दहाव्या शतकाच्या अखेरीस त्रिपुरीच्या द्वितीय कोकल्लदेवाच्या कलिंगराज नामक पुत्राने दक्षिण कोसल(छत्तीसगढ) जिंकून तेथे आपले राज्य स्थापले. या शाखेत रत्नदेव, जाजल्लदेव, पृथ्वीदेव या नावाचे राजे झाले. त्यांनी पूर्वेच्या गंग वपाल राजांशी लढून अनेक विजय मिळविले. चौदाव्या शतकाच्या अखेरीस या वंशाची एक शाखा रायपूर येथे स्थापन झाली.छत्तीसगढातील कलचुरींचे राज्य नागपूरच्या भोसल्यांनी अठराव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास तो प्रदेश जिंकेपर्यंत टिकून होते.
कलचुरींनीही अनेक शिवालये व मठ बांधले. ब्राह्मणांना अग्रहार दिले, अन्नसत्रे स्थापिली आणि विद्वानांना आश्रय दिला.रत्नपूर, खरोद, शेवडीनारायण वगैरे ठिकाणी अद्यापि काही तत्कालीन देवालये सुस्थितीत आहेत. या राजांनीही स्वतःची सोन्याचीआणि तांब्याची नाणी पाडली होती.
कल्याणीचे कलचुरी
दक्षिणेत विजापूर जिल्ह्यात तर्दवाडी येथे बाराव्या शतकात कलचुरी मांडलिक घराणे राज्य करीत होते.त्यातील बिज्जल नामक सामंताने उत्तरकालीन चालुक्य सम्राट तृतीय तैल याचा विश्वास संपादन करून ११५७ मध्ये सम्राटपदाचीबिरुदे धारण केली आणि ११६० पूर्वी चालुक्यांनी राजधानी कल्याण ही काबीज केली. याचा प्रधान बसव याने वीरशैव (लिंगायत)पंथाची स्थापना केली. काहींच्या मते या बंडाळीत बिज्जल मारला गेला. याच्या उलट काही लेखांवरून त्याने आपल्या सोमेश्वर नामकपुत्राला स्वतःच गादीवर बसविले, असे दिसते.
बिज्जलानंतर त्याचे पुत्र सोमेश्वर (सु. ११६८-११७७), संकम (सु. ११७७-११८०) व आहवमल्ल (सु. ११८०-११८३) हे गादीवर आले.पण चालुक्य सम्राट चतुर्थ सोमेश्वर याने हळूहळू आपली सत्ता परत मिळविली. तितक्यात देवगिरीचे यादव प्रबळ होऊन त्यांनीसोमेश्वरालाही त्याच्या राज्यातून पिटाळून लावले.
संदर्भ : मिराशी, वा. वि. कलचुरि नृपति आणि त्यांचा काल, नागपूर, १९५६.
मिराशी, वा. वि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा