर्षांनी त्यांची सुटका झाली. जलदुर्ग खांदेरी बांधताना मराठ्यांना त्रास देणाऱ्या सिद्दीला मदत करतात म्हणून मराठ्यांनी मुंबईवर हल्ला करण्याचे योजून इंग्रजांच्या तोंडाचे पाणीच पळवले होते. पोर्तुगीझ - या सत्तेला मराठ्यांनी नेहमी स्नेह आणि दंड या दोन्ही पात्यात पकडून ठेवत यशस्वी राजकारण केले. दुर्गाडी येथे जहाज बांधणीचा उद्योग सुरू करताना राजांनी पोर्तुगिझांची मदत मागितली होती. पुढे १६६० मध्ये मुघल आणि आदिलशाही स्वराज्यावर हल्ले करत असताना आणि इंग्रज सिद्दीला साथ देत असताना मात्र पोर्तुगीझ तटस्थ राहिले. मराठ्यांची पहिली आरमारी मोहिम बारदेश येथे गेली ती पोर्तुगीझ राज्याच्या सिमेमधून. तेंव्हा सुद्धा ते निष्क्रिय राहिले. मोघलांनी मराठ्यांविरोधात मदत मागितली असताना त्यांने ती साफ़ नाकारली. अगदी संभाजी राजांच्या काळात देखील पोर्तुगीझ मराठ्यांच्या बाजूनेच तटस्थ राहिले. १६९१ मध्ये पोर्तुगीझ गव्हर्नर आपल्या राजाला लिहितो,'रामराजा आणि बाद्शाहाचे अधिकारी या दोघांचा विश्वास आम्ही संपादन केला आहे. मात्र आमच्या राज्याला मुसलमानांपेक्षा हिंदू बरे. मुसलमानांवर कधीही विश्वास ठेवू नये.' आरमाराचे बळ अधिक असलेल्या या सागरी सत्ता ताब्यात-धाकात ठेवायच्या तर आपले देखील आरमार हवे हे राजांनी खूप आधी ओळखले होते. यातून जलदुर्ग आणि आरमार यांची निकड निर्माण झाली. स्वराज्याचे ते एक वेगळे अंग बनले.

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार... भाग ३

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार...
भाग ३
मराठ्यांनी स्वतःची जशी जमिनीवरची युद्धपद्धती ठरवली होती तशी आता समुद्रावरची युद्धपद्धती ते ठरवत होते. सुरवातीची पद्धत अतिशय सोपी होती. खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी देऊ शकतील अश्या बोटी बनवण्याच्या मागे ते लागले होते. तेंव्हा 'वाऱ्यावीण प्रयोजन नाही' अश्या 'फरगात' (फ्रीगेट्स) न बनवता 'गुराबे' आणि 'गलबते' बनवायची तयारी जोमाने सुरु झाली होती. ह्यासोबत तरांडे, तारू, शिबाड, मचवा, पगार, वाघोर, तिरकटी आणि पाल असे नौकांचे प्रकार आज्ञापत्रात आढळतात.
गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत.
गलबत हे आकाराने अजून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.
मराठ्यांची नवी जहाजे खाडीमधून आता खुल्या समुद्रात संचार करू लागली होती. गनीम समोर आल्यावर काय करावे कसे वागावे ह्याबाबत स्पष्ट निर्देश आरमाराला दिले गेले होते. भर समुद्रात गनीम समोर आला तर एकत्र येऊन कस्त करून त्याच्याशी झुंजायचे, मात्र वाऱ्याची दिशा आपल्या विरुद्ध दिशेने असल्यास, गलबत योग्य चालवता येत नसल्यास गानिमाशी गाठ न घालिता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे. राजे म्हणतात,"तरांडीयास आणि लोकांस सर्वथा दगा होऊ देऊ नये. आपण राखून गनीम घ्यावा."
बरेचदा चकवा म्हणून शत्रू तहाचे निशाण दाखवतो आणि हरलो असे दाखवतो तेंव्हा लगेचच उडी घालून त्याच्या नजीक जाऊ नये, किंवा गनिमाला सुद्धा जवळ बोलावू नये, असे प्रशिक्षण आरमारास दिलेले होते. काही दगाफटका व्हायची शक्यता दिसल्यास कसलीही तमा न बाळगता तोफांच्या माराखाली तरांडे फोडून टाकावे असे स्पष्ट आदेश सरखेलांना होते.
वर्षाचे ८ महिने आरमार खुल्या समुद्रात असले तरी पावसाळ्याचे ४ महिने मात्र ते योग्य ठिकाणी छावणी करून सुरक्षित करून ठेवावे लागे. याबाबत आज्ञापत्र सांगते की, समुद्राला उधाण येण्याच्या १०-१५ दिवस आधीच आरमाराची छावणी योग्य ठिकाणी करणे आवश्यक असते. खुल्या उथळ समुद्रात किंवा कुठल्याही जलदुर्गाच्या खाली ते उघड्यावर नांगरून ठेवता येत नाही. छावणी सुद्धा दरवर्षी वेगवेगळ्याकिल्ल्यांच्या सानिध्यात बंदरात करावी म्हणजे दरवर्षी त्याच बंदराच्या आसपासच्या गावांना तोशीस पडत नाही. जिथे गनीम सहज सहजी पोचू शकत नाही अश्या ठिकाणी छावणी असावी असे आज्ञापत्र सांगते. आरमाराच्या सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट ताकीद होती की खाडी किनारी दिवस-रात्र गस्त घालून आरमार सुरक्षित राहील याची चाकरी करावी. खुद्द त्या भागाच्या सुभेदारांना २ महिन्याकरता संपूर्ण कुटुंब-कबिला घेऊन आरमाराची व्यवस्था बघण्याकरता आसपास जाऊन राहावे लागे इतके चोख आणि कडक नियम या बाबतीत राजांनी बनवले होते.
जस-जसे आरमार सजू लागले तशी त्याची व्यापारी धोरणे सुद्धा निश्चित केली गेली होती. सागरी व्यापारातून मिळणारे सर्व उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा केले जाई. आरमारात काम करणाऱ्या प्रत्येकाला महिना पगार मिळायचा. कोणालाही सागरी उत्पन्नातून हिस्सा घेण्याची मुभा नव्हती. सर्व सुभ्यांना स्पष्ट ताकीद होती की विविध बंदरामध्ये येणाऱ्या जहाजांना कुठलीही तोशीश लावता कामा नये. त्यांना योग्य ती सुरक्षा देणे हे आरमाराचे काम होते. जर बंदरेच नाही राहिली तर व्यापार कुठून होणार आणि कुठून मिळणार जकात हे साधे तत्व होते. मिळणाऱ्या जकातीवर आणि अधिक व्यापारावर आरमार सजवीत जावे असे राजांचे धोरण होते. फक्त बंदरातच नाही तर दर्यामध्ये देखील उगाच कोणा व्यापारावर उपद्रव करू नये अशी स्पष्ट ताकीद सर्वांना होती. जर चुकून शत्रू पक्षाकडील व्यापाराचे जहाज कुठल्याही बंदरात आले तरी ते लुटू नये, सुभेदारांनी जाऊन त्याची परीक्षा करावी आणि योग्य ते समाधान करावे, त्यांना अधिकाधिक आपल्या कडील जिन्नस विकावे आणि योग्य जकात वसूल करावी असे कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.
शून्यातून राज्याचे एक नये अंग सजू लागले होते. फक्त पायदळ आणि घौडदळ असलेल्या मराठा फौजेकडे आता आरमार सुद्धा तयार झाले होते. त्याच्या जोरावर ते आता टोपीकरांना आणि सिद्दीला आव्हान देण्यास सज्ज झाले होते.

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार... भाग २

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार...
भाग २
१६५९ पासून आरमाराचे काम अजून जोरात सुरु झाले. कोकण किनाऱ्यावर असलेले किल्ले ताब्यात घेणे आणि ते दुरुस्त करणे, नव्याने काही किल्ले बांधणे असे उपक्रम त्यांनी सुरु केले होते. जस-जशी मराठ्यांची आरमारी ताकद वाढू लागली तसे त्यांचे शत्रू अधिक हालचाली करू लागले. मराठ्यांना सिद्दीला पाण्यात मात देणे सोपे नव्हते कारण त्याच्यापाशी प्रबळ आरमार होते शिवाय तो म्हणेल तेंव्हा मुघल किंवा विजापूर त्याला मदत करील असत. अगदीच जीवावर आले तर तो मुंबईला माझगाव येथे इंग्रजांच्या आश्रयाला जाई. विशेष करून पावसाळ्यात त्याचे संपूर्ण आरमार मुंबई येथे सुरक्षितरित्या नांगरलेले असे.
१६६० ते १६६४ या काळात सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग, रत्नदुर्ग आणि सर्वात मात्तबर असा 'शिवलंका सिंधुदुर्ग' असे जलदुर्ग बांधले गेले किंवा त्यांची पुर्नबांधणी केली गेली. (सिंधू नदी जिथे सागराला मिळते त्याला 'सिंधू सागर' असे नाव होते. म्हणून राजांनी ह्या जलदुर्गाला 'सिंधुदुर्ग' असे नाव ठेविले. आज मात्र त्याचे नाव अरबी समुद्र असे झालेले आहे.) कुलाबा आणि खांदेरी हे जलदुर्ग राजांनी १६७८-७९ नंतर बांधले. मराठा आरमार ह्या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रात फिरे. शत्रूस जेरीस आणे आणि गरज पडल्यास माघार घेत जलदुर्गांच्या आश्रयाला येई. पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेबरोबर राजांनी सागरी व्यापार सुरु केला. त्यासाठी मीठ वाहून नेणारी जहाजे बांधली. मुघलांशी राजकारण करून थेट मस्कतपर्यंत व्यापार सुरु केला. आता आरमार आणि व्यापार एकमेकांच्या जोडीने वाढू लागले. सुरक्षा असेल तर व्यापार वाढतो आणि व्यापारातून झालेल्या फायद्यामधून अधिक प्रबळ आरमार उभे करता येते.
आधी कोकणच्या किनारपट्टीवर फेऱ्या मारणारे हे आरमार १६६५ मध्ये मालवण बंदरातून निघून बसनूर (सध्या कर्नाटक) येथे पोचले. पोर्तुगीझांशी झालेल्या तहामुळे आरमार गोव्याहून जाताना त्यांनी काहीच आडकाठी केली नाही. ही मोहीम भलतीच यशस्वी झाली. आदिलशहाची प्रचंड लुट मराठ्यांनी मारलीच त्याशिवाय आरमाराचा दबदबा सर्वत्र बसवण्यात त्यांना यश आले होते. खुद्द शिवरायांनी या सागरी मोहिमेचे नेतृत्व केले होते. १६६५ पर्यंत संपूर्ण कोकण मराठ्यांच्या ताब्यात आलेले होते. आदिलशहाची सत्ता उखडली गेली होती. नाही म्हणायला जंजिर्याच्या जोरावर दंडा-राजापुरी सिद्दी धरून होता. मुंबईमध्ये इंग्रज (इस्ट इंडिया कंपनी) अजून स्वतःचे बस्तान बसवत होते आणि गोव्याला पोर्तुगीझ आपली राजधानी राखून होते. शिवाय ठाणे - वसई भाग त्यांच्या ताब्यात होताच.
१६६६ नंतर राजे मोठ्या प्रमाणात मुघलांशी लढण्यात व्यस्त होते. त्यांनी सिद्दीला जंजिरापुरते सीमित केले होते. सिद्दी मात्र कधी इंग्रज तर कधी पोर्तुगीझ यांची मदत घेऊन मराठ्यांना हानी पोचवायच्या मागे होता. त्याला सर्वात जास्त मदत करण्यात इंग्रजांना आनंद होत असे. अखेर राजांनी जंजिरेकर सिद्दी आणि मुंबईमधले इंग्रज यांच्या बरोबरमध्ये असणाऱ्या खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचे काम सुरु केले. खुद्द शिवराय या बेटाची पाहणी करण्याकरता २००० फौज घेऊन इकडे आले होते. अर्थात सिद्दी आणि इंग्रज असे दोघांचेही धाबे दणाणले आणि त्यांनी ह्याला विरोध करत खांदेरीवर हल्ला चढवला. अर्थात तो परतवला गेला आणि मराठ्यांनी किल्ला बांधून पुर्ण केला. खांदेरीची संपूर्ण कहाणीच मोठी रोमांचकारी आहे. कुलाबा किल्ला बांधण्याचा आदेश तर शिवाजी महाराजांनी मृत्युच्या अवघे १२ दिवस आधी दिलेला आहे. हे दोन्ही किल्ले पुढे मराठा आरमाराच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे ठरले. कुलाबा उर्फ अलिबाग किला तर आंग्रे काळात राजधानी बनला.

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार... भाग १

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ६. आरमार...
भाग १
"आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे... तसेच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र... याकरीता आरमार अवश्यमेव करावे." अशी भूमिका मांडणाऱ्या व त्यावर वाटचाल करणाऱ्या श्री शिवछत्रपति महाराजांची दूरदृष्टि थक्क करून सोडते. इंग्रजी इतिहासकारांनी लिहून ठेवल आहे 'बरे झाले हा शिवाजी डोंगरी मूलखात जन्मला. जर हा सागरकिनारी जन्मता तर आमच काही खरे नव्हते.'
मध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापार यांची खंडीत झालेली परंपरा सुरु केली ती शिवरायांनी. १६५७च्या आसपास कल्याणमधील दुर्गाडी येथे पहिला जहाज बांधणीचा प्रयत्न त्यांनी केला तेंव्हा कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्दी, काही प्रमाणात मुघल आणि आदिलशाहाचे वर्चस्व होते. परकीयांचा कावा शिवरायांनी त्वरीत ओळखला होता. एका पत्रात ते म्हणतात,"सावकारांमध्ये फिरंगी (पोर्तुगीझ), इंग्रज, फरांसीस (फ्रेंच), डिंगमारांदी (डच?) टोपीकर हेहि सावकारी करितात. ते वरकड सावकारांसारखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्याच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होतात्से हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाहीं यैसें काय घडो पाहाते?" हिच दूरदृष्टी इतर सत्तांनी दाखवली असती तर इतिहास आज वेगळा असता.. खुद्द मराठ्यांच्या उत्तराधिकाऱ्यान्ना हे कितपत उमगले माहीत नाही. नाहीतर त्यांनीच मराठ्यांचे आरमार उध्वस्त केले नसते.
कोकणात शिरून स्थावर व्हायची संधी राजे शोधत होते. ती संधी त्यांना १६५६ च्या जानेवारीमध्ये मिळाली. औरंगजेब बादशहा व्हायला दिल्लीला रवाना होत होता. तिकडे विजापुरला अली आदिलशाह मरण पावला होता. योग्य संधीचे सोने करत राजांनी जावळी मारली. मोरेचा पाठलाग करत थेट कोकणात उतरून रायरी काबीज केली. राजांसाठी कोकणद्वार खुले झाले. उत्तरकोकणचा आदिलशाही भूभाग विजापुरपासून जावळीमुळे विभागला गेला. आता राजे १६५७ मध्ये उत्तर कोकणात उतरले आणि त्यांनी कल्याण, भिवंडी आणि माहुली परिसर जिंकून घेतला. याशिवाय सुधागड़, सरसगड़, तळागड़, सुरगड़ हे किल्ले सुद्धा मराठ्यान्नी सहज जिंकून घेतले. या भागाची जमीनीकड्ची बाजू आधीपासूनच मराठ्यांच्या ताब्यात होती. आता गरज होती ती तिची पश्चिम म्हणजे सागरीबाजू संभाळण्याची. सिद्दीवर अंमल आणायचा असेल तर त्याच्या इतकेच बलवान आरमार हवे हे ओळखायला राजांना वेळ लागला नाही. तशी तयारी १६५७ पासून दुर्गाड़ी येथे सुरू झाली. विविध प्रकारच्या युद्धनौका बांधायला निष्णात तंत्रज्ञ आणि तसेच कुशल कारागीर लागणार म्हणून राजांनी पोर्तुगीझांकडे मदत मागितली. ते आधी तयार झाले मात्र नंतर हेच आरमार आपल्या अंगावर शेकेल ह्या भीतीने त्यांनी मदत करायला नकार दिला. पण म्हणून राजे थोडीच स्वस्थ बसणार होते. त्यांनी जहाज बांधणीचा उद्योग सुरूच ठेवला. राज्याचे एक नवे अंग सजू लागले.

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था ... ! भाग ३

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था ... !
भाग ३
मराठ्यांच्या युद्धतंत्रात महत्वाचे स्थान होते ते घोडदळाला. त्या मागोमाग पायदळ. तोफखाना विभाग होता पण तो पायदळ अंतर्गत आणि तो गड़-किल्ल्यांवर स्थिर असे. फौजेसोबत फिरता नसे. मराठा घोडदळाने दिवंगत किर्ती प्राप्त केली होती. इतकेच नव्हे तर शत्रूने त्यांची प्रचंड भिती घेतली होती. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."
दक्षिणदिग्विजय मोहिमेदरम्यान फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये अशी नोंद घेतो -
'Quick Cavalry movements & excellent, well-paid intelligent services were the main cause of Shivaji’s success. He also mentioned about simplicity of Shivaji’s camp, absence of women, and lack of heavy baggage. He also observed that horsemen in cavalry were paid regularly & that they did not own horses. The horses were property of state. What a contrast to the slow moving, Mansabdari – ridden Mughal armies.'
“He also frequently surprised his enemies who thought him to be far off when he fell upon them. The families of these cavalries who belong to these parts were stationed in the lands of the west coast of India. This is what attached them to his service. This chief also paid his spies liberally who have given him considerable facilities for his conquest by the sure information they have supplied him.”
थोडक्यात मराठ्यांचे युद्धतंत्राचे ब्रीद होते - 'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.' याला दिले गेलेले नाव म्हणजे 'गनिमी कावा'. पण गनिमी कावा म्हणजे नेमके काय?..
सांभार : संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य), शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी), छत्रपती शिवराय - पत्ररूप व्यक्तीदर्शन - डॉ. रामदास, अथातो दुर्गजिज्ञासा (लेखक- प्र. के. घाणेकर)

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण... भाग १

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ५. परराष्ट्रीय धोरण...
भाग १
शिवरायांचे राज्यकारभार विषयक नेमके धोरण काय होते??? याबाबत काही जाबते आपण आधीच्या भागात पाहिले आहेतच. त्यांनी 'अरिमित्र विचक्षणा' कशी केली होती? स्वराज्य सुरवातीपासूनच चहुकडून शत्रुपक्षाने घेरलेले होते आणि राज्याला अंतर्गत शत्रू देखील खूप होते. ह्या दृष्टीने राजांनी परराष्ट्रीय धोरण कसे ठरवले आणि कसे राबवले हे समजून घेणे महत्वाचे आहे.
अरि म्हणजे शत्रू किंवा जवळ ज्याचे राज्य तो. तर मित्र म्हणजे अर्थात सुहृदय. कौटिल्य अरिमित्राचे ६ प्रकार सांगतो.
१. सहज शत्रू - राजाचे नातलग आणि सिमेलगतचे राष्ट्र.
२. कृत्रिम शत्रू - आपल्या विरोधात जाउन इतर राज्यांना सुद्धा विरोध करण्यास भाग पाडणारा.
३. सहज मित्र - सिमेलगतचे राष्ट्र सोडून अन्य राज्यांचा राजा.
४. कृत्रिम मित्र - लाभ संपादन करण्याच्या दृष्टीने मैत्री ठेवणारा.
५. मध्यम - संधीविग्रहात अनुकूल असलेला.
६. उदासीन - बलवान असून मैत्री ठेवणारा.
स्वराज्य हे आदिलशाही मुलुख जिंकून वाढीस लागले असल्याने ते साहजिकच सहज शत्रू राष्ट्र होते. शिवाय मुघल सुद्धा स्वराज्याचे सहज शत्रू होतेच. पण आत्ता शत्रू असणारे राज्य नंतरच्या काळात कृत्रिम मित्रराष्ट्र सुद्धा बनू शकते. मुघलांशी १६६५ मध्ये तर आदिलशाही बरोबर १६७७-७८ मध्ये राजांनी ही भूमिका घेतली होती. मुघल, आदिलशाही, क़ुतुबशाही, इंग्रज आणि पोर्तुगीझ या ५ राज्यांबरोबर शिवरायांनी कसे राजकारण केले ते आपण आता बघू.
मुघल -
स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात मुघलांनी मराठ्यांकडे कृत्रिम मित्र म्हणुन पाहिले होते. आदिलशाही पोखरली जाते आहे ह्याचा त्यांना फायदाच होत होता. पण १६५७ मध्ये मराठ्यांनी जुन्नर आणि नगर येथे हल्ले करून मुघलांचे शत्रुत्व ओढावून घेतले आणि मग ते बनले सहज शत्रू. उत्तरेला स्वराज्याची सीमा आता थेट मुघलांशी भिडली होतीच. कल्याण-भिवंडी या उत्तर कोकणावरील आक्रमण आणि अफझलखान वधानंतर तर मुघल थेट चाल करून आले. १६६०-१६६३ ही ४ वर्षे खुद्द शास्ताखान पुण्यात तळ ठोकून होता. सर्व व्यर्थ आहे हे कळल्यानंतर अधिक मोठी मोहिम मिर्झाराजा घेउन आला आणि पुरंदरचा तह घडला. या तहाने मुघल मराठ्यांचे कृत्रिम मित्र बनले. अर्थात त्यांचा सहज शत्रू असलेल्या आदिलशाहीचा पाडाव करायला. पुढे मात्र १६७० मध्ये जिझिया कर, उत्तर हिंदूस्थानमधील मंदिरांवरील आक्रमणे या व अनेक बाबींमुळे हा तह मोडला आणि मराठे-मुघल पुन्हा एकदा समोरा समोर आले. मुघलांशी मराठ्यांचे असलेले संबंध असे बदलत गेले. पुरंदरच्या तहाचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे आदिलशाहीला सुद्धा आपण मुघलांविरोधात मराठ्यांशी मैत्री का करू नये ही जाणीव झाली. ह्यातून पुढे १६७७ मध्ये मराठे - आदिलशाही तह घडला.
छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र ... !
भाग २
मराठा पायदळ सुद्धा अश्याच तंत्राचा वापर करून शत्रूला हैराण करून सोडे आणि गुढगे टेकण्यास भाग पाडे. शत्रू बेसावध असताना अचानक हल्ला करणे आणि आपली सैन्यसंख्या कमी असून देखील ती जास्त आहे असे भासवणे असे विशिष्ट तंत्र वापरून शिवरायांनी सुरवातीच्या काळात शत्रुवर विजय प्राप्त केले. ह्या सर्वात 'वेग' हा मूलभूत महामंत्र आणि सोबत असते अखंड सावधानता.
पण गनिमी काव्याचे हे युद्ध खरच किती योग्य आहे??? प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये कुठ-कुठली युद्धतंत्रे सांगितली गेली आहेत?
प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये युद्धाचे ३ प्रकार नमूद केलेले आहेत. १. प्रकाशयुद्ध, २. कूटयुद्ध आणि ३.तूष्णीयुद्ध. यामध्ये तूष्णीयुद्ध हे निषिद्ध मानलेले आहे. तर प्रकाशयुद्ध म्हणजे उभय पक्ष काळ-वेळ ठरवून जेंव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात ते. प्रकाशयुद्ध हे 'धर्मिष्ट' असल्याचे स्पष्ट असले तरी कूटयुद्ध सुद्धा 'अधर्मिष्ट' नसते.
जेंव्हा कुठल्याही एका पक्षास प्रकाशयुद्ध करणे शक्य नसते तेंव्हा कूटयुद्ध करावे असे कौटील्य सांगतो. जसे... शत्रूचे सैन्य आपल्यापेक्षा संखेने वरिष्ठ असेल पण युद्धक्षेत्र आपल्याला अनुकूल असेल तर कूटयुद्ध करावे. शत्रु सैन्य नदी पार करत किंवा डोंगर उतरत-चढत असेल तरी त्यावर हल्ला करावा. कौटील्य सांगतो की, 'गिरीदुर्ग, वनदुर्ग, कंटककिर्ण अरण्य, पाणथळ जागा, गिरीशिखरे, उंचसखल भूभाग हे प्रकाशयुद्धाने हाती लागत नाहीत. ह्यासाठी कूटयुद्ध करावे. पुढे तो म्हणतो,'वादळी वारा सुटला असताना, वातावरण धुक्याने भरलेल असताना शत्रू स्थळावर आक्रमण करावे, रात्रीच्या वेळी देखील हल्ले करावेत.'
छत्रपति शिवरायांनी याच कूटयुद्धनीतीचा पुरेपुर वापर करत शत्रूला पराजीत केले. आपण त्याला आज 'गनिमी कावा' म्हणतो इतकेच. संख्येने सदैव कमी असलेल्या मराठा सैन्याला विजय प्राप्त व्हावे म्हणुन त्यांनी लढाईची रणक्षेत्रे अनुकूल निवडली. शत्रु जर आपल्या प्रतिकूल रणक्षेत्रामध्ये असेल तर स्वतः शत्रूला अनुकूल न होता शत्रूला आपल्या अनुकूल रणक्षेत्रामध्ये खेचून आणणे यात त्यांचे कौशल्य होते. उदा. अफझलखान प्रकरण. वाई येथे बसलेल्या खानास राजांनी हरप्रयत्ने जावळीच्या जंगलात खेचून आणलेच. अनुकूल रणक्षेत्र निवडताना शिवरायांनी एक पथ्य नियमितपणे पाळले ते म्हणजे लढाई स्वराज्याच्या भूमीत शक्यतो होऊ द्यायची नाही. (अपवाद - पुरंदरचे युद्ध.) कारण उभय पक्षात लढाई झाली की विजय कोणाचाही होवो नुकसान हे सामान्य जनतेचे होते. पिके जाळली जाणे, घरे लुटणे असले प्रकार सर्रास होत असत. कधीही भरून येणार नाही अशी हानी होत असे.
कूटयुद्धामध्ये वापरले जाणारे अजून एक प्रभावी तंत्र म्हणजे 'बेरीरगिरी' - म्हणजे फिरती लढाई. लढाई करता-करता एका जागी न थांबता रणक्षेत्र थोड्या अंतराने बदलणे आणि शत्रूला पांगवणे. त्यानंतर चहुबाजूने हल्ले करून हैराण करणे. (उदा. जालना, खानदेश येथील हल्ले १६७९) दुसरे अजून एक तंत्र म्हणजे रात्री चालकरून शत्रू जवळ पोचणे आणि भल्या पहाटे शत्रुवर हल्लाबोल करणे. हे तंत्र तर मराठ्यांनी कैक वेळा वापरले. तानाजी मालुसरे यांनी घेतलेला सिंहगड(१६७०), कोंडाजी फर्जंद यांनी घेतलेला पन्हाळा(१६७३), प्रतापराव - आनंदराव यांचे बहलोलखानाबरोबरचे उमराणीचे युद्ध, मोरोपंत - प्रतापराव यांचे मुघलांविरूद्धचे साल्हेरचे युद्ध अशी अनेक उदाहरणे आहेत.
गनिमी काव्यामध्ये सर्वात महत्वाचे असतात त्या 'लष्कराच्या गतिमान हालचाली' आणि 'शत्रुवर अनपेक्षित आक्रमण.' शिवरायांनी लालमहालामध्ये शाहिस्तेखानावर केलेल्या हल्याने संपूर्ण भारत अचंभीत झाला. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,'पापणी लवण्यास जेवढा अवधी लागत नाही, खालचा श्वास वर येण्यास जितके क्षण लागतात तेवढ्या कालावधीत एखाद्या भुजंगाने झडप घालावी तदवत शिवाजीने शास्ताखानावर हल्ला केला.'
कूटनितीच्या प्राचीन युद्धतंत्राचे पालन करत छत्रपति शिवरायांनी विजयाची एक मोहोर दख्खनेवर उमटवली. एका नव्या साम्राज्याचा पाया निर्माण केला. पण ह्या सर्वांसोबत चोख लष्करी व्यवस्था, दुर्गमदुर्ग बांधणी आणि कोशबल यांची योग्य सांगड घातली.

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र ... ! भाग १

छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ४. युद्धतंत्र ... !
भाग १
मराठ्यांचे युद्धतंत्राचे ब्रीद होते - 'मति कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई.' याला दिले गेलेले नाव म्हणजे'गनिमी कावा'. पण गनिमी कावा म्हणजे नेमके काय??? हे नाव कोणी ठेवले? कसे पडले? म्लेच्छांसाठी गनिम म्हणजे मराठे. तर कावा म्हणजे कपटाने केलेला हल्ला. थोडक्यात शत्रुने आपल्या लढाईच्या पद्धतीला दिलेले हे नाव इतकी ढोबळ माहिती आपल्या सर्वांना असते. पण मराठ्यांचे युद्ध तंत्र इतकेच होते का??? ह्याच तंत्रावर त्यांनी साल्हेरी पराक्रम गाजवला??? दक्षिण दिग्विजय फत्ते केला? पुढे दिल्लीवर कब्जा मिळवला??? उत्तर अर्थात 'नाही' हेच आहे. मराठ्यांचे स्वतःचे असे एक विकसीत तंत्र होते. त्याबद्दल आपण थोड़ी माहिती घेउया पण त्याआधी 'गनिमी कावा' या शब्दाबद्दल थोड़े अधिक जाणून घेउया.
कावा म्हणजे कपट, हुलकावणी असे त्याचे सरळ अर्थ असले तरी त्याचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे 'घोड्याची रग जिरवण्यासाठी त्यास वेगाने घ्यावयास लावलेले फेरे'. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर घोड़ा वेगाने वाटेल तसा वळवणे, फिरवणे आणि मंडल, फेर किंवा घिरटी घेत वेगाने पुढे नेणे. आता ह्या मधून काव्याबद्दल अधिक योग्य माहिती हातात येते. मराठ्यांचे घोड़े हे अश्या प्रकारच्या तंत्रात तरबेज केलेले होते. वेग कमी करून घोड़ा हवा त्या दिशेला वळवणे कोणालाही जमेल पण वेग कमी न करता घोड़ा हव्या त्या दिशेला वळवणे हे कठीण काम असते. कारण वेग मंदावून मोहरा बदलल्यास शत्रूला आपली पुढची चाल सहज समजू शकते तेंव्हा घोडेस्वार कोणत्या दिशेला वळणार आहे ह्याचा अंदाज शत्रूला बांधू न देता मोहरा बदलणे अतिशय महत्वाचे असते.
अश्या प्रकारची अनपेक्षित वळणे वेग मंद न करता घेत काव्याच्या ह्या तंत्रात तरबेज असलेले मराठे घोड़े आणि घोडेस्वार शत्रूला बरोबर चुकवीत असत. आणि काव्याच्या लढाईमध्ये शत्रूची दिशाभूल हे प्रमुख उद्दिष्ट मराठा सैनिक साध्य करत असत. सर्वच बाबतीत वरचढ असलेल्या शत्रुपक्षाला पराजीत करण्यासाठी मराठ्यांनी हे युद्ध तंत्र वापरात आणले होते. अश्या वेगवान हल्यांमुळे शत्रुपक्षात मुसंडी मारत मराठा फ़ौज घुसे आणि शत्रु फळीमध्ये खिंडार पाडून लगेच परत फिरत असे. गोंधळलेल्या शत्रूच्या पिछाडीवर दुसरी तुकडी हल्ला करत असे आणि शत्रुला मागे फिरून मोहरा बदलवण्यास भाग पाडत असे. आता शत्रुच्या डाव्या-उजव्या बाजूवर हल्ले केले जात आणि शत्रूची पूर्ण फळी विस्कळीत केली जाई. याला 'Pincer Movement' असे म्हणतात.
छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था ... !
भाग २
स्वराज्याच्या पहिल्या तपात माणसे जोड़णे, त्यांच्यात ध्येय निर्माण करून लष्करी आणि मुलकी व्यवस्था लावणे हे काम शिवरायांनी तडीस लावले. आवशक्यता असेल तेंव्हा स्वतः मोहिमेचे नेतृत्व करून सैन्यात उमेद आणि उत्साह निर्माण केला. लाखभर फौजा उभ्या करून सुद्धा त्यांनी कुठल्याही लढाईमध्ये निम्यापेक्षा अधिक सैन्य कधीच गुंतवले नाही. कौटिल्यच्या अर्थशास्त्रानुसार राजाने आपले सैन्याचा चौथा भाग युद्धात गुंतवू नये असा नियम लिहिला आहे. शिवरायांनी हेच धोरण अंगीकारले आहे असे दिसते. या शिवाय 'माणूस ख़राब होवू नये' याची ते नेहमीच दक्षता घेत. ह्याचमधून निर्माण झाले मराठ्यांचे एक विलक्षण युद्धतंत्र. अफझलखान मोहिम असो नाहीतर पुरंदरची लढाई प्रकर्षाने हेच पुढे येते. माणूस ख़राब होवू नये म्हणजे सैन्य जाया होवू नये म्हणुन त्यांनी पुरंदरची लढाई थांबवून तह स्वीकारला.
फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये म्हणतो,
"Shivaji was an outstanding General of his age. He was aware of his limited resources & cousious about huge resources of his enemies. So tool full advantage of every single weakness of enemy. He watched their movements & managed to corner them into difficult positions. Time & again he broke the combinations of enemies by driving a wedge between them. His campaigns in Baglana in 1670-1672 were a masterpiece of war strategy."
राजांनी सैन्यात एक शिस्त निर्माण केली. सैन्यासंबंधी निरनिराळ्या तजविजींवर शिवरायांचे बारकाईने लक्ष्य असे, त्याचप्रमाणे आपल्या सैन्याकडून रयतेला यत्किंचितहि उपसर्ग होऊ नये म्हणून ते प्रचंड दक्ष असत. राजाभिषेकाच्या थोड़े आधी म्हणजे १६७४ मध्ये त्यांनी चिपळूण येथील अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,"मोघल मुलकात आले त्याहूनहि अधिक तुम्ही. रयतेस काडीचाहि आजार द्यावयाची गरज नाही." पत्रामध्ये लष्करी छावणीमध्ये शिस्त कशी हवी हे सुद्धा राजे लिहितात. चोख शिस्त असलेल्या सैन्याला प्रशिक्षण देखील तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी आवश्यक आयुधे, शस्त्रे आणि इतर सामुग्री वेळेवर उपलब्ध करणे सुद्धा महत्वाचे असते. या बाबतीत सुद्धा राजांनी एक धोरण अंगीकारले होते. वेळप्रसंगी परकीय सत्तांकडून दारूगोळा आणि शस्त्रे ते घेत असत.
छत्रपति शिवरायांची बलस्थाने ... ३. लष्करी व्यवस्था ... !
भाग १
गेल्या २ भागात आपण पाहिले की छत्रपति शिवरायांनी मंत्रशक्ती आणि उत्साहशक्ती वापरून तिसरे बलस्थान जे 'प्रभुशक्ती' (कोश आणि सैन्य) ते क्रमाक्रमाने कसे वाढवले. सैन्य आणि कोश हे एकमेकांस पूरक आहेत हे सुद्धा आपण ह्याआधी पाहिले आहेच.
'थोरले महाराज यांनी हे राज्य गडावरुन निर्माण केले' या आज्ञापत्रातील ओळीवरुन हे स्पष्ट होते की गड-कोट, किल्ले-दुर्ग ही ठाणी जिंकण्यासाठी आणि टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्य आवश्यक होते. थोडक्यात 'राजतंत्र' हे सर्वस्वी सैन्यावर अवलंबून असते. नवीन शत्रुप्रदेश जिंकणे, जिंकलेल्या भागाचे संरक्षण करणे, संरक्षित भागाचे संवर्धन करणे आणि अखेर त्याचे न्यायाने परीचालन करणे ह्या सर्व बाबींसाठी सैन्याची आवशक्यता असतेच. स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात सैन्याची जमवा-जमव हा एक जटील प्रश्न होता. रोहिडेश्वर येथे स्वराज्य शपथ घेणाऱ्या शिवरायांनी पुढच्या काही काळात १ हजार सैन्य उभे केले होते. समोर असलेल्या परिस्थितिमधून मार्ग काढताना, नविन राज्यपद्धती रुद्ध करताना त्यानी एक नविन युद्धतंत्र प्रवर्तित केले. गरज वाढली तसे सैन्येचे संख्याबळ आणि त्यांना लागणाऱ्या साधनसामुग्री उभी केली. लढ़ण्याचा ध्येयवाद त्यांच्यामध्ये निर्माण केला. सेतु माधवराव पगड़ी म्हणतात की,
"The Marathas fought for saving their homelands. It was cause worth Fighting & Dying for. They were led by a Man of No ordinary Skills & Calibre."
छत्रपति शिवरायांची बलस्थाने - २ : दुर्गम-दुर्ग ... !
भाग १
आज आपण छत्रपति शिवरायांच्या 'दुर्गम-दुर्ग' या बलस्थानाबद्दल जाणून घेऊ.
राजांनी स्वराज्याचे संपूर्ण S.W.A.T. Analysis (Strengths, Weaknesses, Opportunities, and Threats) केलेले होते असेच म्हणावे लागेल. शिवकाळात 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' हा विचार प्रकर्षाने जाणवतो. परकियांच्या आक्रमणापासून जर राष्ट्ररक्षण करायचे असेल तर गड-कोट, किल्ले-दुर्ग ही ठाणी अधिक मजबूत करावी लागतील हे त्यांच्या लक्ष्यात आले होते. 'सह्याद्री' हे आपले प्रमुख बलस्थान असल्याचे शिवरायांना ठावूक होतेच. स्वराज्याची स्थापनाच मुळात गड-किल्ल्यांवरुन झाली. विविध प्रकारचे दुर्ग राजांनी जिंकले, ओस पडलेले ताब्यात घेतले. अनेक नव्याने बांधले. यात अनेक गिरिदुर्ग होते, वनदुर्ग देखील होते. जलदुर्ग होते तसे भूदुर्ग देखील होते. एक गोष्ट इकडे प्रकर्षाने मांडावीशी वाटते ते म्हणजे शिवरायांनी गड आणि किल्ला यात योग्य फरक केला. 'राजव्यवहारकोश'प्रमाणे गिरिदुर्ग म्हणजे 'गड' तर भूदुर्ग म्हणजे 'किल्ला'. जो-जो दुर्ग शिवरायांच्या अधिपत्याखाली आला त्याला त्यांनी 'गड' हे नाम पुढे जोडले. उदा. पन्हाळा - पन्हाळगड, विशाळा - विशाळगड, कोंढाणा - सिंहगड, रायरी - रायगड, तोरणा - प्रचंडगड. अशी किती तरी उदा. देता येतील.
स्वतः शिवरायांनी किल्ल्यांचे महत्त्व खालील शब्दात वर्णन केले आहे. "जैसे कुळबी शेतास माळा घालून शेत राखितो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवांस खीळे मारून बळकट करितात तशी राज्यास बळकटी किल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरून जाईल. आपणास धर्मस्थापना व राज्यसंपादन करणे होय. सर्वांस अन्न लावून, शत्रुप्रवेश न होय ते किल्ल्यांमुळे होते. सर्वांचा निर्वाह आणि दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने तीनशेसाठ किल्ले हजरतीस आहेत. एक-एक किल्ला वर्ष-वर्ष लढला, तरी तीनशेसाठ वर्षे पाहिजेत." आणि पुढच्या पन्नास वर्षात सह्याद्रीने तेच अनुभवले. असेच नाही बनले शिवराय 'जाणता राजा' ... !!!
सांभार : http://www.maayboli.com/node/31221
छत्रपति शिवरायांची बलस्थाने - २ : दुर्गम-दुर्ग ... !
भाग २
'थोरले महाराज यांनी हे राज्य गडावरुन निर्माण केले' आणि 'गड होते म्हणुन राज्य मात्र अवरिष्ट राहिले' या आज्ञापत्रातील २ वाक्यांवरुन शिवकाळातील गडांची महती स्पष्ट होते. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना व व्यवस्था यावर उहापोह केला आहे. त्यात म्हटले आहे की "गड़कोट हेच राज्य, गड़कोट म्हणजे राज्याचे मुळ, गड़कोट म्हणजे खजिना, गड़कोट म्हणजे सैन्याचे बळ, गड़कोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गड़कोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गड़कोट म्हणजे सुखनिद्रागार किंवा गड़कोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण." प्रत्येक किल्ला व त्यासभोवतालचा प्रदेश हा शिवरायांच्या राज्यमालिकेतला एक घटकावयव होता. त्यांनी बहुतेक अचाट कृत्ये ह्या किल्ल्यांच्या सहाय्याने तडिस नेली. मिळवलेला बहुसंख्य कोश-संचय नविन किल्ल्यांची बांधणी व पुर्नरचना यावर खर्च झाला. अश्या दुर्गम दुर्गांचे शासन सुद्धा परम उग्र होते.
राजाभिषेकानंतर श्री शिवछत्रपति महाराजांनी प्रधानमंडळ कानून जाबता यामध्ये कलम १२ गडांबद्दल लिहिले होते. ते अशाप्रकारे,"किले-कोट, ठाणे जंजिरे येथील कायदे करून दिल्हे त्याप्रमाणे हवालदार, सुभेदार, कारखानीस, सरनौबत, सबनीस, तटसरनौबत लोक यांचे जाबते करून दिल्हे त्याप्रमाणे चालऊन सावधानतेनें स्थळे रक्षावी. तगिरी-वहाली हुजुरु न व्हावी, बजमी नेमणूक तालूकादार यांजकडे दरवाजा, किल्या, हवालदार,याचा हुकुम सिके त्याचे नावाचे. कारखानीसी जाबता अलाहिदा करणें."
१८ व्या शतकात मराठ्यांचा इतिहासावर पहिला शोध ग्रंथ लिहिणारा ग्रँट डफ म्हणतो, "किल्ल्यातून आत बाहेर कोणी केंव्हा जाणे, गस्ती फिरणे, चौक्या सांभाळणे व त्यावर देखरेख करणे, पाणी, धान्यसामुग्री व युध्दसामुग्री इत्यादी तयार ठेवणे यागोष्टीं वरती अगदी सक्तीचे सुक्ष्मनियम शिवाजीने केलेले असून प्रमुख शाखेवरील मुख्य अधिकाऱ्याची बारीक कामेसुद्धा ठरवलेली होती आणि ते नियम मोडण्यास तीळभर सुद्धा जागा नव्हती. इतके असून त्याचा ह्या बाबींचा खर्च फारच काटकसरीने बांधलेला होता."
तर डग्लस म्हणतो, "शिवाजीचे वास्तव्य डोंगरी मुलुखातच होते व त्याचे सामर्थ्य डोंगरी प्रदेशाच्या भरवश्यावरच होते. तो ख़राखुरा दुर्गस्वामी होता. त्याचा जन्म दुर्गात झाला. त्याला जे वैभव प्राप्त झाले ते दुर्गांच्यामुळे आणि त्याच्या दुर्गान्ना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्याच्याच प्रयत्नाने झाले. त्याचे दुर्ग म्हणजे भारतातील त्याच्या शत्रूंना धाक होता. त्याच्या राष्ट्राची ती संवर्धनभूमी होती. त्याच्या विजयाचा तो पाया होता. त्याच्या वाढत्या महत्वाकांक्षेचा तो जिना होता. दुर्ग हेच त्याचे निवासस्थान व तेच त्याच्या आनंदाचे निधान होते. कित्येक दुर्ग त्याने स्वतः बांधले आणि जे आधी बांधलेले होते, त्यासर्वांना त्याने बळकटी आणली."
छत्रपति शिवरायांनी कोश-संचय करून दुर्ग आणि सैन्य वाढवले. तर सैन्य आणि दुर्गांवरुन राज्य निर्माण केले. 'सह्याद्री'च्या भुगोलाचा वापर करून एक विशिष्ट युद्धपद्धती, विशिष्ट युद्धतंत्र विकसित केले. मराठ्यांची युद्धपद्धती नेमकी काय होती? त्यांची लष्करी व्यवस्था कशी होती? या संबंधाने 'सैन्य या तिसऱ्या बलस्थानाबद्दल आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत.
.सांभार संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य), शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी), छत्रपती शिवराय - पत्ररूप व्यक्तीदर्शन - डॉ. रामदास, अथातो दुर्गजिज्ञासा (लेखक- प्र. के. घाणेकर).

छत्रपति शिवरायांची बलस्थाने - १: कोशबल ... ! भाग २

छत्रपति शिवरायांची बलस्थाने - १: कोशबल ... !
भाग २
हिंदवी स्वराज्याच्या कोश-संचयाचे प्रमुख साधन होते ते शेतकऱ्याकडून वसूल करण्यात येणारा जमीन महसूल उर्फ़ शेतसारा. शिवरायांचे 'शेती विषयक धोरण' हा अभ्यासाचा मोठा विषय आहे. शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार त्यांनी एका पत्रातून व्यक्त केले आहेत. जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे.पत्रामध्ये राजे म्हणतात,"येक भाजीच्या देठासहि मन नको." संपूर्ण न्याय मार्गाने शेतसारा वसूलीची चोख पद्धत राबवून जहागीरदार, मिरासदार आणि वतनदारांवर पूर्ण लगाम ठेवत संपूर्ण उत्पन्न सरकारी खजिन्यात जमा केले जायचे. शेतकरी प्रजा आणि शासन यांमध्ये कोणीही मध्यस्त असणार नाहीत याची त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली होती. बरीच वतन त्यांनी अनामत केली आणि जी उरली त्यांना 'देशाधिकाऱ्याच्या आज्ञेत वागावें' असे स्पष्ट बंद होते. देशाधिकाऱ्याला 'कानून जाबता' लागू होताच.
शिवरायांच्या वेळी सुद्धा सारा काही कमी नव्हता. उत्पन्नाच्या २/५ तक्षिमा इतका होता. तक्षिमा म्हणजे विभाग. २/५ म्हणजे ४० टक्के इतका सारा भरावा लागायचा. तरी सुद्धा ही मांडणी लोकांनी खुशीने मान्य केली होती. ह्याचे कारण होते पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी. ह्या साऱ्याने स्वराज्याचा खजिना मोठ्या प्रमाणावर समृद्ध होत होता. त्यांनी प्रजेवर जादाकर कधीच लादले नाहीत. राजाभिषेकप्रसंगी झालेला खर्च सुद्धा त्यांनी वतनदारांवर 'सिंहासन पट्टी' बसवून वसूल केला. त्यासाठी त्यांनी जनतेला वेठीस धरले नाही.
शेतसाऱ्या बरोबरच व्यापार-उदीम हे उत्पन्नाचे अजून एक महत्वाचे माध्यम होते. शिवरायांनी आपला राज्यात व्यापार वाढीसाठी अनेक उपाय योजना केल्या होत्या. व्यापार वाढीसाठी राज्यात शांतता - सुव्यवस्था महत्वाची असते. तसेच सुरवातीला कमी कर घेउन व्यापाराला प्रोत्साहन देणे सुद्धा गरजेचे असते. छत्रपति शिवरायांचे 'व्यापार विषयक धोरण' हा सुद्धा अभ्यासाचा मोठा विषय आहे. कोकण भागावर पूर्ण नियंत्रण मिळवल्यावर राजांनी मिठाचा मोठा व्यापार सुरू केला होता. या संदर्भात छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७१ मध्ये कूड़ाळचा सुभेदार नरहरी आनंदराव यांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. त्यात राजे म्हणतात,"बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे." पोर्तुगीजांच्या ताब्यातील बारदेश प्रदेशात व्यापारी मीठ स्वस्त विकत असल्याकारणाने स्वराज्यामध्ये मीठ व्यापार मंदावला होता. येथील मीठ व्यापाराला उत्तेजन मिळावे म्हणुन राजांनी नरहरी आनंदराव यांना सदर पत्र लिहिले. या वरुन लक्षात येते की राजांचे व्यापारावर किती बारीक लक्ष असे. मिठाने भरलेली मराठा जहाजे व्यापारासाठी मस्कतपर्यंत जात असत.
सांभार : सांभार : http://www.maayboli.com/node/31172

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...